शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

‘हुतात्मा’चा ३,३२५ रुपये उच्चांकी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा साखर कारखान्यास गतवर्षी गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३,३२५ रुपये दर देणार आहे, अशी माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली. राज्य शासनाची परवानगी घेऊन हे बिल ४ आॅक्टोबरला शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.हुतात्मा साखर कारखाना अधिमंडळाच्या ३७ ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा साखर कारखान्यास गतवर्षी गाळपास आलेल्या उसाला प्रति टन ३,३२५ रुपये दर देणार आहे, अशी माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली. राज्य शासनाची परवानगी घेऊन हे बिल ४ आॅक्टोबरला शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.हुतात्मा साखर कारखाना अधिमंडळाच्या ३७ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी अध्यक्ष महादेव कांबळे, माजी अध्यक्षा नीलावती माळी, संचालिका आक्काताई गावडे, शालन रकटे प्रमुख उपस्थित होते.नायकवडी म्हणाले, देशात अतिरिक्त साखर असतानाही केंद्र सरकारने गेल्यावर्षी ५ लाख व यावर्षी ३ लाख टन साखर आयात केली. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला. हुतात्मा कारखाना बायंडिंग मटेरियलसह शेतकºयांना उच्चांकी ऊसदर देत आहे. त्यामुळे बायंडिंग मटेरियलचा एक टक्काप्रमाणे प्रत्यक्ष ३३.२५ रुपये दर शेतकºयांना वाढवून मिळतो. परंतु कारखान्याचे प्रतिटन ४.२५ तोडणी व वाहतूक खर्च वाढतो. रिकव्हरीत घट सोसावी लागते. त्यामुळे प्रतिटन ४१.७९ पैसे नुकसान होते. कारखान्याची गतवर्षीची एफआरपी प्रतिटन २,७२० रुपये असताना, प्रत्यक्ष बायंडिंग मटेरियलसह ३,३२५ रुपये दर देत आहोत. १ ते १५ मार्चदरम्यान गाळपास आलेल्या उसाला ३,४०८ रुपये, १५ मार्च ते ३१ मार्चदरम्यान गाळपास आलेल्या उसाला ३,४३९ रुपये, तर १ एप्रिलच्या पुढील उसाला ३,४५९ रुपये दर देणार आहे.यातून मुख्यमंत्री निधी प्रतिटन ४ रुपये, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणेसाठी १ रुपया, साखर संघासाठी १ रुपया व भागविकास निधीसाठी प्रतिटन ४४ रुपये, याप्रमाणे एकूण ५० रुपये कपात करण्यात येईल.यावेळी साखर उद्योगाचे व ऊस उत्पादनाचे ५ वर्षांसाठी स्थिर धोरण असावे, एफआरपीपेक्षा जादा दिल्या जाणाºया ऊसदरावर आयकर आकारला जाऊ नये, कारखान्याच्या स्वत: चालविलेल्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी प्रती युनिट १ रुपया २० पैसे आकारणी केली जाते, ती करण्यात येऊ नये, पॉवर पर्चेस अ‍ॅग्रिमेंट जुन्या दराने पीपीए करुन घ्यावेत, हे चार ठराव करण्यात आले.प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील यांनी स्वागत केले. ऋण व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी हिशेबपत्रके सादर केली.यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.इथेनॉल प्रकल्पाचे २० कोटी फेडलेनायकवडी म्हणाले, ‘हुतात्मा’मुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांमध्ये जागरुकता निर्माण झाली. महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांना शेतकºयांना ऊसदर देणे भाग पडले. हुतात्मा साखर कारखाना म्हणजे आपल्या भाकरीचा प्रश्न आहे. साखर कारखाना सभासदांना दर महिन्याला १५ किलो साखर ४ रुपये किलो दराने देतो. तसेच दीपावलीसाठी जादा १० किलो साखर देतो. या कमी दराच्या साखरेसाठी कारखान्याला १ कोटी ५७ लाख रुपये कर भरावा लागतो. त्यामुळे ६ कोटी ७५ लाख रुपयांचा बोजा कारखान्याला सहन करावा लागतो. गत हंगामात इथेनॉल प्रकल्पाची चाचणी झाली आहे. प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच त्यासाठी घेतलेले २० कोटीचे एनसीडीटीचे कर्ज भागविले आहे.