शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

मिरजेमध्ये महामार्गाची चाळण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:16 IST

मिरज : मिरजेत बसस्थानक ते गांधी चौक या राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. ...

मिरज : मिरजेत बसस्थानक ते गांधी चौक या राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेल्या महापालिका हद्दीतील या रस्त्यासाठी शंभर कोटी मिळणार असल्याचे गाजर दाखविण्यात येत असले तरी, शहरातील प्रमुख मार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेच्या विकास कामांचे पितळ उघडे पडले आहे.मिरजेतील बसस्थानक ते गांधी चौकातून पंढरपूरकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्यावरून कर्नाटक, कोल्हापूर व पंढरपूरकडे जाणारी दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मोठ्याप्रमाणात वाहतूक असल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. बसस्थानक ते शिवाजी क्रीडांगणापर्यंत रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने बाहेरून येणारे वाहनधारक महापालिकेच्या कारभाराबाबत लाखोली वाहत आहेत. कर्नाटक हद्दीत चांगले रस्ते असल्याने महापालिका हद्दीत प्रवेश केल्यानंतर दोन्ही राज्यातील रस्त्यांची तुलना होते. रत्नागिरी-नागपूर या राज्य महामार्गास राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर मिरजेतून बसस्थानक ते गांधी चौक हा रस्ता राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला.रस्त्याचा दर्जा बदलल्यानंतर गेल्या दहा महिन्यांत रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाची दुरूस्ती व रूंदीकरणासाठी महापालिकेने ३३ कोटी खर्चाचा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा आराखडा तयार केला होता. मात्र या रस्त्याखालून जलवाहिन्या व ड्रेनेज वाहिन्या असल्याने काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने आता तानंगपासून मिरजेतील उत्तमनगरपर्यंत दहा किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभिकरणाचा शंभर कोटी खर्चाचा प्रस्ताव मंजूर केल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा आहे. मात्र शंभर कोटी खर्चाचे रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने खराब झालेल्या या प्रमुख रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. राष्टÑीय महामार्ग असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी आमची नसल्याचे महापालिका प्रशासनाने हात झटकले आहेत, तर राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत त्रुटी असल्याने काम थांबविले आहे. खराब रस्त्यांबाबत वारंवार होणाºया तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºया वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.वारंवार आंदोलने : तरीही आश्वासनांचीच बरसातबसस्थानकाजवळ संपूर्ण रस्ता उखडला आहे. रस्त्याशेजारी सांडपाणी निचºयाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावर अतिक्रमणे असल्याने वाहतुकीची कोंडी होते. खोक्यांमुळे अरूंद रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते दुरूस्ती व अतिक्रमणे हटविण्याची मागणी प्रलंबित आहे. मिरजेत बसस्थानक-गांधी चौकापर्यंत राष्टÑीय महामार्ग आहे. मात्र बसस्थानकापासून शास्त्री चौकापर्यंत महापालिकेचा रस्ताही खराब झाला आहे. रस्ते दुरूस्तीसाठी वारंवार आंदोलने सुरू आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांकडे रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र रस्ता दुरूस्तीबाबत केवळ आश्वासनेच देण्यात येत आहेत.