शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

मिरजेमध्ये महामार्गाची चाळण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:16 IST

मिरज : मिरजेत बसस्थानक ते गांधी चौक या राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. ...

मिरज : मिरजेत बसस्थानक ते गांधी चौक या राष्टÑीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेल्या महापालिका हद्दीतील या रस्त्यासाठी शंभर कोटी मिळणार असल्याचे गाजर दाखविण्यात येत असले तरी, शहरातील प्रमुख मार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेच्या विकास कामांचे पितळ उघडे पडले आहे.मिरजेतील बसस्थानक ते गांधी चौकातून पंढरपूरकडे जाणाऱ्या या प्रमुख रस्त्यावरून कर्नाटक, कोल्हापूर व पंढरपूरकडे जाणारी दररोज हजारो वाहने ये-जा करतात. मोठ्याप्रमाणात वाहतूक असल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. बसस्थानक ते शिवाजी क्रीडांगणापर्यंत रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने बाहेरून येणारे वाहनधारक महापालिकेच्या कारभाराबाबत लाखोली वाहत आहेत. कर्नाटक हद्दीत चांगले रस्ते असल्याने महापालिका हद्दीत प्रवेश केल्यानंतर दोन्ही राज्यातील रस्त्यांची तुलना होते. रत्नागिरी-नागपूर या राज्य महामार्गास राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर मिरजेतून बसस्थानक ते गांधी चौक हा रस्ता राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला.रस्त्याचा दर्जा बदलल्यानंतर गेल्या दहा महिन्यांत रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाची दुरूस्ती व रूंदीकरणासाठी महापालिकेने ३३ कोटी खर्चाचा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा आराखडा तयार केला होता. मात्र या रस्त्याखालून जलवाहिन्या व ड्रेनेज वाहिन्या असल्याने काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने आता तानंगपासून मिरजेतील उत्तमनगरपर्यंत दहा किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व सुशोभिकरणाचा शंभर कोटी खर्चाचा प्रस्ताव मंजूर केल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा आहे. मात्र शंभर कोटी खर्चाचे रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने खराब झालेल्या या प्रमुख रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. राष्टÑीय महामार्ग असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी आमची नसल्याचे महापालिका प्रशासनाने हात झटकले आहेत, तर राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत त्रुटी असल्याने काम थांबविले आहे. खराब रस्त्यांबाबत वारंवार होणाºया तक्रारींकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºया वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.वारंवार आंदोलने : तरीही आश्वासनांचीच बरसातबसस्थानकाजवळ संपूर्ण रस्ता उखडला आहे. रस्त्याशेजारी सांडपाणी निचºयाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यावर अतिक्रमणे असल्याने वाहतुकीची कोंडी होते. खोक्यांमुळे अरूंद रस्त्यावर वारंवार अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. रस्ते दुरूस्ती व अतिक्रमणे हटविण्याची मागणी प्रलंबित आहे. मिरजेत बसस्थानक-गांधी चौकापर्यंत राष्टÑीय महामार्ग आहे. मात्र बसस्थानकापासून शास्त्री चौकापर्यंत महापालिकेचा रस्ताही खराब झाला आहे. रस्ते दुरूस्तीसाठी वारंवार आंदोलने सुरू आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्र्यांकडे रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र रस्ता दुरूस्तीबाबत केवळ आश्वासनेच देण्यात येत आहेत.