शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

भर पावसात लिंगायत समाजाचा ठिय्या

By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST

राज्य शासनाला इशारा : इतर समाजाची आरक्षणे कायम ठेवून ओबीसीच्या दर्जाची मागणी

सांगली : लिंगायतसह सर्व पोटजातींना त्यांच्या त्यांच्या प्रवर्गानुसार लिंगायत नावासह आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी आज (मंगळवार) लिंगायत समाजाने भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व विजय सगरे यांनी केले. लिंगायत समाजातील सर्व पोटजातींना त्यांच्या प्रवर्गानुसार आरक्षण देण्यात यावे, समाजातील ज्यांना आरक्षण आहे, त्यांचे आरक्षण कायम ठेवून संपूर्ण समाजास ओबीसीचा दर्जा देण्यात यावा, समाजास अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात यावा, तशी शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात यावी, लिंगायत समाजातील प्रत्येक गावात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा, संरक्षक भिंत व सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी, निवडणुकीपूर्वी समाजाला आरक्षण न दिल्यास राज्यकर्त्यांना हिसका दाखविण्यात येईल, असा इशारा दिला. आगामी निवडणुकीत समाजाचे उमेदवार उभे करण्यात येतील किंवा मतदानावर बहिष्काराचाही निर्णय होईल, असा इशारा प्रदीप वाले यांनी दिला. विजय सगरे यांनी, राज्य शासनाने आरक्षण देऊन समाजाला न्याय द्यावा अशी मागणी केली. लिंगायत समाजातील अनेक कुटुंबे गरीब आहेत. त्यामुळे या समाजाला आरक्षणाची खरी गरज आहे. या समाजाच्या उद्धारासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. लोकसंख्येनुसार हा समाज राज्यात अल्पसंख्यांक आहे, याचाही शासानाने गांभार्याने विचार करण्याची गरज आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी, या समाजाला आरक्षणाची गरज असून, तात्काळ आरक्षण जाहीर करावे, असे सांगितले. आंदोलनामध्ये विश्वनाथ मिरजकर, राजेंद्र कुंभार, अशोक पाटील, संजय विभुते, मीनाक्षी आक्की, रुपाली गाडवे, शिवराज बोळाज, गजेंद्र कल्लोळी, मनोहर कुरणे, राजू कोरे, मिरजेचे माजी सभापती अण्णासाहेब कोरे, अभिजित हारगे, तुषार टिंगरे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)