शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्ह्यात दमदार पाऊस

By admin | Updated: June 17, 2017 00:20 IST

जिल्ह्यात दमदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कर्जमाफीच्या निर्णयाने सुखावलेल्या शेतकऱ्याला शुक्रवारी पावसानेही दिलासा दिला. जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आठवडाभरापासून लांबलेल्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा करून थकबाकीदार शेतकऱ्यांना दहा हजाराचे कर्ज मंजूर केले आहे. शेतकरीवर्ग या कर्जाच्या प्रतीक्षेत असताना, त्याचे पावसाकडेही डोळे लागले होते. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पावसाने दमदार हजेरीलावली. सकाळी दहापर्यंत पाऊस बरसत होता. वरूणराजाची कृपादृष्टी झाल्याने बळीराजा खरीप हंगामाच्या कामाला पुन्हा जोमाने लागला आहे. जून महिन्याचा पंधरवडा आला तरी जिल्"ात पावसाने हजेरी लावली नव्हती. गेल्या आठ दिवसांपासून केवळ काळे ढग जिल्"ावर होते. पण दमदार पाऊस पडलेला नव्हता. अनेक तालुक्यात तुरळक पावसाची नोंद झाली होती. शुक्रवारी मात्र बहुप्रतीक्षेनंतर वरुणराजाने जिल्"ावर कृपादृष्टी दाखविली. सकाळी आठपर्यंत मिरज तालुक्यात ७.७, जतमध्ये २१, खानापूर ११.६, वाळवा १२.५, तासगाव ८.१, शिराळा १२.५, आटपाडी २५, कवठेमहांकाळ १६.४, पलूस १९.८, तर कडेगाव तालुक्यात ११.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे खरिपाच्या मशागतींना वेग येणार आहे. सांगली शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरातील नागरिकांची दैना उडाली होती. येथील शिवाजी मंडईत गुडघाभर पाणी होते. अनेक चौकात पाणी साचले होते, तर उपनगरांत दलदल निर्माण झाली आहे. पहिल्याच पावसाने महापालिकेचा नियोजनशून्य कारभार उघड झाला असून नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. महापालिका प्रशासनाने काही भागात तातडीने मुरूमाची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. चांदोली धरणात १० टीएमसी पाणीसाठाचांदोली (वारणा) धरणात शुक्रवारअखेर १० टीएमसी पाणीसाठा असून, धरणाची साठवण क्षमता ३४ टीएमसी आहे. कोयना धरणामध्ये १६.७२ टीएमसी पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी, तर अलमट्टी धरणात ९.९२ टीएमसी पाणीसाठा असून, साठवण क्षमता १२३ टीएमसी आहे.