शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘डोर्ली’च्या खुनातील मुख्य सूत्रधार पत्नीच

By admin | Updated: December 11, 2015 01:06 IST

नातेवाईकांकडूनच खून : मोबाईलवरून उलगडा

जत : जत तालुक्यातील डोर्ली येथे २५ नोव्हेंबर रोजी विठोबा मुकिंदा सरगर (वय ८०, रा. कोंबडवाडी, (कोळी), ता. सांगोला जि. सोलापूर) यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार त्यांची पत्नी लक्ष्मीबाई विठोबा सरगर (वय ७०) ही असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाजी महादेव लवटे (वय २४, रा. दुधेभावी, ता. कवठेमहांकाळ) व सागर तुकाराम म्हारगुडे (२१, रा. तळेवाडी, ता. आटपाडी) या दोघांनी संगनमत क रून हा खून केला आहे. या तिघांनी खुनाची कबुली दिली आहे. त्यांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, १९ डिसेंबरअखेर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विठोबा सरगर याने शिवाजी लवटे यास ७ हजार रुपये हातऊसने दिले होते. या प्रकरणात लक्ष्मीबाई हिने मध्यस्थी केली होती. वारंवार पैसे परत मागूनही त्याने दिले नाहीत. त्यामुळे विठोबा सरगर हा त्याची पत्नी लक्ष्मीबाई हिला तू मध्यस्थी क रून पैशाची हमी घेतलीस; परंतु त्याने पैसे परत केले नाहीत म्हणून तो तिला सतत मारहाण करत होता.तुला पैसे दिल्यामुळे विठोबा मला सतत मारहाण करून त्रास देत आहे. त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असे लक्ष्मीबाईने शिवाजी लवटे यास सांगितले होते. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी शिवाजी पैसे परत करणार आहे, ते तुम्ही घेऊन या, असे लक्ष्मीबाईने पती विठोबा यास सांगून एसटीने नागज फाटा येथेपाठविले होते. तोपर्यंत शिवाजी याने सागर यास बोलावून घेतले होते. विठोबा एसटीमधून उतरल्यानंतर तिघाजणांनी दुचाकीवरून ढालगाव व कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे जाऊन मद्य प्राशन केले होते. सायंकाळी सात वाजण्याच्यादरम्यान ते डोर्लीजवळ असलेल्या मानेवाडी ते दुधाळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ सखाराम नाथा माने यांच्या शेताजवळ आले होते. तेथून शिवाजी व सागर याने लक्ष्मीबाईच्या सांगण्यावरून त्यांचा खून करून मृतदेह माने यांच्या शेतातील नाला बांधाच्याखाली टाकला होता. त्यानंतर ते फरारी झाले होते. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी बेवारस मृतदेह सापडला म्हणून महादेव धोंडीबा बंडगर (रा. डोर्ली) याने जत पोलिसात फिर्याद दाखल केली होती. निरीक्षक श्रीकांत पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटवून, दोन दिवसात दोन मारेकऱ्यांना व ७ डिसेंबर रोजी लक्ष्मीबाईस अटक केली आहे. (वार्ताहर)पोलिसांच्या कसून चौकशीतून निष्पन्नसंशयित आरोपी शिवाजी लवटे याची लक्ष्मीबाई ही आत्या आहे, तर सागर म्हारगुडे याची मावशी आहे. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल कॉल तपशिलावरून, लक्ष्मीबाई सरगर या पती विठोबा यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार आहेत, याचा उलगडा झाला आहे.