शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

‘डोर्ली’च्या खुनातील मुख्य सूत्रधार पत्नीच

By admin | Updated: December 11, 2015 01:06 IST

नातेवाईकांकडूनच खून : मोबाईलवरून उलगडा

जत : जत तालुक्यातील डोर्ली येथे २५ नोव्हेंबर रोजी विठोबा मुकिंदा सरगर (वय ८०, रा. कोंबडवाडी, (कोळी), ता. सांगोला जि. सोलापूर) यांच्या खुनातील मुख्य सूत्रधार त्यांची पत्नी लक्ष्मीबाई विठोबा सरगर (वय ७०) ही असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाजी महादेव लवटे (वय २४, रा. दुधेभावी, ता. कवठेमहांकाळ) व सागर तुकाराम म्हारगुडे (२१, रा. तळेवाडी, ता. आटपाडी) या दोघांनी संगनमत क रून हा खून केला आहे. या तिघांनी खुनाची कबुली दिली आहे. त्यांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. इंगळे यांच्यासमोर उभे केले असता, १९ डिसेंबरअखेर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विठोबा सरगर याने शिवाजी लवटे यास ७ हजार रुपये हातऊसने दिले होते. या प्रकरणात लक्ष्मीबाई हिने मध्यस्थी केली होती. वारंवार पैसे परत मागूनही त्याने दिले नाहीत. त्यामुळे विठोबा सरगर हा त्याची पत्नी लक्ष्मीबाई हिला तू मध्यस्थी क रून पैशाची हमी घेतलीस; परंतु त्याने पैसे परत केले नाहीत म्हणून तो तिला सतत मारहाण करत होता.तुला पैसे दिल्यामुळे विठोबा मला सतत मारहाण करून त्रास देत आहे. त्याचा बंदोबस्त करावा लागेल, असे लक्ष्मीबाईने शिवाजी लवटे यास सांगितले होते. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी शिवाजी पैसे परत करणार आहे, ते तुम्ही घेऊन या, असे लक्ष्मीबाईने पती विठोबा यास सांगून एसटीने नागज फाटा येथेपाठविले होते. तोपर्यंत शिवाजी याने सागर यास बोलावून घेतले होते. विठोबा एसटीमधून उतरल्यानंतर तिघाजणांनी दुचाकीवरून ढालगाव व कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे जाऊन मद्य प्राशन केले होते. सायंकाळी सात वाजण्याच्यादरम्यान ते डोर्लीजवळ असलेल्या मानेवाडी ते दुधाळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ सखाराम नाथा माने यांच्या शेताजवळ आले होते. तेथून शिवाजी व सागर याने लक्ष्मीबाईच्या सांगण्यावरून त्यांचा खून करून मृतदेह माने यांच्या शेतातील नाला बांधाच्याखाली टाकला होता. त्यानंतर ते फरारी झाले होते. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी बेवारस मृतदेह सापडला म्हणून महादेव धोंडीबा बंडगर (रा. डोर्ली) याने जत पोलिसात फिर्याद दाखल केली होती. निरीक्षक श्रीकांत पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटवून, दोन दिवसात दोन मारेकऱ्यांना व ७ डिसेंबर रोजी लक्ष्मीबाईस अटक केली आहे. (वार्ताहर)पोलिसांच्या कसून चौकशीतून निष्पन्नसंशयित आरोपी शिवाजी लवटे याची लक्ष्मीबाई ही आत्या आहे, तर सागर म्हारगुडे याची मावशी आहे. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल कॉल तपशिलावरून, लक्ष्मीबाई सरगर या पती विठोबा यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार आहेत, याचा उलगडा झाला आहे.