शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

उसानं मारलं, आता हळद तारणार का?

By admin | Updated: January 15, 2015 23:22 IST

शेतकऱ्यांचे दराकडे डोळे : २१ जानेवारीपासून हळद सौद्यास प्रारंभ

प्रताप महाडिक -कडेगाव -कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस दिला; परंतु सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र १९०० रुपये दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ऊसदराच्या ज्वलंत प्रश्नावर शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अजूनही कारखानदार एफआरपीप्रमाणे दर देतील, अशी आशा बाळगून असलेला शेतकरी ऊस दरात मारला. आता हळद तरी तारणार का? या चिंतेत आहे. कडेगाव तालुक्यात उसाबरोबर हळद उत्पादन घेणारे हजारो शेतकरी आहेत. हे शेतकरी हळद कापणे, खांदणे, शिजवणे, पॉलिश करणे अशा कामात व्यस्त आहेत. शेतात काबाडकष्ट सुरू आहे; परंतु डोळे मात्र २१ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या हळद सौद्यात दर किती निघतोय, याकडे लागले आहेत.साखर कारखान्यांनी दिलेल्या ऊसबिलातून उत्पादन खर्चाइतकी रक्कमही शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. अनेक शेतकऱ्यांचे पीककर्जही या बिलातून परतफेड झाले नाही. कडेगाव तालुक्यातील हजारो शेतकरी उसाबरोबरच हळद उत्पादनही घेतात. हे शेतकरी चार वर्षांपासून सातत्याने हळद दर घसरल्याने बेजार झाले आहेत. यावर्षी चांगला दर मिळेल, असे देशातील सर्वात मोठे हळद मार्केट असलेल्या सांगलीतील व्यापारी सांगत आहेत. येथे २१ जानेवारीपासून नवीन हळदीचे सौदे सुरू होणार आहेत. यामुळे आपली हळद लवकरात लवकर बाजारपेठेत जावी व चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.एकरी सरासरी १० ते १५ क्ंिवटलपर्यंत हळद उत्पादन होते. प्रतिक्ंिवटल १० हजार ते १५ हजारपर्यंत दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. हळदीचे दर बाजारपेठेतील हळदीची आवक, मागील वर्षाची शिल्लक हळद आणि उपलब्ध हळदीची प्रतवारी यावर निघतात. मुळातच अजून कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे उसाला दर दिलेला नाही. यामुळे अस्वस्थ बनलेला शेतकरी आता हळदीला तरी चांगला दर मिळेल का, याच्या चिंतेत आहेत.दहा हजार भाव मिळण्याची शक्यतासांगलीचे हळद व्यापारी राजू मेनकर यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांत हळदीचे भाव घसरले होते. यामुळे शेतकऱ्यांनी हळदीकडे पाठ फिरवली. राज्यात ३० टक्के हळदीचे क्षेत्र कमी झाले. कर्नाटकात मागील वर्षाची हळद शिल्लक नाही. राज्यात २५ लाख पोती शिल्लक आहेत. परंतु त्यापैकी सर्रास हळद शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे. यातील ५ टक्केच हळद व्यापाऱ्यांची आहे. उसाचे क्षेत्र वाढले आणि हळद कमी झाली. यामुळे यावर्षी हळदीचे दर स्थिर राहतील. सरासरी १० हजारांच्या पुढे दर राहतील. शिवाय चांगल्या प्रतीच्या निवडलेल्या हळदीला १४ ते १५ हजारपर्यंत भाव मिळेल. यापुढील तीन वर्षातही हळदीला उच्चांकी दर मिळेल, अशी शक्यता आहे.