शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ दलाल बांगला देशात पसार

By admin | Updated: July 9, 2015 23:32 IST

पोलिसांना संशय : पुन्हा सांगलीत येण्याची शक्यता

सांगली : येथील गोकुळनगरजवळील संजय गांधी झोपडपट्टीत बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह सापडलेला ‘तो’ दलाल मुलीला घेऊन बांगला देशमध्ये पसार झाल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध तक्रार नसल्यामुळे शोध कसा घेणार, असा सवाल पोलीस करीत आहेत. त्याची मुलगी सांगलीत एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिच्यासाठी तो पुन्हा येण्याची शक्यता आहे. यासाठी आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे पोलिसांनी सांगितले.गेल्या आठवड्यात हा दलाल सापडला होता. त्याच्यासोबत अल्पवयीन मुलगी सापडली होती. ही मुलगी आणि तोही बांगला देशमधील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या मुलीस तो वेश्या व्यवसायासाठी घेऊन आल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी त्यास पकडून बेदम चोप देऊन विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांच्या चौकशीत त्याने ही मुलगी पुतणी असल्याचे सांगितले होते. यासंदर्भातील पुरावेही देतो, असे सांगून त्याने पोलिसांच्या तावडीतून सुटका करुन घेतली होती. पोलीस कारवाईचा ससेमीरा मागे लागू नये, यासाठी त्याने त्याच रात्री मुलीस घेऊन सांगलीतून पलायन केले होते. मात्र पोलिसांशी ‘अर्थ’पूर्ण तडजोड करून त्याला सोडविण्यात एका नगरसेवकाचा हात असल्याची चर्चाही सुरू आहे.वास्तविक पोलिसांनी ही मुलगी कोण आहे, याचा उलगडा झाल्याशिवाय त्याला सोडलेच कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन हे प्रकरण महिला पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपविले होते. पत्की यांच्या पथकाने झोपडपट्टीतील रहिवाशांचे जबाब नोंदवून घेतले. दलालाचा शोध घेण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याने शोधमोहीम थांबली. ज्या खोलीत तो राहत होता, तेथे त्याचे साहित्य आहे. तसेच त्याची मुलगी सांगलीतील एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. साहित्य नेण्यासाठी तसेच मुलीच्या शिक्षणासाठी तो पुन्हा येईल, असे पोलिसांना वाटते. तो येताच त्याच्याकडे चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)सोडून दिल्याची चूकझोपडपट्टीतील रहिवाशांनी संबंधित दलालास पकडून देऊनही पोलिसांनी केवळ चौकशीचे नाटक करून अवघ्या अर्ध्या तासात त्याला सोडून दिले. सारा घटनाक्रम समोर आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली. यानंतर मात्र विश्रामबाग पोलिसांची भंबेरी उडाली आहे. त्याला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर तो गायब झाल्याची माहिती मिळाली. तो सापडत नसल्याने त्याला सोडून दिल्याची मोठी चूक झाल्याची कबुली पोलीस देत आहेत. जिल्ह्यात तपासकामी विश्रामबाग पोलिसांचा एक प्रकारचा दबदबा आहे. असे प्रकरणही त्यांना नवीन नाही. तरीही या प्रकरणात मात्र त्यांचा हलगर्जीपणा झालाच कसा?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.