शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

हातनूरमध्ये मुख्याध्यापकाने शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST

तासगाव तालुक्यातील हातनूर येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले, असा आरोप ...

तासगाव तालुक्यातील हातनूर येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिक्षण विस्तार अधिकारी शामल माळी यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकासमोर हा प्रकार घडला, असेही पवार यांच्यासह ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हातनूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील दीर्घकाळासाठी वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे हे पद रिक्त होते. दरम्यान, मार्चअखेर असल्याने शाळेची अंतर्गत कामे खोळंबू नयेत, यासाठी वरिष्ठ शिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी देण्यात येणार होती. सुरेश पाटील यांच्यानंतर शाळेत सहा शिक्षक वरिष्ठ आहेत. मात्र, यातील अनेकांनी पदभार स्वीकारण्यास नकार दर्शवला. त्यामुळे शशिकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी शिक्षण विभागाने सोपवली.

मात्र पाटील पदास लायक नाहीत, त्यांचे वर्तन, वागणूक चांगली नाही, ते चारित्र्यहीन आहेत, त्यांच्याबाबतीत अनेक तक्रारी आहेत, त्यांच्यावर यापूर्वी निलंबनाची कारवाई झाली होती, अशी ग्रामस्थ व पालकांची तक्रार आहे. विश्वासात न घेता निवड करण्यात आली आहे, अशी तक्रारही शिक्षण विभागाकडे केली आहे.

या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी मंगळवारी विस्तार अधिकारी शामल माळी हातनूरला गेल्या होत्या. शाळेत तक्रारदार ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना बोलवण्यात आले होते. दरम्यान, ग्रामस्थ व पालकांनी पाटील यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा माळी यांच्यासमोर वाचला. यामुळे वातावरण तापत गेले. शाळा व्यवस्थापन समितीचे चुकीचे ठराव घेऊन ही निवड झाल्याचा आरोपही यावेळी झाला. त्यामुळे वातावरण गरम झाले.

तक्रारींच्या फैरीमुळे संतापलेल्या प्रभारी मुख्याध्यापक पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर चक्क विस्तार अधिकाऱ्यांसमोर फाडले. या प्रकारामुळे शाळेत तणाव निर्माण झाला.

विस्तार अधिकाऱ्यांसमोरच रजिस्टर फाडल्याची तक्रार सूर्यकांत पवार यांनी माळी यांच्याकडे केली. ही तक्रार स्वीकारत माळी यांनी त्यावर पोहोच दिली आहे. याचा अर्थ माळी यांनी मुख्याध्यापक पाटील यांनी रजिस्टर फाडल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. याप्रकरणी कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

चौकट

अहवालानंतर शहानिशा करून कारवाई करू : गटशिक्षणाधिकारी

याबाबत गटशिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे म्हणाल्या, शशिकांत पाटील यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व पालकांची तक्रार आहे. याबाबत शहानिशा करण्यासाठी माळी यांना हातनूरला पाठवले होते. यावेळी पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. याबाबत माळी यांचा अहवाल आल्यानंतर शहानिशा करून दोषींवर पुढील कारवाई केली जाईल.