शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सांगलीच्या टोल वसुलीस स्थगिती

By admin | Updated: September 8, 2015 22:57 IST

उच्च न्यायालय : कृती समितीकडून निर्णयाचे स्वागत

सांगली : जिल्हा न्यायालयाने अशोका बिल्डकॉन कंपनीस टोल वसुलीसाठी दिलेल्या १६ वर्षे ९ महिन्यांच्या मुदतवाढीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयीन निर्णयानंतर सांगलीच्या विश्रामगृहासमोर सर्वपक्षीय कृती समितीने आनंद साजरा केला. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर, नगरसेविका स्वरदा केळकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे अजिंक्य पाटील, स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील, अनिल शेटे, आदी उपस्थित होते. या सर्वांनी सर्वपक्षीय कृती समितीची भूमिका मांडली. यावेळी नीता केळकर म्हणाल्या की, आजवर शासकीय पातळीवर टोलबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या गाफीलपणाचा फटका येथील नागरिकांना बसला. जिल्हा न्यायालयाने अंतरिम आदेश देत टोल वसुलीस मुदतवाढ दिली होती. या निर्णयाला स्थगिती मिळाल्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीला दिलासा मिळाला आहे. केवळ न्यायालयाचा निर्णय झाला म्हणून आम्ही निश्चिंत होणार नाही. सांगलीच्या टोलचा समावेश ‘बायबॅक’ योजनेत करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. पालकमंत्रीच त्याबाबत गंभीर असल्यामुळे त्याबाबतही लवकरच निर्णय होईल, अशी आशा आहे. यावेळी बापूसाहेब पाटील म्हणाले की, टोलच्या प्रश्नात यापूर्वी शासकीय अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला आहे. त्यांच्या हलगर्जीपणाचा फटका सांगलीकरांना बसत आहे. स्वरदा केळकर यांनी सांगितले की, यापुढे आता शासकीय पातळीवरून कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता शासनाने घेतली आहे. तशी मागणीही आम्ही केली होती. अजिंक्य पाटील म्हणाले की, बायबॅकमध्ये सांगलीच्या टोलचा समावेश होईपर्यंत आम्ही लढत राहू. न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वच सदस्यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)असा आहे टोलचा प्रवाससांगलीतील बायपास रस्ता व पुलासाठी अशोका कंपनीला काम देण्यात आले होते. साडेसात कोटी रुपयांचे हे काम होते. त्यासाठी कंपनीला टोल वसुलीसाठी १६ वर्षे ३ महिने मुदत दिली होती. २००० पासून सुरू झालेली टोलवसुली २०१४ पर्यंत सुरू होती. जानेवारी २०१४ मध्ये टोल बंद करण्यात आला. कंपनीने सुरुवातीपासून एक कोटी २० लाखांच्या वाढीव खर्चासाठी पुन्हा टोल वसुलीसाठी परवानगी मागितली होती. लवादासमोर हा विषय गेल्यानंतर लवादाने वाढीव खर्चाच्या वसुलीसाठी कंपनीला आणखी १६ वर्षे ९ महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयानेही लवादाचा निर्णय कायम केला. सांगलीतील तदर्थ जिल्हा व सत्रन्यायाधीश जी. एस. शेगावकर यांनी गत महिन्यात यापूर्वीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. त्यामुळे कंपनीला पुढील १६ वर्षे सांगलीत टोल वसुली करण्याचा मार्ग मोकळा होता. या निर्णयास महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने या निकालास स्थगिती दिली असल्याची माहिती मंगळवारी सर्वपक्षीय कृती समितीने दिली.