शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
6
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
7
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
8
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
9
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
10
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
11
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
12
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
13
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
14
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
15
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
16
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
17
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
18
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

विधानपरिषदेच्या मोहापायी राजू शेट्टी यांच्या हातात तमाशातील तुणतुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

शिरटे : कृषी विधेयकाचा कायदा शेतकऱ्यांना अधिकार, स्वातंत्र्य व जादाचे पैसे मिळवून देणारा आहे. या कायद्याने देशात व ...

शिरटे : कृषी विधेयकाचा कायदा शेतकऱ्यांना अधिकार, स्वातंत्र्य व जादाचे पैसे मिळवून देणारा आहे. या कायद्याने देशात व राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेच्या मोहापायी तमाशातील तुणतुणे हातात घेण्याची वेळ एका शेतकरी नेत्यावर आली आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख टाळत आमदार आशिष शेलार यांनी लगावला.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भारतीय जनता किसान मोर्चा यांच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष राहुल महाडिक, संग्राम महाडिक, सागर खोत, सभापती जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार शेलार म्हणाले, या विधेयकाला विरोध करणाऱ्या काही मूठभर लोकांची भावना अडते आणि दलालांचे समर्थन करणारी आहे. केंद्राने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार असून, देशात आणि राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. ज्यांच्यात हिम्मत असेल, त्यांनी हा कायदा पालटून दाखवावा.

आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, प्रश्न निर्माण करायचे, ते तेवत ठेवायचे, हे काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहे. आपण शेतकऱ्यांच्या बाजूने की अडते-दलालांच्या बाजूने आहोत, हे राज्याच्या नेतृत्वाने स्पष्ट करावे.

संयोजक राहुल महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सचिन पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी आ. भगवानराव साळुंखे, मकरंद देशपांडे, विक्रम पाटील, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, अमोल पाटील, गोरख पाटील उपस्थित होते.

दरम्यान, येडेमच्छिंद्र येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निशिकांत भोसले-पाटील यांना मानणारे आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाकडे न जाता ग्रामपंचायत कार्यालयातच आमदार शेलार यांच्यासह मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी सरपंच गणेश हराळे, शरद पाटील, सुभाष चव्हाण, राहुल खराडे उपस्थित होते.

चौकट

पवारसाहेब, तुम्ही विश्वासघातकी होता, असा इतिहास लिहिला जाईल!

यात्रेचे प्रमुख, आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याचे म्हटले आहे. मात्र आता ते दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंंबा देत आहेत. पवारसाहेब, तुम्ही असे दुटप्पी वागला, तर भविष्यात तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता, तर विश्वासघातकी होता, असा इतिहास लिहिला जाईल. काँग्रेसने शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवले होते. या कायद्याने त्यांची पारतंत्र्यातून मुक्तता होणार असून, शेतकरी हा राजा होणार आहे.