शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

विधानपरिषदेच्या मोहापायी राजू शेट्टी यांच्या हातात तमाशातील तुणतुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

शिरटे : कृषी विधेयकाचा कायदा शेतकऱ्यांना अधिकार, स्वातंत्र्य व जादाचे पैसे मिळवून देणारा आहे. या कायद्याने देशात व ...

शिरटे : कृषी विधेयकाचा कायदा शेतकऱ्यांना अधिकार, स्वातंत्र्य व जादाचे पैसे मिळवून देणारा आहे. या कायद्याने देशात व राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेच्या मोहापायी तमाशातील तुणतुणे हातात घेण्याची वेळ एका शेतकरी नेत्यावर आली आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख टाळत आमदार आशिष शेलार यांनी लगावला.

येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना व भारतीय जनता किसान मोर्चा यांच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून किसान आत्मनिर्भर यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजयुमोचे राज्य उपाध्यक्ष राहुल महाडिक, संग्राम महाडिक, सागर खोत, सभापती जगन्नाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार शेलार म्हणाले, या विधेयकाला विरोध करणाऱ्या काही मूठभर लोकांची भावना अडते आणि दलालांचे समर्थन करणारी आहे. केंद्राने आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार असून, देशात आणि राज्यात नवक्रांती घडून येणार आहे. ज्यांच्यात हिम्मत असेल, त्यांनी हा कायदा पालटून दाखवावा.

आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, प्रश्न निर्माण करायचे, ते तेवत ठेवायचे, हे काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केले आहे. आपण शेतकऱ्यांच्या बाजूने की अडते-दलालांच्या बाजूने आहोत, हे राज्याच्या नेतृत्वाने स्पष्ट करावे.

संयोजक राहुल महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सचिन पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी आ. भगवानराव साळुंखे, मकरंद देशपांडे, विक्रम पाटील, कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सतीश महाडिक, अमोल पाटील, गोरख पाटील उपस्थित होते.

दरम्यान, येडेमच्छिंद्र येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निशिकांत भोसले-पाटील यांना मानणारे आहेत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाकडे न जाता ग्रामपंचायत कार्यालयातच आमदार शेलार यांच्यासह मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी सरपंच गणेश हराळे, शरद पाटील, सुभाष चव्हाण, राहुल खराडे उपस्थित होते.

चौकट

पवारसाहेब, तुम्ही विश्वासघातकी होता, असा इतिहास लिहिला जाईल!

यात्रेचे प्रमुख, आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याचे म्हटले आहे. मात्र आता ते दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंंबा देत आहेत. पवारसाहेब, तुम्ही असे दुटप्पी वागला, तर भविष्यात तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता, तर विश्वासघातकी होता, असा इतिहास लिहिला जाईल. काँग्रेसने शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवले होते. या कायद्याने त्यांची पारतंत्र्यातून मुक्तता होणार असून, शेतकरी हा राजा होणार आहे.