शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पूरग्रस्तांसाठी काँग्रेसकडून कर्तव्यपूर्तीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापुरामुळे सांगली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे लोकांना घरे सोडावी लागली. अशा परिस्थितीत विस्थापित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापुरामुळे सांगली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे लोकांना घरे सोडावी लागली. अशा परिस्थितीत विस्थापित झालेल्या लोकांसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसने कर्तव्यभावनेतून मदतीचा दिलेला हात महत्त्वाचा आहे, असे गौरवोद्गार कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी काढले.

सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी कल्पतरू मंगल कार्यालयामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवारा केंद्र सुरू केले आहे. या केंद्राला कदम यांनी भेट दिली. याठिकाणच्या पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. या केंद्रात दिल्या जाणाऱ्या भोजन, आरोग्य सेवा आणि अन्य सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. पृथ्वीराज पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी जितेश कदम उपस्थित होते.

यावेळी कदम म्हणाले, कृष्णा नदीला अवघ्या तीन ते चार दिवसातच खूप मोठ्या प्रमाणात पाणी आले, त्यामुळे शहरातील लोक पुरात अडकले. अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी खूप मोठे सहकार्य केले. त्यांना निवारा केंद्रात आणून सुरक्षितरित्या स्थलांतरित केले. पूर ओसरल्यानंतर तातडीने नुकसानाचे पंचनामे केले जातील तसेच शहरातील आरोग्य सुविधांकडे अधिक लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की, या निवारा केंद्रात पूरग्रस्त भागातील २७३ पुरूष, महिला आणि मुले यांची व्यवस्था केली आहे. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, अमर निंबाळकर, आनंदराव नलावडे, रवी खराडे, बिपीन कदम, अजय देशमुख, प्रशांत देशमुख, संतोष भोसले, सनी धोतरे, आयुब निशानदार, शेवंता वाघमारे, भारती भगत, आदी उपस्थित होते.