शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

पूरग्रस्तांसाठी काँग्रेसकडून कर्तव्यपूर्तीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापुरामुळे सांगली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे लोकांना घरे सोडावी लागली. अशा परिस्थितीत विस्थापित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापुरामुळे सांगली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे लोकांना घरे सोडावी लागली. अशा परिस्थितीत विस्थापित झालेल्या लोकांसाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेसने कर्तव्यभावनेतून मदतीचा दिलेला हात महत्त्वाचा आहे, असे गौरवोद्गार कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी काढले.

सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी कल्पतरू मंगल कार्यालयामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवारा केंद्र सुरू केले आहे. या केंद्राला कदम यांनी भेट दिली. याठिकाणच्या पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. या केंद्रात दिल्या जाणाऱ्या भोजन, आरोग्य सेवा आणि अन्य सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. पृथ्वीराज पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी जितेश कदम उपस्थित होते.

यावेळी कदम म्हणाले, कृष्णा नदीला अवघ्या तीन ते चार दिवसातच खूप मोठ्या प्रमाणात पाणी आले, त्यामुळे शहरातील लोक पुरात अडकले. अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी खूप मोठे सहकार्य केले. त्यांना निवारा केंद्रात आणून सुरक्षितरित्या स्थलांतरित केले. पूर ओसरल्यानंतर तातडीने नुकसानाचे पंचनामे केले जातील तसेच शहरातील आरोग्य सुविधांकडे अधिक लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की, या निवारा केंद्रात पूरग्रस्त भागातील २७३ पुरूष, महिला आणि मुले यांची व्यवस्था केली आहे. यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संतोष पाटील, प्रकाश मुळके, अमर निंबाळकर, आनंदराव नलावडे, रवी खराडे, बिपीन कदम, अजय देशमुख, प्रशांत देशमुख, संतोष भोसले, सनी धोतरे, आयुब निशानदार, शेवंता वाघमारे, भारती भगत, आदी उपस्थित होते.