शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात गुऱ्हाळघरातील गळीत निम्म्यावर

By admin | Updated: December 14, 2014 23:49 IST

घसरलेल्या दराचा परिणाम : दिवसाकाठी केवळ दोनच आदणांचे गळीत

सहदेव खोत - पुनवत -शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळातील गळिताला महिना उलटला तरीही गुळाचा दर २५०० रुपयांच्या वर जात नसल्याने गुऱ्हाळघरे अत्यंत अडचणीत सापडली असून, अनेक गुऱ्हाळघरात दिवसाकाठी केवळ दोनच आदणे निघत असल्याने कामगार व गुऱ्हाळ मालक यांचे नुकसान होत आहे.शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यात गुऱ्हाळघरे सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे. प्रतिवर्षी गुऱ्हाळ हंगामाच्या सुरुवातीला उसदराची कोंडी फुटलेली असायची. सुरुवातीच्या महिन्यात गुळाला ३००० च्या आसपास दर मिळायचा. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या महिन्यात गुऱ्हाळघरांना मुबलक ऊस मिळायचा. पहिल्या महिन्यात गुऱ्हाळांना मुबलक ऊस मिळायचा. गळितासाठी गुऱ्हाळघरांकडे शेतकऱ्यांचा ओघ वाढायचा.यावर्षी हंगामाला महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या गुळाला कऱ्हाड व कोल्हापूर बाजारपेठेत प्रतिक्विंटल १८००, २१००, २२०० ते २५००, २६०० असा दर मिळाला. यापेक्षा जादा दर मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आता गळितासाठी धजेनासे झाले आहेत. शिवाय दराच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा तोटा होऊ लागला आहे.दरात वाढ होत नसल्यामुळे दररोज चार आदणांनी चालणारी गुऱ्हाळे आता केवळ दोनच आदणांवर आली आहेत. त्यामुळे दोन लाखांवर गुंतवणूक करूनही गुऱ्हाळघरे व्यवस्थित चालत नसल्याने गुऱ्हाळ मालक हबकले आहेत. दराच्या या स्थितीमुळे कामगार ऊस उत्पादक व गुऱ्हाळ मालकांचे नुकसान होत आहे.भविष्यात गुऱ्हाळघरे टिकवायची असतील, तर शासनाने प्रतिक्विंटल ४००० च्या वर हमीभाव द्यावा. हा हमीभाव मिळाला तरच साखर कारखान्याच्या प्रतिटन दराची व गुळाच्या प्रतिक्विंटल दराची बरोबरी होऊ शकेल, असे गुऱ्हाळ मालक, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.एकंदरीत गुऱ्हाळघराबाबत शासनाची उदासीनता, अडत व्यापाऱ्यांनी केवळ स्वत:च्या फायद्याची घेतलेली भूमिका, वाढता उत्पादन खर्च व सौदे व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक यामुळे गुऱ्हाळ उद्योग आतबट्ट्यात आला असून, तमाम गूळ उत्पादकांनी, गुऱ्हाळ मालकांनी गुळाचे दर वाढविण्याची आग्रही मागणी केली आहे. गुळाला हमीभाव द्या सौदे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची गूळदराबाबत मोठी पिळवणूक होत आहे. गूळ ही जीवनावश्यक वस्तू आहे. भविष्यात गुऱ्हाळघरे टिकवायची असतील, तर शासनाने गुळाला प्रतिक्विंटल ४००० च्या वर हमीभाव द्यावा. हा हमीभाव मिळाला तरच साखर कारखान्याच्या प्रतिटन दराची व गुळाच्या प्रतिक्विंटल दराची बरोबरी होऊ शकणार आहे, असे गुऱ्हाळ मालक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.