शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात गुऱ्हाळघरातील गळीत निम्म्यावर

By admin | Updated: December 14, 2014 23:49 IST

घसरलेल्या दराचा परिणाम : दिवसाकाठी केवळ दोनच आदणांचे गळीत

सहदेव खोत - पुनवत -शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळातील गळिताला महिना उलटला तरीही गुळाचा दर २५०० रुपयांच्या वर जात नसल्याने गुऱ्हाळघरे अत्यंत अडचणीत सापडली असून, अनेक गुऱ्हाळघरात दिवसाकाठी केवळ दोनच आदणे निघत असल्याने कामगार व गुऱ्हाळ मालक यांचे नुकसान होत आहे.शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यात गुऱ्हाळघरे सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे. प्रतिवर्षी गुऱ्हाळ हंगामाच्या सुरुवातीला उसदराची कोंडी फुटलेली असायची. सुरुवातीच्या महिन्यात गुळाला ३००० च्या आसपास दर मिळायचा. त्यामुळे हंगामाच्या पहिल्या महिन्यात गुऱ्हाळघरांना मुबलक ऊस मिळायचा. पहिल्या महिन्यात गुऱ्हाळांना मुबलक ऊस मिळायचा. गळितासाठी गुऱ्हाळघरांकडे शेतकऱ्यांचा ओघ वाढायचा.यावर्षी हंगामाला महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या गुळाला कऱ्हाड व कोल्हापूर बाजारपेठेत प्रतिक्विंटल १८००, २१००, २२०० ते २५००, २६०० असा दर मिळाला. यापेक्षा जादा दर मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आता गळितासाठी धजेनासे झाले आहेत. शिवाय दराच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा तोटा होऊ लागला आहे.दरात वाढ होत नसल्यामुळे दररोज चार आदणांनी चालणारी गुऱ्हाळे आता केवळ दोनच आदणांवर आली आहेत. त्यामुळे दोन लाखांवर गुंतवणूक करूनही गुऱ्हाळघरे व्यवस्थित चालत नसल्याने गुऱ्हाळ मालक हबकले आहेत. दराच्या या स्थितीमुळे कामगार ऊस उत्पादक व गुऱ्हाळ मालकांचे नुकसान होत आहे.भविष्यात गुऱ्हाळघरे टिकवायची असतील, तर शासनाने प्रतिक्विंटल ४००० च्या वर हमीभाव द्यावा. हा हमीभाव मिळाला तरच साखर कारखान्याच्या प्रतिटन दराची व गुळाच्या प्रतिक्विंटल दराची बरोबरी होऊ शकेल, असे गुऱ्हाळ मालक, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.एकंदरीत गुऱ्हाळघराबाबत शासनाची उदासीनता, अडत व्यापाऱ्यांनी केवळ स्वत:च्या फायद्याची घेतलेली भूमिका, वाढता उत्पादन खर्च व सौदे व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक यामुळे गुऱ्हाळ उद्योग आतबट्ट्यात आला असून, तमाम गूळ उत्पादकांनी, गुऱ्हाळ मालकांनी गुळाचे दर वाढविण्याची आग्रही मागणी केली आहे. गुळाला हमीभाव द्या सौदे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची गूळदराबाबत मोठी पिळवणूक होत आहे. गूळ ही जीवनावश्यक वस्तू आहे. भविष्यात गुऱ्हाळघरे टिकवायची असतील, तर शासनाने गुळाला प्रतिक्विंटल ४००० च्या वर हमीभाव द्यावा. हा हमीभाव मिळाला तरच साखर कारखान्याच्या प्रतिटन दराची व गुळाच्या प्रतिक्विंटल दराची बरोबरी होऊ शकणार आहे, असे गुऱ्हाळ मालक व शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.