शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

सोनी, करोली (एम) येथे गारपीट

By admin | Updated: April 10, 2015 00:37 IST

चौघे जखमी : घरांवरील पत्रे उडाले; अवकाळी पावसाने हानी

सोनी : मिरज तालुक्यातील सोनीसह करोली (एम) परिसरामध्ये सोसाट्याचा वारा व गारपीटीसह पडलेल्या पावसाने जवळपास ५० हून अधिक घरांवरील छप्पर उडाले. तसेच घरांवरील पत्रे उडून लागल्याने चौघे जखमी झाले आहेत. अनेक घरे उघडी पडली आहेत. विजेचे खांबही पडले आहेत. नवीन द्राक्षबागांचे कोंब या पावसाने मोडले आहेत. पावसामुळे करोली (एम) परिसरात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विट्यातही तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी ५.१५ च्या दरम्यान सोनीसह करोली (एम) परिसरात गारपीटीसह पावसाने सुरुवात केली. सुरुवातीला १५ ते २० मिनिटे पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात गारपीट सुरू होती. त्यानंतर सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. पत्रे उडून लागल्याने आनंदराव पाटील, तसेच मैथिली श्रीकांत चव्हाण, समृध्दी श्रीकांत चव्हाण, दर्शनी श्रीकांत चव्हाण या तीन सख्ख्या बहिणी जखमी झाल्या आहेत. करोली मळा भागातही घरांची मोठ्याप्रमाणात पडझड झाली असून त्याची माहिती घेण्याचे काम सर्कल बी. एस. नागरगोजे, तलाठी पोपट ओमासे, ग्रामपंचायत पदाधिकारी करीत होते. वाऱ्याने विजेचे खांबही पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नवीन लागण केलेल्या द्राक्षबागांचेही नुकसान झाले असून गारपीटीने कोंब मोडले आहेत. (वार्ताहर)रांजणीत वीज कोसळून जनावरांचा मृत्यूरांजणी : येथील उंबरओढा वस्तीवरील चंद्रकांत मारुती भोसले यांच्या राहत्या घरासमोर वीज पडून एक शेळी व दोन बोकडांचा मृत्यू झाला. गुरुवारी साडेपाचच्या सुमारास कडाडून वीज पडली. भोसले यांच्या घराजवळ दहा ते पंधरा शेळ्यांचा कळप होता. जोराने वारा सुटला होता. आभाळ भरून आले होते. वादळी वारे इतके जोराचे होते की, पुढचे काहीच दिसत नव्हते. यातच विजेचा जोरात आवाज झाला. वीज घरासमोरच पडल्यामुळे भीतीचे वातावरण दिसून आले. बाहेर पाहताच कळपातील एक शेळी व दोन बोकडांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. तसेच एक लहान बोकड जखमी झाले. या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी ए. ए. रुपनूर यांनी केला असून, त्यांची किंमत वीज हजाराच्या आसपास करण्यात आली आहे.आगळगावात अवकाळी ढालगाव : आगळगाव, शेळकेवाडी, घाटनांद्रे, तिसंगी परिसरात गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळासह अर्धा तास पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे बेदाण्याचे नुकसान झाले असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आज दिवसभर मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. मात्र सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. जत तालुक्यात वादळी पाऊसजत : तालुक्यातील तिकोंडी, बनाळी मुचंडी, रावळगुंडवाडी, दरीबडची या भागात गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे डाळिंब, द्राक्षे, आंबा, बेदाणा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. हा पाऊस उन्हाळी मका, कापूस, भुईमूग या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.