शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

अतिथीगृह, प्रसुतीगृहाचीही इमारत पाडणार

By admin | Updated: August 11, 2015 23:42 IST

महापालिकेचा निर्णय : २० आॅगस्टपासून सुरू होणार काम; प्रशासनाची मंजुरी

सांगली : बीओटी किंवा पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) अंतर्गत सांगलीतील महापालिकेच्या अतिथीगृहाची व प्रसुतीगृहाची इमारत विकसित करण्यात येणार आहे. तूर्त ही इमारत २0 आॅगस्टपासून पाडण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. प्रशासनानेही इमारत उतरविण्यासाठी हिरवा कंदील दर्शविल्याची माहिती महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सांगलीतील अतिथीगृहाच्या इमारतीच्या जागेत अलिशान व्यापारी संकुल उभारण्याचा विचार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. आता याला मूर्तस्वरुप प्राप्त होणार आहे. तत्कालीन नगरपालिकेच्या कालावधित ही इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत सध्या धोकादायकही बनली आहे. त्यामुळे ही इमारत बीओटी किंवा अन्य योजनेच्या माध्यमातून विकसित करण्याचा विचार महापालिकेत सुरू होता. महापौर कांबळे यांनी अतिथीगृहासह नजीकच असलेली प्रसुतीगृहाची इमारतही नव्याने बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रशासनानेही याबाबत हिरवा कंदील दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. २0 आॅगस्टपासून इमारत उतरविण्याचे काम सुरू होईल. महापौर म्हणाले की, खासगीकरणातून इमारती उभारताना रितसर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. महापालिकेला या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक फायदा होईल, तसेच या इमारतीसुद्धा चांगल्या पद्धतीने विकसित होतील, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी खासगीकरणातून झालेल्या त्रुटी सुधारून हा प्रकल्प राबविण्यात येईल. त्यासाठीची तयारी आता झालेली आहे. प्रसुतीगृह, जन्म-मृत्यू विभाग व अन्य कार्यालयांचे स्थलांतर महापालिकेच्या रिकाम्या इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी काही पर्यायही उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. दोन्ही इमारतींच्या जागेचा विचार केला, तर याठिकाणी दोन वेगवेगळी संकुले उभारण्यात येऊ शकतात. (प्रतिनिधी)धोरणात्मक निर्णयाची आवश्यकतामहापौरांचा हा प्रस्ताव महासभेत चर्चेला येणे आवश्यक आहे. येत्या महासभेत याविषयीची चर्चा होण्याची शक्यता आहे. महापौरांमार्फतच हा विषय महासभेपुढे चर्चेला येण्याची शक्यता आहे. धोरणात्मक निर्णयानंतरच निविदा प्रक्रियेला सुरुवात करता येणार असल्याने, अजून यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो.इमारतीला झाली चाळीस वर्षेअतिथीगृहाची इमारत तत्कालीन नगरपालिकेच्या कालावधित १४ एप्रिल १९७४ रोजी उभारण्यात आली आहे. चाळीस वर्षांपूर्वीची ही इमारत असून वरच्या मजल्यांवरील बांधकाम खचले आहे. काळवंडलेल्या या इमारतीला केवळ रंगरंगोटीशिवाय काहीही केलेले नाही. त्यामुळे वारंवार किरकोळ पडझड होतच आहे. या इमारतीमध्ये पूर्वी सहा विभागांचे कामकाज सुरू होते. आता जन्म-मृत्यू, मालमत्ता विभाग आहे. हे दोन्ही विभाग स्थलांतरित करण्यात येणार आहेत.