शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याला सांगलीतील सराफ कट्टा सुना

By admin | Updated: April 8, 2016 00:04 IST

आंदोलनाचा परिणाम : पावणेदोनशे वर्षांत सुवर्ण बाजार पेठेतील परंपरा दोनवेळा खंडित, सात ते आठ हजार कारागीर बसून

अंजर अथणीकर -- सांगली  -साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला दरवर्षी सांगलीच्या सराफ कट्ट्यावर भरणारी खरेदीदारांची जत्रा यंदा दिसणार नाही. अबकारी कराच्या विरोधातील सराफांच्या आंदोलनामुळे गेल्या पावणे दोनशे वर्षांच्या सुवर्णपेठेच्या इतिहासात गुढीपाडव्याच्या सुवर्णखरेदीच्या परंपरेला दुसऱ्यांदा असा खंड पडणार आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीशिवाय नागरिकांनाही हा सण सुना वाटणार आहे. अबकारी कराविरोधात सराफांनी पुकारलेल्या बंदचा उद्या ३८ वा दिवस आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर खचाखच भरणारी सांगलीची सुवर्ण बाजारपेठ उद्या (शुक्रवार) सोने खरेदीविना सुनी जाणार आहे. दरम्यान, गेली ३८ दिवस संप सुरु राहिल्याने जिल्ह्यातील सुमारे सात ते आठ हजार सुवर्ण कारागीर बसून आहेत. रोजची सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. सुमारे पावणेदोनशेहून वर्षाहून अधिक काळाची सांगलीची सराफ बाजारपेठ ही पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात प्रसिध्द आहे. येथील कलाकुसरीच्या दागिन्यांना मागणी आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील घाऊक व्यापाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजार कारागीरांकडून कलाकुसरीचे दागिने बनवण्यात येतात. यामध्ये पश्चिम बंगाल, कोकणातून आलेल्या कारागीरांची संख्या अधिक आहे. याची सध्या उपासमार होत आहे. कडेगावात आज शेकापची काळी गुढीएफआरपी, दुष्काळप्रश्नी निषेध : तहसीलदारांना निवेदन देणारकडेगाव : तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर असतानाही साखर कारखान्यांनी मात्र शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी नववर्षाचा गुढीपाडवा आनंदाने साजरा करू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी पाडव्यादिवशी तहसीलदार कार्यालयासमोर काळी गुढी उभी करून शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचा इशारा शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी दिला आहे.साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना ऊसदर देणे बंधनकारक आहे. मात्र कारखान्यांनी सुरुवातीस साखरेच्या दरात घसरण झाल्याची सांगत एकरकमी ‘एफआरपी’ देण्यास टाळाटाळ केली. राज्य शासनाने ‘एफआरपी’चे तुकडे करत पहिल्या टप्प्यात एफआरपीची ८० टक्के व नंतर २० टक्के रक्कम देण्याचा निर्णय दिला.आज बाजारात साखरेचे दर साखरेचे दर प्रतिक्विंटल ३४०० पर्यंत वाढले आहेत. हे दर वाढलेले असतानाही साखर कारखानदार एफआरपीमधील राहिलेली २० टक्के रक्कम देण्याचे टाळत आहेत. ही बाब ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. उर्वरित रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्याची मागणीही करण्यात आली आहे.शासनाने जी ३९ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत. त्या गावांना अद्याप दुष्काळाच्या कसल्याही सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. त्या गावांना तातडीने वीज बिलात सवलत, विद्यार्थी परीक्षा फी माफी, पीक कर्ज वसुलीस स्थगिती यासह पीक नुकसान भरपाई आदी सुविधा तातडीने देण्यात याव्यात.नाराजी व्यक्त करण्यासाठी शेकाप कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभी करणार आहेत. निवेदनावर अ‍ॅड. सुभाष पाटील, इंद्रजित पाटील, सुरेश यादव, शहाजी यादव, भारत मस्के, राहुल यादव, गणेश गायकवाड, अमर सिद, विक्रम माळी, महेश पवार यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)मी गेली २० वर्षे मुहूर्तावर किमान अर्धा तोळा सोने घेतो. यानिमित्ताने गुंतवणूक होत असते. यावर्षी मात्र मुहूर्त साधता येणार नाही. त्याचबरोबर बाजार पेठ बंद असल्यामुळे आर्थिक देवाण-घेवाणही थांबली आहे. जुने सोने विक्रीही थांबली आहे. यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. याचाही सराफांनी विचार करावा.- अशोक मोहिते, सोने खरेदीदार, सांगली. लग्नासाठी आम्हाला सोने, दागिन्यांचे बुकिंग करायचे आहे. गेली महिनाभर संप मिटण्याची आम्ही वाट पाहात आहोत. पुढील आठवड्यात आमच्या घरी लग्न सोहळा आहे. आता काय करायचे, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला आहे. दागिना हा संस्कृती, परंपरेचा भाग आहेच, शिवाय ती चांगली गुंतवणूक आहे. लग्नापूर्वी तरी संप मिटावा, अशी अपेक्षा आहे. - रामचंद्र यमगर, नागरिक, सांगली.