शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

गुढीपाडव्याला सांगलीतील सराफ कट्टा सुना

By admin | Updated: April 8, 2016 00:04 IST

आंदोलनाचा परिणाम : पावणेदोनशे वर्षांत सुवर्ण बाजार पेठेतील परंपरा दोनवेळा खंडित, सात ते आठ हजार कारागीर बसून

अंजर अथणीकर -- सांगली  -साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला दरवर्षी सांगलीच्या सराफ कट्ट्यावर भरणारी खरेदीदारांची जत्रा यंदा दिसणार नाही. अबकारी कराच्या विरोधातील सराफांच्या आंदोलनामुळे गेल्या पावणे दोनशे वर्षांच्या सुवर्णपेठेच्या इतिहासात गुढीपाडव्याच्या सुवर्णखरेदीच्या परंपरेला दुसऱ्यांदा असा खंड पडणार आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीशिवाय नागरिकांनाही हा सण सुना वाटणार आहे. अबकारी कराविरोधात सराफांनी पुकारलेल्या बंदचा उद्या ३८ वा दिवस आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर खचाखच भरणारी सांगलीची सुवर्ण बाजारपेठ उद्या (शुक्रवार) सोने खरेदीविना सुनी जाणार आहे. दरम्यान, गेली ३८ दिवस संप सुरु राहिल्याने जिल्ह्यातील सुमारे सात ते आठ हजार सुवर्ण कारागीर बसून आहेत. रोजची सुमारे दहा कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. सुमारे पावणेदोनशेहून वर्षाहून अधिक काळाची सांगलीची सराफ बाजारपेठ ही पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात प्रसिध्द आहे. येथील कलाकुसरीच्या दागिन्यांना मागणी आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील घाऊक व्यापाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. जिल्ह्यात सुमारे सात ते आठ हजार कारागीरांकडून कलाकुसरीचे दागिने बनवण्यात येतात. यामध्ये पश्चिम बंगाल, कोकणातून आलेल्या कारागीरांची संख्या अधिक आहे. याची सध्या उपासमार होत आहे. कडेगावात आज शेकापची काळी गुढीएफआरपी, दुष्काळप्रश्नी निषेध : तहसीलदारांना निवेदन देणारकडेगाव : तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर असतानाही साखर कारखान्यांनी मात्र शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी नववर्षाचा गुढीपाडवा आनंदाने साजरा करू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी पाडव्यादिवशी तहसीलदार कार्यालयासमोर काळी गुढी उभी करून शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचा इशारा शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी दिला आहे.साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. कारखान्यांनी एफआरपीनुसार शेतकऱ्यांना ऊसदर देणे बंधनकारक आहे. मात्र कारखान्यांनी सुरुवातीस साखरेच्या दरात घसरण झाल्याची सांगत एकरकमी ‘एफआरपी’ देण्यास टाळाटाळ केली. राज्य शासनाने ‘एफआरपी’चे तुकडे करत पहिल्या टप्प्यात एफआरपीची ८० टक्के व नंतर २० टक्के रक्कम देण्याचा निर्णय दिला.आज बाजारात साखरेचे दर साखरेचे दर प्रतिक्विंटल ३४०० पर्यंत वाढले आहेत. हे दर वाढलेले असतानाही साखर कारखानदार एफआरपीमधील राहिलेली २० टक्के रक्कम देण्याचे टाळत आहेत. ही बाब ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. उर्वरित रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्याची मागणीही करण्यात आली आहे.शासनाने जी ३९ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली आहेत. त्या गावांना अद्याप दुष्काळाच्या कसल्याही सोयीसुविधा दिलेल्या नाहीत. त्या गावांना तातडीने वीज बिलात सवलत, विद्यार्थी परीक्षा फी माफी, पीक कर्ज वसुलीस स्थगिती यासह पीक नुकसान भरपाई आदी सुविधा तातडीने देण्यात याव्यात.नाराजी व्यक्त करण्यासाठी शेकाप कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभी करणार आहेत. निवेदनावर अ‍ॅड. सुभाष पाटील, इंद्रजित पाटील, सुरेश यादव, शहाजी यादव, भारत मस्के, राहुल यादव, गणेश गायकवाड, अमर सिद, विक्रम माळी, महेश पवार यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)मी गेली २० वर्षे मुहूर्तावर किमान अर्धा तोळा सोने घेतो. यानिमित्ताने गुंतवणूक होत असते. यावर्षी मात्र मुहूर्त साधता येणार नाही. त्याचबरोबर बाजार पेठ बंद असल्यामुळे आर्थिक देवाण-घेवाणही थांबली आहे. जुने सोने विक्रीही थांबली आहे. यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. याचाही सराफांनी विचार करावा.- अशोक मोहिते, सोने खरेदीदार, सांगली. लग्नासाठी आम्हाला सोने, दागिन्यांचे बुकिंग करायचे आहे. गेली महिनाभर संप मिटण्याची आम्ही वाट पाहात आहोत. पुढील आठवड्यात आमच्या घरी लग्न सोहळा आहे. आता काय करायचे, असा प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला आहे. दागिना हा संस्कृती, परंपरेचा भाग आहेच, शिवाय ती चांगली गुंतवणूक आहे. लग्नापूर्वी तरी संप मिटावा, अशी अपेक्षा आहे. - रामचंद्र यमगर, नागरिक, सांगली.