शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

गुढीपाडवा सुनासुना; ८६ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती वस्तू खरेदी करण्याची परंपरा कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झाली आहे. कोरोनापूर्वीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरगुती वस्तू खरेदी करण्याची परंपरा कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झाली आहे. कोरोनापूर्वीच्या गुढीपाडव्याशी तुलना करता यंदा जिल्ह्यातील विविध क्षेत्रांना एकूण ८६.५० कोटींचा फटका बसला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, सराफ, घरबांधणी व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होत असते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून यादिवशी नव्या वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या परंपरेला कोरोनाने धक्का दिला आहे. वाहन क्षेत्र वगळता सराफ व इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय यंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे. वाहन क्षेत्रातही फारसा उत्साह दिसून आला नाही. दुचाकीच्या पाडव्याच्या विक्रीत ८० टक्के, तर चारचाकीच्या विक्रीत ५० ते ६० टक्के घट दिसून आली. बुकिंग केलेली वाहने देण्यासही व्यावसायिकांना अडचणी आल्या. वाहनांची उपलब्धताही झाली नसल्यानेही फटका बसला आहे.

चौकट

कोणत्या क्षेत्राचे किती नुकसान

दुचाकी विक्री १४.५० कोटी

चारचाकी विक्री ३६ कोटी

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू २२ कोटी

सराफ बाजार १४ कोटी

एकूण ८६.५० कोटी

कोट

दुचाकी व चारचाकी वाहनांच्या विक्रीस यंदाही मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन वर्षांतील हे नुकसान चिंताजनक आहे. तरीही मागच्या वर्षीचा विचार केल्यास परिस्थिती बरी म्हणावी अशीच वाटते.

-श्रीकांत तारळेकर, संचालक, सिद्धिविनायक मोटर्स

कोट

इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायाला गुढीपाडव्यादिवशी सुमारे २२ ते २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. दुकानेच बंद असल्याने मुहूर्तावरील खरेदी थांबली. दोन वर्षे ही परिस्थिती असल्याने व्यावसायिकांचा विचार शासनाने करायला हवा.

- विजय लड्डा, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक, सांगली

कोट

गुढीपाडव्याला होणारी उलाढाल थांबल्याने मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायात नव्याने कर्ज काढून आलेले व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत. दुकाने बंद असली तरी देणी सुरूच आहेत.

- पंढरीनाथ माने, सचिव, सांगली सराफ समिती

चौकट

गुढीपाडवा सुनासुना जाण्याची चौथी वेळ

सराफ व्यावसायिकांचा गुढीपाडव्याचा सण सुनासुना जाण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी १९९६-९७ मध्ये नगरपालिकेचा जकात ठेका रद्द करावा म्हणून सांगलीतील दुकाने ८ ते १० दिवस बंद होती. त्या काळातच गुढीपाडवा होता. त्यानंतर २०१६ मध्ये सोन्यावर अबकारी कर लागला होता. त्याविरोधात भारतातील सर्व सराफ, सुवर्णकार, गलाई दुकानदार यांनी ४२ दिवस बंद पाळला होता. तेव्हासुद्धा गुढीपाडवा होता. आता कोरोनासारख्या आपत्तीने सलग दोन वर्षे गुढीपाडवा सण सुनासुना गेला आहे.