शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

‘म्हैसाळ’बाबत पालकमंत्र्यांना जाग

By admin | Updated: February 17, 2016 00:42 IST

आज मुंबईत बैठक : वीज बिलाच्या प्रश्नावर तोडग्याची अपेक्षा

सांगली : म्हैसाळ योजनेचे बिल भरायला सरकारने पैशाचा छापखाना टाकला आहे का?, असे विधान आठ दिवसांपूर्वी करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार झाल्यानंतर, आता त्यांनी या प्रश्नावर बुधवार, दि. १७ रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीस ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव तालुक्यांना दुष्काळाचे चटके सोसावे लागत आहेत. तरीही वीज बिल थकल्याच्या कारणावरून म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी पिके, फळबागा वाळून चालल्या आहेत. यास काही प्रमाणात शेतकरीही जबाबदार आहेत. मात्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना सरकारने संवेदनशीलता दाखवून थकबाकीतील काही रक्कम टंचाई निधीतून भरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर मागील आठवड्यात पालकमंत्री पाटील यांनी म्हैसाळ योजनेचे वीज बिल टंचाईतून भरण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर विविध संघटना आणि पक्षांनी त्यांचा निषेध केला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि दि. २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन पालकमंत्री पाटील यांनी या प्रश्नावर दि. १७ रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीस पाटील यांच्यासह ऊर्जामंत्री बावनकुळे, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह आमदार उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)