शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

व्यापार सुरू करण्यास पालकमंत्र्यांचा इन्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST

सांगली : विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी वेळेचे बंधन घालून व्यवसाय सुरु करण्याची मागणी रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. ...

सांगली : विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी वेळेचे बंधन घालून व्यवसाय सुरु करण्याची मागणी रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यास जयंत पाटील यांनी स्पष्टपणे नकार दर्शविला. लॉकडाऊनमुळे एकवेळ वाईटपणा स्वीकारावा लागला तरी चालेल; मात्र लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील विश्रामगृहात रविवारी सायंकाळी विविध व्यापारी प्रतिनिधींनी जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी अरुण दांडेकर, विराज कोकणे, अभय गोगटे, आप्पा कोरे, अविनाश पोरे तसेच कवठेमहांकाळ येथील व्यापारीही उपस्थित होते. राज्यातील अन्य शहरात ज्याप्रमाणे विविध व्यावसायिकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यापद्धतीने सांगली जिल्ह्यातही परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. व्यापारी पेठांचे पर्यायाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे बँकांचे हप्तेही थकीत राहिल्याच्या व्यथाही मांडण्यात आल्या.

जयंत पाटील म्हणाले की, लॉकडाऊन वाढविल्यामुळे मला अनेक घटकांचा वाईटपणा स्वीकारावा लागणार आहे, याची कल्पना आहे. तरीही लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे तूर्त व्यापारास सवलत मिळणार नाही. सांगली जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या चिंताजनक आहे. रुग्णसंख्या वाढलेली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच कडक लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोनाची साखळी कोणत्याही परिस्थितीत तोडावी लागेल. थोडे दुर्लक्ष केले तरी रुग्णसंख्या वाढत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे सध्यस्थितीत कोणतीही सवलत मिळणार नाही.

चौकट

चार दिवसांनी पुन्हा आढावा

येत्या चार दिवसात रुग्णसंख्येची काय स्थिती आहे, याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. व्यापाराला सवलत देण्याचा निर्णय हा परिस्थितीवर अवलंबून राहिल, असे जयंत पाटील म्हणाले.