शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

व्यापार सुरू करण्यास पालकमंत्र्यांचा इन्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST

सांगली : विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी वेळेचे बंधन घालून व्यवसाय सुरु करण्याची मागणी रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. ...

सांगली : विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी वेळेचे बंधन घालून व्यवसाय सुरु करण्याची मागणी रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यास जयंत पाटील यांनी स्पष्टपणे नकार दर्शविला. लॉकडाऊनमुळे एकवेळ वाईटपणा स्वीकारावा लागला तरी चालेल; मात्र लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सांगलीच्या माधवनगर रस्त्यावरील विश्रामगृहात रविवारी सायंकाळी विविध व्यापारी प्रतिनिधींनी जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी अरुण दांडेकर, विराज कोकणे, अभय गोगटे, आप्पा कोरे, अविनाश पोरे तसेच कवठेमहांकाळ येथील व्यापारीही उपस्थित होते. राज्यातील अन्य शहरात ज्याप्रमाणे विविध व्यावसायिकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यापद्धतीने सांगली जिल्ह्यातही परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. व्यापारी पेठांचे पर्यायाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे बँकांचे हप्तेही थकीत राहिल्याच्या व्यथाही मांडण्यात आल्या.

जयंत पाटील म्हणाले की, लॉकडाऊन वाढविल्यामुळे मला अनेक घटकांचा वाईटपणा स्वीकारावा लागणार आहे, याची कल्पना आहे. तरीही लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे तूर्त व्यापारास सवलत मिळणार नाही. सांगली जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती सध्या चिंताजनक आहे. रुग्णसंख्या वाढलेली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच कडक लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोनाची साखळी कोणत्याही परिस्थितीत तोडावी लागेल. थोडे दुर्लक्ष केले तरी रुग्णसंख्या वाढत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे सध्यस्थितीत कोणतीही सवलत मिळणार नाही.

चौकट

चार दिवसांनी पुन्हा आढावा

येत्या चार दिवसात रुग्णसंख्येची काय स्थिती आहे, याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. व्यापाराला सवलत देण्याचा निर्णय हा परिस्थितीवर अवलंबून राहिल, असे जयंत पाटील म्हणाले.