शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पालकमंत्र्यांकडून सांगली जिल्हा वाऱ्यावर

By admin | Updated: October 30, 2015 23:21 IST

पृथ्वीराज पाटील : आत्महत्याग्रस्त एकाही शेतकरी कुटुंबाला भेट नाही

सांगली : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल २४ शेतकऱ्यांनी कर्जप्रकरणाला कंटाळून आत्महत्या केली. सरकारी दफ्तरी केवळ नऊ शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकाही आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते, अशी टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्नी मागील सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता किती गुन्हे दाखल करावेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आत्महत्या केलेल्या एकाही शेतकरी कुटुंबाची भेट घेतली नाही. जिल्हा नियोजन समिती व पक्षीय कार्यक्रम याव्यतिरिक्त ते जिल्ह्यात कधीच फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना जिल्ह्याविषयी, येथील प्रश्नांविषयी गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. जे सरकार जिल्ह्यातील एकाही आमदाराला लाल दिवा देऊ शकत नाही, ते सरकार येथील कार्यकर्त्यांना आणि जनतेला काय देणार आहे? जिल्ह्यातील सिंचन योजनांचेही भवितव्य कठीण दिसत आहे. कॉँग्रेसने यापूर्वी एआयबीपीतून म्हैसाळ योजनेसाठी निधी मंजूर केला. मोठ्या प्रमाणावर निधी आणून योजना कार्यान्वित केल्या. सध्या ३०० कोटींची मागणी असताना फडणवीस सरकारने ताकारी, म्हैसाळ व टेंभूसाठी केवळ ६२ कोटी मंजूर केले आहेत. जिल्ह्यात २००८ ते २०१४ या कालावधित जलसंधारणाची असंख्य कामे झाली. नरेंद्र मोदी यांनी सांगलीतील सभेत ‘सांगली करुया चांगली’, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात सांगलीच्या पदरात भोपळा पडला. महागाई, दुष्काळ अशा प्रत्येक प्रश्नावर सरकार अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा एक वर्षपूर्तीनिमित्त निषेध करीत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी अजित ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)