शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पालकमंत्र्यांकडून सांगली जिल्हा वाऱ्यावर

By admin | Updated: October 30, 2015 23:21 IST

पृथ्वीराज पाटील : आत्महत्याग्रस्त एकाही शेतकरी कुटुंबाला भेट नाही

सांगली : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल २४ शेतकऱ्यांनी कर्जप्रकरणाला कंटाळून आत्महत्या केली. सरकारी दफ्तरी केवळ नऊ शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकाही आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते, अशी टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्नी मागील सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता किती गुन्हे दाखल करावेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आत्महत्या केलेल्या एकाही शेतकरी कुटुंबाची भेट घेतली नाही. जिल्हा नियोजन समिती व पक्षीय कार्यक्रम याव्यतिरिक्त ते जिल्ह्यात कधीच फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना जिल्ह्याविषयी, येथील प्रश्नांविषयी गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. जे सरकार जिल्ह्यातील एकाही आमदाराला लाल दिवा देऊ शकत नाही, ते सरकार येथील कार्यकर्त्यांना आणि जनतेला काय देणार आहे? जिल्ह्यातील सिंचन योजनांचेही भवितव्य कठीण दिसत आहे. कॉँग्रेसने यापूर्वी एआयबीपीतून म्हैसाळ योजनेसाठी निधी मंजूर केला. मोठ्या प्रमाणावर निधी आणून योजना कार्यान्वित केल्या. सध्या ३०० कोटींची मागणी असताना फडणवीस सरकारने ताकारी, म्हैसाळ व टेंभूसाठी केवळ ६२ कोटी मंजूर केले आहेत. जिल्ह्यात २००८ ते २०१४ या कालावधित जलसंधारणाची असंख्य कामे झाली. नरेंद्र मोदी यांनी सांगलीतील सभेत ‘सांगली करुया चांगली’, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात सांगलीच्या पदरात भोपळा पडला. महागाई, दुष्काळ अशा प्रत्येक प्रश्नावर सरकार अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा एक वर्षपूर्तीनिमित्त निषेध करीत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी अजित ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)