शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
2
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
3
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
4
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
5
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
6
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
7
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
8
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
9
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
10
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
11
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
12
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
13
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
14
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
15
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
16
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
17
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
18
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
19
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
20
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल

पालकमंत्र्यांकडून सांगली जिल्हा वाऱ्यावर

By admin | Updated: October 30, 2015 23:21 IST

पृथ्वीराज पाटील : आत्महत्याग्रस्त एकाही शेतकरी कुटुंबाला भेट नाही

सांगली : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल २४ शेतकऱ्यांनी कर्जप्रकरणाला कंटाळून आत्महत्या केली. सरकारी दफ्तरी केवळ नऊ शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. तरीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकाही आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतलेली नाही. त्यामुळे त्यांनी या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते, अशी टीका कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्नी मागील सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता किती गुन्हे दाखल करावेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आत्महत्या केलेल्या एकाही शेतकरी कुटुंबाची भेट घेतली नाही. जिल्हा नियोजन समिती व पक्षीय कार्यक्रम याव्यतिरिक्त ते जिल्ह्यात कधीच फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना जिल्ह्याविषयी, येथील प्रश्नांविषयी गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. जे सरकार जिल्ह्यातील एकाही आमदाराला लाल दिवा देऊ शकत नाही, ते सरकार येथील कार्यकर्त्यांना आणि जनतेला काय देणार आहे? जिल्ह्यातील सिंचन योजनांचेही भवितव्य कठीण दिसत आहे. कॉँग्रेसने यापूर्वी एआयबीपीतून म्हैसाळ योजनेसाठी निधी मंजूर केला. मोठ्या प्रमाणावर निधी आणून योजना कार्यान्वित केल्या. सध्या ३०० कोटींची मागणी असताना फडणवीस सरकारने ताकारी, म्हैसाळ व टेंभूसाठी केवळ ६२ कोटी मंजूर केले आहेत. जिल्ह्यात २००८ ते २०१४ या कालावधित जलसंधारणाची असंख्य कामे झाली. नरेंद्र मोदी यांनी सांगलीतील सभेत ‘सांगली करुया चांगली’, अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात सांगलीच्या पदरात भोपळा पडला. महागाई, दुष्काळ अशा प्रत्येक प्रश्नावर सरकार अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे आम्ही या सरकारचा एक वर्षपूर्तीनिमित्त निषेध करीत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी अजित ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)