शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

पितृपंधरवड्यात गवार खातेय भाव; भाजीमंडईत ५५, तर घराजवळ ८० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST

सांगली : पितृपंधरवड्यामध्ये पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. ती प्रथा पार पाडण्यासाठी ग्रामीण, शहरी भागात जेवणावळी घालण्याची पद्धत आहे. ...

सांगली : पितृपंधरवड्यामध्ये पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. ती प्रथा पार पाडण्यासाठी ग्रामीण, शहरी भागात जेवणावळी घालण्याची पद्धत आहे. त्यासाठी भाज्यांना खूप भाव येतो. परिणामी भाज्यांच्या किमती या आठवड्यात गगनाला भिडतात. होलसेलमध्ये गवारला ५५, तर किरकोळ विक्रीसाठी ८० रुपये किलो दर मिळत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक आणि दरही वाढल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दर नसल्यामुळेही गेल्या पंधरा दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला काढून टाकला. यातूनच सध्या भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले आहेत. गवार, वांगी किलोला ७५ ते ८० रुपये दर आहे. सिमला, श्रावण घेवडा, भेंडी, दोडका, भोपळा, टोमॅटोचे दरही चांगलेच वाढले आहेत.

चौकट

भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)

भाजीपाला - होलसेल दर - किरकोळ विक्रीदर

भोपळा - १५ - ३०

गवार - ५५ - ८०

कारली - १० - २०

वांगी - ५० - ७५

टोमॅटो - १५ - २०

बटाटे - १५ - २०

फ्लॉवर - ४० - ५०

सिमला - ३० - ५०

श्रावण घेवडा ४५ - ६०

भेंडी ३० - ४५

दोडका १५ - २५

चौकट

मागणी वाढली

पितृपंधरवड्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांतही पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. यामुळे घरोघरी जेवणावळी सुरू असल्याने भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसाला बाजारात २०० ते ३०० क्विंटल भाज्यांची आवक होत आहे. त्या तुलनेत मागणी अधिक आहे; परंतु पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

चौकट

व्यापारी काय म्हणतात...

कोट

पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे आवक घटली आहे, तसेच पितृपंधरवड्यामध्ये भाजीपाल्याचे दर नेहमीच वाढत आहेत. यामुळे सध्या भाजीपाल्यांचे ३० ते ३५ टक्के दर वाढले आहेत. हे दर महिनाभर तरी टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे.

-शिवाजी पाटील, भाजीपाला विक्रेते, सांगली

कोट

पितृपंधरवड्यात नेहमीच भाज्यांना मागणी असते; पण यावर्षी भाजीपाल्याची आवकही घटली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. हे दर भविष्यात काही दिवस तरी कायम राहतील, असा अंदाज आहे.

-किशोर सगरे, भाजीपाल्याचे होलसेल व्यापारी

चौकट

अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?

कोट

कोरोनामुळे भाजीपाला विक्रेते घरीच येत असल्यामुळे तेथूनच आम्ही घेतो. मंडईपेक्षा जादा दर आहे; पण किरकोळ भाजीसाठी मंडईला जाणे परवडत नाही. पेट्रोलचे दरही वाढल्यामुळे घरी येणाऱ्यांकडूनच भाजीपाला खरेदी करणे परवडत आहे.

-अश्विनी कुंभार, गृहिणी

कोट

आमच्या परिसरात कसबेडिग्रज, तुंग, कवलापूर परिसरातील शेतकरीच भाजीपाला विक्रीसाठी येत आहेत. ताजी भाजी आणि खात्रीशीर भाजी मिळत असल्यामुळे पैशाचा विचार न करता त्यांच्याकडूनच खरेदी करते.

-मेघा जोशी, गृहिणी