शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

पितृपंधरवड्यात गवार खातेय भाव; भाजीमंडईत ५५, तर घराजवळ ८० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:28 IST

सांगली : पितृपंधरवड्यामध्ये पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. ती प्रथा पार पाडण्यासाठी ग्रामीण, शहरी भागात जेवणावळी घालण्याची पद्धत आहे. ...

सांगली : पितृपंधरवड्यामध्ये पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. ती प्रथा पार पाडण्यासाठी ग्रामीण, शहरी भागात जेवणावळी घालण्याची पद्धत आहे. त्यासाठी भाज्यांना खूप भाव येतो. परिणामी भाज्यांच्या किमती या आठवड्यात गगनाला भिडतात. होलसेलमध्ये गवारला ५५, तर किरकोळ विक्रीसाठी ८० रुपये किलो दर मिळत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. पितृपंधरवडा सुरू असल्याने भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक आणि दरही वाढल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दर नसल्यामुळेही गेल्या पंधरा दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला काढून टाकला. यातूनच सध्या भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढले आहेत. गवार, वांगी किलोला ७५ ते ८० रुपये दर आहे. सिमला, श्रावण घेवडा, भेंडी, दोडका, भोपळा, टोमॅटोचे दरही चांगलेच वाढले आहेत.

चौकट

भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)

भाजीपाला - होलसेल दर - किरकोळ विक्रीदर

भोपळा - १५ - ३०

गवार - ५५ - ८०

कारली - १० - २०

वांगी - ५० - ७५

टोमॅटो - १५ - २०

बटाटे - १५ - २०

फ्लॉवर - ४० - ५०

सिमला - ३० - ५०

श्रावण घेवडा ४५ - ६०

भेंडी ३० - ४५

दोडका १५ - २५

चौकट

मागणी वाढली

पितृपंधरवड्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांतही पित्रांचे जेवण घालण्याची प्रथा आहे. यामुळे घरोघरी जेवणावळी सुरू असल्याने भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसाला बाजारात २०० ते ३०० क्विंटल भाज्यांची आवक होत आहे. त्या तुलनेत मागणी अधिक आहे; परंतु पावसामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

चौकट

व्यापारी काय म्हणतात...

कोट

पावसामुळे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे आवक घटली आहे, तसेच पितृपंधरवड्यामध्ये भाजीपाल्याचे दर नेहमीच वाढत आहेत. यामुळे सध्या भाजीपाल्यांचे ३० ते ३५ टक्के दर वाढले आहेत. हे दर महिनाभर तरी टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे.

-शिवाजी पाटील, भाजीपाला विक्रेते, सांगली

कोट

पितृपंधरवड्यात नेहमीच भाज्यांना मागणी असते; पण यावर्षी भाजीपाल्याची आवकही घटली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. हे दर भविष्यात काही दिवस तरी कायम राहतील, असा अंदाज आहे.

-किशोर सगरे, भाजीपाल्याचे होलसेल व्यापारी

चौकट

अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?

कोट

कोरोनामुळे भाजीपाला विक्रेते घरीच येत असल्यामुळे तेथूनच आम्ही घेतो. मंडईपेक्षा जादा दर आहे; पण किरकोळ भाजीसाठी मंडईला जाणे परवडत नाही. पेट्रोलचे दरही वाढल्यामुळे घरी येणाऱ्यांकडूनच भाजीपाला खरेदी करणे परवडत आहे.

-अश्विनी कुंभार, गृहिणी

कोट

आमच्या परिसरात कसबेडिग्रज, तुंग, कवलापूर परिसरातील शेतकरीच भाजीपाला विक्रीसाठी येत आहेत. ताजी भाजी आणि खात्रीशीर भाजी मिळत असल्यामुळे पैशाचा विचार न करता त्यांच्याकडूनच खरेदी करते.

-मेघा जोशी, गृहिणी