शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

सावळवाडीत राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST

दुधगाव : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय ...

दुधगाव : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय अज्ञातांनी पेटवले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, गट कार्यालय पेटवल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

यंदा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे संघटनेने आंदोलन स्थगित केले; परंतु कारखाने सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी तीन कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी तुकड्यामध्ये एफआरपी देण्यास सुरुवात केली आहे. राजारामबापू (साखराळे), राजारामबापू (वाटेगाव युनिट), सर्वोदय (कारंदवाडी), कुंडल येथील क्रांती या साखर कारखान्यांनी पहिला हप्ता २५०० रुपयाने देण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात पलूस तालुक्यातील घोगाव येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे गट कार्यालय एकरकमी एफआरपीसाठी पेटविल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आमदार अरुण लाड यांनी मागेल त्या शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची रक्कम देण्याचे सांगितले होते.

वसंतदादा कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसमोरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार दिवसांपूर्वी आंदोलन केले. त्यावेळी कंपनीने एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले तसेच आतापर्यंत ज्यांना पहिला हप्ता दिला, त्यांना दुसरा हप्ता दहा दिवसांत देण्याचे मान्य केले. त्यामुळे आतापर्यंत पाच कारखाने एकरकमीसाठी तयार झाले आहेत. या परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे सावळवाडी येथील गटकार्यालय पेटवून दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे जळून खाक झाली. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे स्पष्ट झाले. रविवारी रात्री दुधगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांची सभा झाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र या आंदोलनाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

फाेटाे : ११ दुधगाव १ : सावळवाडी (ता. मिरज) येथे अज्ञातांनी लावलेल्या आगीत राजारामबापू साखर कारखान्याच्या गटकार्यालयाचे नुकसान झाले.