शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सावळवाडीत राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST

दुधगाव : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय ...

दुधगाव : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय अज्ञातांनी पेटवले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, गट कार्यालय पेटवल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

यंदा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे संघटनेने आंदोलन स्थगित केले; परंतु कारखाने सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी तीन कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी तुकड्यामध्ये एफआरपी देण्यास सुरुवात केली आहे. राजारामबापू (साखराळे), राजारामबापू (वाटेगाव युनिट), सर्वोदय (कारंदवाडी), कुंडल येथील क्रांती या साखर कारखान्यांनी पहिला हप्ता २५०० रुपयाने देण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात पलूस तालुक्यातील घोगाव येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे गट कार्यालय एकरकमी एफआरपीसाठी पेटविल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आमदार अरुण लाड यांनी मागेल त्या शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची रक्कम देण्याचे सांगितले होते.

वसंतदादा कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसमोरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार दिवसांपूर्वी आंदोलन केले. त्यावेळी कंपनीने एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले तसेच आतापर्यंत ज्यांना पहिला हप्ता दिला, त्यांना दुसरा हप्ता दहा दिवसांत देण्याचे मान्य केले. त्यामुळे आतापर्यंत पाच कारखाने एकरकमीसाठी तयार झाले आहेत. या परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे सावळवाडी येथील गटकार्यालय पेटवून दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे जळून खाक झाली. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे स्पष्ट झाले. रविवारी रात्री दुधगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांची सभा झाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र या आंदोलनाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

फाेटाे : ११ दुधगाव १ : सावळवाडी (ता. मिरज) येथे अज्ञातांनी लावलेल्या आगीत राजारामबापू साखर कारखान्याच्या गटकार्यालयाचे नुकसान झाले.