शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

सावळवाडीत राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST

दुधगाव : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय ...

दुधगाव : सांगली जिल्ह्यात एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राजारामबापू कारखान्याचे गट कार्यालय अज्ञातांनी पेटवले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, गट कार्यालय पेटवल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

यंदा साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे संघटनेने आंदोलन स्थगित केले; परंतु कारखाने सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी तीन कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांनी तुकड्यामध्ये एफआरपी देण्यास सुरुवात केली आहे. राजारामबापू (साखराळे), राजारामबापू (वाटेगाव युनिट), सर्वोदय (कारंदवाडी), कुंडल येथील क्रांती या साखर कारखान्यांनी पहिला हप्ता २५०० रुपयाने देण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात पलूस तालुक्यातील घोगाव येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे गट कार्यालय एकरकमी एफआरपीसाठी पेटविल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आमदार अरुण लाड यांनी मागेल त्या शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीची रक्कम देण्याचे सांगितले होते.

वसंतदादा कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनीसमोरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार दिवसांपूर्वी आंदोलन केले. त्यावेळी कंपनीने एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले तसेच आतापर्यंत ज्यांना पहिला हप्ता दिला, त्यांना दुसरा हप्ता दहा दिवसांत देण्याचे मान्य केले. त्यामुळे आतापर्यंत पाच कारखाने एकरकमीसाठी तयार झाले आहेत. या परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे सावळवाडी येथील गटकार्यालय पेटवून दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी घडला. कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे जळून खाक झाली. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन चिघळल्याचे स्पष्ट झाले. रविवारी रात्री दुधगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांची सभा झाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन दिवसांपूर्वी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र या आंदोलनाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

फाेटाे : ११ दुधगाव १ : सावळवाडी (ता. मिरज) येथे अज्ञातांनी लावलेल्या आगीत राजारामबापू साखर कारखान्याच्या गटकार्यालयाचे नुकसान झाले.