शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाड परिसरातील गुंठेवारीत उडाली दैना

By admin | Updated: July 14, 2016 00:12 IST

नगरसेवकांकडून दुर्लक्ष : दलदलीच्या रस्त्यांवर प्रशासनाने त्वरित मुरूम टाकण्याची मागणी

कुपवाड : सांगली, मिरजेच्या मानाने अद्यापही अविकसित असलेल्या कुपवाड शहरातील उपनगरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुंठेवारी क्षेत्रामधील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाबरोबरच नगरसेवकांकडून सतत होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दलदल झालेल्या भागातील रस्त्यावर प्रशासनाने त्वरित मुरूम टाकण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महापालिकेची स्थित्यंतरे अनुभवलेल्या कुपवाड शहराची अवस्था अजूनही खेड्यासारखीच आहे. महापालिकेची स्थापना होऊन सोळा वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही अजून या शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. सांगली, मिरजेच्या मानाने या शहरात कमी विकास पाहावयास मिळतो. कुपवाडच्या नगरसेवकांमध्ये एकी नसल्याचा फटका प्रामुख्याने या शहराला बसला आहे. त्यामुळेच अजून कुपवाड शहरासह उपनगरांचा विकास झालेला नाही, असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. सांगली, मिरजेपेक्षा सध्या कुपवाडमध्ये गुंठेवारीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. या भागात गोरगरीब नागरिकांनी आपल्या कुवतीनुसार कमी पैशामध्ये जागा घेऊन गुंठेवारी क्षेत्रात घरे बांधली आहेत. पण त्याठिकाणी अजूनही महापालिकेच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. याठिकाणी रस्त्याची कमतरता आहे. तसेच गटारी नाहीत. आरोग्य विभागाच्या सुविधाही मिळत नाहीत. तरीही नागरिक प्रामाणिकपणे कर भरत असून कर भरण्यातही कुपवाड शहरातील नागरिक आघाडीवर आहेत. शहरातील व्यापारी संघटना, कुपवाड संघर्ष समिती, राष्ट्रवादी, भाजप आदी पक्षांनी शहरातील सुविधांसाठी आंदोलने केली आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कायमच या शहराकडे दुर्लक्ष केले जात आहे. कुपवाड शहरात वाघमोडेनगर, श्रीमंती कॉलनी, साईनगर, रामकृष्णनगर, ढवळेश्वर कॉलनी, प्रकाशनगर, ढालाईतनगर, गंगानगर, वारणालीतील दुर्लक्षित भाग, शिवशक्तीनगर आदी भागातील गुंठेवारी क्षेत्रात सध्या रस्ते नसल्याने सततच्या पावसामुळे चिखल होऊन व साठलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नागरिकांना चिखलातून मार्ग काढणे अवघड होऊ लागले आहे. मोठ्या प्रमाणात दलदल झाल्याने नागरिकांची दैना उडाली आहे. मुरूम टाकल्यास रस्त्यावर झालेली दलदल कमी होऊन नागरिकांना येणे-जाणे सोयीचे होईल, त्यामुळे महापालिकेने या भागात पावसाळी मुरूमाची लवकरात लवकर सोय करावी, अशी मागणीही नागरिकांतून होऊ लागली आहे. (वार्ताहर)