शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कुपवाड परिसरातील गुंठेवारीत उडाली दैना

By admin | Updated: July 14, 2016 00:12 IST

नगरसेवकांकडून दुर्लक्ष : दलदलीच्या रस्त्यांवर प्रशासनाने त्वरित मुरूम टाकण्याची मागणी

कुपवाड : सांगली, मिरजेच्या मानाने अद्यापही अविकसित असलेल्या कुपवाड शहरातील उपनगरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुंठेवारी क्षेत्रामधील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाबरोबरच नगरसेवकांकडून सतत होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दलदल झालेल्या भागातील रस्त्यावर प्रशासनाने त्वरित मुरूम टाकण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महापालिकेची स्थित्यंतरे अनुभवलेल्या कुपवाड शहराची अवस्था अजूनही खेड्यासारखीच आहे. महापालिकेची स्थापना होऊन सोळा वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही अजून या शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. सांगली, मिरजेच्या मानाने या शहरात कमी विकास पाहावयास मिळतो. कुपवाडच्या नगरसेवकांमध्ये एकी नसल्याचा फटका प्रामुख्याने या शहराला बसला आहे. त्यामुळेच अजून कुपवाड शहरासह उपनगरांचा विकास झालेला नाही, असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. सांगली, मिरजेपेक्षा सध्या कुपवाडमध्ये गुंठेवारीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. या भागात गोरगरीब नागरिकांनी आपल्या कुवतीनुसार कमी पैशामध्ये जागा घेऊन गुंठेवारी क्षेत्रात घरे बांधली आहेत. पण त्याठिकाणी अजूनही महापालिकेच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. याठिकाणी रस्त्याची कमतरता आहे. तसेच गटारी नाहीत. आरोग्य विभागाच्या सुविधाही मिळत नाहीत. तरीही नागरिक प्रामाणिकपणे कर भरत असून कर भरण्यातही कुपवाड शहरातील नागरिक आघाडीवर आहेत. शहरातील व्यापारी संघटना, कुपवाड संघर्ष समिती, राष्ट्रवादी, भाजप आदी पक्षांनी शहरातील सुविधांसाठी आंदोलने केली आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कायमच या शहराकडे दुर्लक्ष केले जात आहे. कुपवाड शहरात वाघमोडेनगर, श्रीमंती कॉलनी, साईनगर, रामकृष्णनगर, ढवळेश्वर कॉलनी, प्रकाशनगर, ढालाईतनगर, गंगानगर, वारणालीतील दुर्लक्षित भाग, शिवशक्तीनगर आदी भागातील गुंठेवारी क्षेत्रात सध्या रस्ते नसल्याने सततच्या पावसामुळे चिखल होऊन व साठलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नागरिकांना चिखलातून मार्ग काढणे अवघड होऊ लागले आहे. मोठ्या प्रमाणात दलदल झाल्याने नागरिकांची दैना उडाली आहे. मुरूम टाकल्यास रस्त्यावर झालेली दलदल कमी होऊन नागरिकांना येणे-जाणे सोयीचे होईल, त्यामुळे महापालिकेने या भागात पावसाळी मुरूमाची लवकरात लवकर सोय करावी, अशी मागणीही नागरिकांतून होऊ लागली आहे. (वार्ताहर)