शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
5
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
6
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
7
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
8
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
9
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
10
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
11
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
12
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
13
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
14
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
15
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
16
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
17
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
18
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन
19
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
20
Operation Sindoor: अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

कुपवाड परिसरातील गुंठेवारीत उडाली दैना

By admin | Updated: July 14, 2016 00:12 IST

नगरसेवकांकडून दुर्लक्ष : दलदलीच्या रस्त्यांवर प्रशासनाने त्वरित मुरूम टाकण्याची मागणी

कुपवाड : सांगली, मिरजेच्या मानाने अद्यापही अविकसित असलेल्या कुपवाड शहरातील उपनगरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गुंठेवारी क्षेत्रामधील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. महापालिका प्रशासनाबरोबरच नगरसेवकांकडून सतत होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दलदल झालेल्या भागातील रस्त्यावर प्रशासनाने त्वरित मुरूम टाकण्याची मागणी होत आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महापालिकेची स्थित्यंतरे अनुभवलेल्या कुपवाड शहराची अवस्था अजूनही खेड्यासारखीच आहे. महापालिकेची स्थापना होऊन सोळा वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही अजून या शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. सांगली, मिरजेच्या मानाने या शहरात कमी विकास पाहावयास मिळतो. कुपवाडच्या नगरसेवकांमध्ये एकी नसल्याचा फटका प्रामुख्याने या शहराला बसला आहे. त्यामुळेच अजून कुपवाड शहरासह उपनगरांचा विकास झालेला नाही, असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. सांगली, मिरजेपेक्षा सध्या कुपवाडमध्ये गुंठेवारीचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. या भागात गोरगरीब नागरिकांनी आपल्या कुवतीनुसार कमी पैशामध्ये जागा घेऊन गुंठेवारी क्षेत्रात घरे बांधली आहेत. पण त्याठिकाणी अजूनही महापालिकेच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. याठिकाणी रस्त्याची कमतरता आहे. तसेच गटारी नाहीत. आरोग्य विभागाच्या सुविधाही मिळत नाहीत. तरीही नागरिक प्रामाणिकपणे कर भरत असून कर भरण्यातही कुपवाड शहरातील नागरिक आघाडीवर आहेत. शहरातील व्यापारी संघटना, कुपवाड संघर्ष समिती, राष्ट्रवादी, भाजप आदी पक्षांनी शहरातील सुविधांसाठी आंदोलने केली आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून कायमच या शहराकडे दुर्लक्ष केले जात आहे. कुपवाड शहरात वाघमोडेनगर, श्रीमंती कॉलनी, साईनगर, रामकृष्णनगर, ढवळेश्वर कॉलनी, प्रकाशनगर, ढालाईतनगर, गंगानगर, वारणालीतील दुर्लक्षित भाग, शिवशक्तीनगर आदी भागातील गुंठेवारी क्षेत्रात सध्या रस्ते नसल्याने सततच्या पावसामुळे चिखल होऊन व साठलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नागरिकांना चिखलातून मार्ग काढणे अवघड होऊ लागले आहे. मोठ्या प्रमाणात दलदल झाल्याने नागरिकांची दैना उडाली आहे. मुरूम टाकल्यास रस्त्यावर झालेली दलदल कमी होऊन नागरिकांना येणे-जाणे सोयीचे होईल, त्यामुळे महापालिकेने या भागात पावसाळी मुरूमाची लवकरात लवकर सोय करावी, अशी मागणीही नागरिकांतून होऊ लागली आहे. (वार्ताहर)