शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारास जन्मभूमीत अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:11 IST

कडेगाव : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची ३४ वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगावी देवराष्ट्रे येथे रविवारी, २५ रोजी विविध ...

कडेगाव : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची ३४ वी पुण्यतिथी त्यांच्या जन्मगावी देवराष्ट्रे येथे रविवारी, २५ रोजी विविध उपक्रमांनी साजरी झाली. यानिमित्ताने आ. मोहनराव कदम, आ. डॉ. विश्वजित कदम, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी देवराष्ट्रे येथे यशवंतरावांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम यशवंतरावांनी केले. आपल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी मुख्यमंत्री पदाबरोबरच केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, देवराष्ट्रेचे सरपंच प्रकाश मोरे, साहित्यिक अनिल बोधे, कवी प्रदीप पाटील, केन अ‍ॅग्रो कारखान्याचे संचालक धोंडीराम महिंद, क्रांती कारखान्याचे संचालक भीमराव महिंद, पंचायत समिती सदस्या स्मिता महिंद, माजी उपसभापती मोहनराव मोरे, तानाजी महिंद, प्रमोद गावडे, माणिक मोरे, बाळासाहेब पवार, आत्माराम ठोंबरे, लक्ष्मण पाटील, संजय मोरे, महादेवराव महिंद, मोहिते वडगावचे सरपंच विजय मोहिते, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुनील जगदाळे आदींसह ग्रामस्थ, युवक तसेच देवराष्ट्रे व परिसरातील यशवंतप्रेमींनी एकत्र येत त्यांच्या जन्मघर स्मारकास भेट देऊन पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या कार्याचा आढावा घेण़्यात आला.स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार : संग्रामसिंह देशमुखयशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाचे काम शेजारील जागेच्या भूसंपादन प्रक्रियेच्या पूर्णत्वाअभावी रखडले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या व संबंधित अधिकाºयांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करून रखडलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.स्मारकप्रश्नी औचित्याचा मुद्दा : विश्वजित कदमयशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाशेजारील जागा संपादनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे स्मारकाचे काम रखडले आहे. या कामासाठी २ कोटी १७ लाखांचा निधी आघाडी शासनाच्या काळात मंजूर झालेला आहे. यामुळे जमीन संपादनाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून रखडलेले काम पूर्ण करावे, यासाठी विधानसभेच्या चालू असलेल्या अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले.