शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

६० कोटींच्या एलईडी प्रकल्पाला हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे बसवण्याच्या साठ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला बुधवारी स्थायी समिती सभेत मंजुरी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे बसवण्याच्या साठ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला बुधवारी स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. लवकरच या प्रकल्पाची निविदाप्रक्रिया पूर्ण केले जाणार आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर सहा महिन्यांत शहरातील सर्व रस्ते एलईडीने उजळून निघतील, असे सभापती पांडुरंग कोरे यांनी सांगितले.

सध्या महापालिका क्षेत्रात ३२ हजार पथदिवे आहेत, तर एक हजार ६०० नवीन विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून महापालिकेने विद्युत साहित्यांची खरेदी केलेली नाही. शहरातील अनेक पथदिवे बंद आहेत. विशेषत: उपनगरातील अनेक भागांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी वारंवार विद्युत साहित्याची मागणी करून येईल त्यांना साहित्य पुरवठा झालेला नाही राज्य शासनाने ईईएसएल या खासगी कंपनीला एलईडी पथदिवे बसविण्याचा ठेका दिला आहे, पण कंपनीच्या अटी व शर्तीमुळे महापालिकेला १५ ते २० कोटी रुपयांचा बोजा सहन करावा लागणार होता. त्यासाठी ईईएसएल कंपनीपेक्षा कमी दराने एलईडी दिवे बसवून देणाऱ्याला ठेका देण्याचा ठराव महासभेने केला होता.

महासभेच्या या ठरावाला नगरविकास विभागाने मंजुरी दिली. त्यानंतर प्रशासनाने एलईडी दिवे बसवण्यासाठी निविदा मागविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठवला. त्यावर बुधवारी सभेत चर्चा झाली. आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रकल्पाबद्दल माहिती दिली. चर्चेनंतर या प्रकल्पाची निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली.

याबाबत सभापती कोरे म्हणाले की, एलईडी प्रकल्पासाठी सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली. येत्या महिन्या-दीड महिन्यात निविदाप्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली जाईल. दिवे बसविण्याकरिता त्याला सहा महिन्यांची मुदत असेल. वीजबिलाच्या बचतीमधून ठेकेदाराला पैसे दिले जाणार आहे. तसेच दिवा बंद पडल्यानंतर २४ तासांत बदलण्याचे बंधने असेल. त्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

चौकट

विद्युत कर्मचारी राहणार कायम

महापालिकेच्या विद्युत विभागाकडे कायम व मानधनावरील ५२ कर्मचारी आहे. एलईडीचा ठेका दिल्यानंतर कंपनीला २२ कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे उर्वरित ३० कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार होती. त्यावर मंगेश चव्हाण, अनारकली कुरणे, दिग्विजय सूर्यवंशी, मोहना ठाणेदार यांनी या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम ठेवण्याचे मागणी केली त्याला प्रशासनानेही होकार दिला.