शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दर कोसळल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST

घाटनांद्रे : कवठेमहांकाळच्या घाटमाथ्यासह तालुक्यातील जवळपास पन्नास ते साठ टक्के द्राक्षबागा सध्या विक्री योग्य बनल्या आहेत. परंतु बाजारातील दरच ...

घाटनांद्रे : कवठेमहांकाळच्या घाटमाथ्यासह तालुक्यातील जवळपास पन्नास ते साठ टक्के द्राक्षबागा सध्या विक्री योग्य बनल्या आहेत. परंतु बाजारातील दरच कोसळल्याने व दलालानीही पाठ फिरविल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे.

म्हैसाळ याेजनेचे पाणी आल्यानंतर नगदी पीक म्हणून दुष्काळी भागातील शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळत आहे. आपसूकच द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले व बळीराजाचा आर्थिक कणा बनले. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, वारा, वादळ, रोगराई अशा अनेक संकटांवर मात करत करत जगवलेल्या या द्राक्षबागांना चालू वर्षी उत्पादन चांगले आहे. मात्र, दर कोसळल्याने व मालाचा उठाव थांबल्याने एक नवे संकट ओढवले आहे.

सध्या तालुक्यातील पन्नास ते साठ टक्के द्राक्षबागा या विक्रीयोग्य बनल्या आहेत. परंतु दरच नसल्याने व दलालही उत्साह दाखवत नसल्याने या तयार मालाचे काय करायचे हा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

सध्या द्राक्षाचा दर चार किलाेच्या पेटीस १२५ ते १५० रुपयांवर आहे. व्यापारी दलालही नेहमीप्रमाणे विविध कारणे सांगून दर पाडून मागत आहेत. विविध संकटांचा पूर्वानुभव लक्षात घेता बळीराजाही येईल त्या दराला द्राक्षबागा देण्यास तयार होत आहे. अद्याप शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. याेग्य दर न मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीची तयारी ठेवली आहे.

फाेटाे : १० घाटनांद्रे १

ओळ : कवठेमहांकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील बहुतांश द्राक्षबागा तयार झाल्या आहेत.