शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्र्यरेषेचे प्रश्न ग्रामपंचायतींनी सोडवावेत

By admin | Updated: October 1, 2016 00:18 IST

जयंत पाटील : नवेखेड येथून उपक्रमाचा प्रारंभ करण्याचे आवाहन; ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन

इस्लामपूर : आम्हास कोण विचारत नाही, अशी साधारणपणे गोरगरीब समाजामध्ये भावना असते़ ही भावना कमी करण्यासाठी वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दर महिन्यास दारिद्र्यरेषेखालील ५ ते १0 कुटुंबांना बोलावून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा़ या उपक्रमाची सुरूवात नवेखेड गावाने करावी, असे आवाहन माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले.नवेखेड (ता़ वाळवा) येथे ४४ लाख रूपये खर्चून बांधलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे आ़ पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी दलित वस्ती सुधार योजना, गावातील गटार बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामांचा प्रारंभही करण्यात आला, याप्रसंगी आ़ पाटील बोलत होते़ जि. म. बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा़ शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आ़ पाटील पुढे म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आज विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून राज्यात आदर्शवत काम करीत आहेत. गावा-गावातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य माणसाला गावाच्या विकास प्रक्रियेत सामावून घ्यायला हवे़ ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीमुळे गावाच्या वैभवात निश्चितपणे भर पडेल़ आपण यापूर्वी पिण्याच्या पाण्याची योजना, सभागृह, गटारी यासह अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.यावेळी उपअभियंता रामचंद्र चव्हाण, माणिक पाटील, डी़ ए़ पाटील यांचा आ़ पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शामराव पवार यांनी प्रास्ताविक केले. माजी कामगार संचालक राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले़ प्रा़ बी़ डी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले़ याप्रसंगी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, डी़ बी़ पाटील, बाबूराव चव्हाण, सरपंच सौ़ भारती जाधव, उपसरपंच रवींद्र चव्हाण, माजी सरपंच सौ़ शीतल पाटील, सौ़ छाया जाधव, बी़ ए़ पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप चव्हाण, बालाजी निकम, सयाजी कदम, हरिभाऊ पाटील, सुहासकाका पाटील, बँकेचे संचालक धनाजी पाटील, रंगराव पाटील, बाबासाहेब पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, ग्रामसेवक एस़ एस़ पाटील उपस्थित होते.(वार्ताहर)मतदारसंघ : एकचनवेखेड व जुनेखेड या दोन्ही गावांचा वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदार संघात समावेश झाल्याचे दिसते़ मात्र ही दोन्ही गावे पूर्वीपासून एकच असल्याने ही गावे कोणत्याही एकाच मतदार संघात येण्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.