शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दारिद्र्यरेषेचे प्रश्न ग्रामपंचायतींनी सोडवावेत

By admin | Updated: October 1, 2016 00:18 IST

जयंत पाटील : नवेखेड येथून उपक्रमाचा प्रारंभ करण्याचे आवाहन; ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन

इस्लामपूर : आम्हास कोण विचारत नाही, अशी साधारणपणे गोरगरीब समाजामध्ये भावना असते़ ही भावना कमी करण्यासाठी वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी दर महिन्यास दारिद्र्यरेषेखालील ५ ते १0 कुटुंबांना बोलावून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा़ या उपक्रमाची सुरूवात नवेखेड गावाने करावी, असे आवाहन माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले.नवेखेड (ता़ वाळवा) येथे ४४ लाख रूपये खर्चून बांधलेल्या ग्रामपंचायत इमारतीचे आ़ पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी दलित वस्ती सुधार योजना, गावातील गटार बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामांचा प्रारंभही करण्यात आला, याप्रसंगी आ़ पाटील बोलत होते़ जि. म. बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा़ शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी़ के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आ़ पाटील पुढे म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचारांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आज विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून राज्यात आदर्शवत काम करीत आहेत. गावा-गावातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य माणसाला गावाच्या विकास प्रक्रियेत सामावून घ्यायला हवे़ ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीमुळे गावाच्या वैभवात निश्चितपणे भर पडेल़ आपण यापूर्वी पिण्याच्या पाण्याची योजना, सभागृह, गटारी यासह अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.यावेळी उपअभियंता रामचंद्र चव्हाण, माणिक पाटील, डी़ ए़ पाटील यांचा आ़ पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शामराव पवार यांनी प्रास्ताविक केले. माजी कामगार संचालक राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले़ प्रा़ बी़ डी. जाधव यांनी सूत्रसंचालन केले़ याप्रसंगी बाळासाहेब पाटील, संजय पाटील, डी़ बी़ पाटील, बाबूराव चव्हाण, सरपंच सौ़ भारती जाधव, उपसरपंच रवींद्र चव्हाण, माजी सरपंच सौ़ शीतल पाटील, सौ़ छाया जाधव, बी़ ए़ पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप चव्हाण, बालाजी निकम, सयाजी कदम, हरिभाऊ पाटील, सुहासकाका पाटील, बँकेचे संचालक धनाजी पाटील, रंगराव पाटील, बाबासाहेब पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, ग्रामसेवक एस़ एस़ पाटील उपस्थित होते.(वार्ताहर)मतदारसंघ : एकचनवेखेड व जुनेखेड या दोन्ही गावांचा वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदार संघात समावेश झाल्याचे दिसते़ मात्र ही दोन्ही गावे पूर्वीपासून एकच असल्याने ही गावे कोणत्याही एकाच मतदार संघात येण्यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.