शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत पाणी याेजनांमधील अपहार गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST

जत : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाणीपुरवठा योजनेतील अपहाराचा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजणार असून, यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. ...

जत : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाणीपुरवठा योजनेतील अपहाराचा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजणार असून, यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची या प्रश्नावरून विरोधकांना तोंड देताना नामुष्की होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जत तालुक्यात तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी घोलेश्वर, गुगवाड, करेवाडी (तिकोंडी), लमाण तांडा (उटगी), उमराणी, वळसंग या सहा गावांतील भारत निर्माण, महाजल व राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. सन २००८-०९ पासून या योजनेवर वरील सहा गावांत सुमारे १६ कोटी ७७ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, पाणीपुरवठा योजनेचे काम संबंधितांकडून पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला जिल्हा परिषद प्रशासनाने आता वाचा फोडली आहे.

शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. गावातील अंतर्गत मतभेद, राजकीय सत्तासंघर्ष व इतर तांत्रिक कारणामुळे मागील बारा वर्षांपासून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात संबंधितांना यश आले नाही. त्यामुळे काही ठिकाणी पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी पायपीट व भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात हा मुद्दा चर्चेला येऊन, त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. निवडणूक प्रचारातील हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

चौकट

फाैजदारीचे आदेश

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी १० दिवसांपूर्वी जत येथे बैठक घेऊन अपूर्ण पाणीपुरवठा असलेल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव व तांत्रिक सल्लागार यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आदेश दिला आहे.