शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत पाणी याेजनांमधील अपहार गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST

जत : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाणीपुरवठा योजनेतील अपहाराचा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजणार असून, यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. ...

जत : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाणीपुरवठा योजनेतील अपहाराचा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजणार असून, यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची या प्रश्नावरून विरोधकांना तोंड देताना नामुष्की होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जत तालुक्यात तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी घोलेश्वर, गुगवाड, करेवाडी (तिकोंडी), लमाण तांडा (उटगी), उमराणी, वळसंग या सहा गावांतील भारत निर्माण, महाजल व राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. सन २००८-०९ पासून या योजनेवर वरील सहा गावांत सुमारे १६ कोटी ७७ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, पाणीपुरवठा योजनेचे काम संबंधितांकडून पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला जिल्हा परिषद प्रशासनाने आता वाचा फोडली आहे.

शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. गावातील अंतर्गत मतभेद, राजकीय सत्तासंघर्ष व इतर तांत्रिक कारणामुळे मागील बारा वर्षांपासून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात संबंधितांना यश आले नाही. त्यामुळे काही ठिकाणी पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी पायपीट व भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात हा मुद्दा चर्चेला येऊन, त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. निवडणूक प्रचारातील हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

चौकट

फाैजदारीचे आदेश

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी १० दिवसांपूर्वी जत येथे बैठक घेऊन अपूर्ण पाणीपुरवठा असलेल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव व तांत्रिक सल्लागार यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आदेश दिला आहे.