शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ग्रामपंचायत निवडणुकीत पाणी याेजनांमधील अपहार गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:19 IST

जत : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाणीपुरवठा योजनेतील अपहाराचा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजणार असून, यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. ...

जत : जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पाणीपुरवठा योजनेतील अपहाराचा मुद्दा निवडणूक प्रचारात गाजणार असून, यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची या प्रश्नावरून विरोधकांना तोंड देताना नामुष्की होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जत तालुक्यात तीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी घोलेश्वर, गुगवाड, करेवाडी (तिकोंडी), लमाण तांडा (उटगी), उमराणी, वळसंग या सहा गावांतील भारत निर्माण, महाजल व राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात आले आहे. सन २००८-०९ पासून या योजनेवर वरील सहा गावांत सुमारे १६ कोटी ७७ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, पाणीपुरवठा योजनेचे काम संबंधितांकडून पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मागील १२ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाला जिल्हा परिषद प्रशासनाने आता वाचा फोडली आहे.

शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. गावातील अंतर्गत मतभेद, राजकीय सत्तासंघर्ष व इतर तांत्रिक कारणामुळे मागील बारा वर्षांपासून पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात संबंधितांना यश आले नाही. त्यामुळे काही ठिकाणी पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी पायपीट व भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात हा मुद्दा चर्चेला येऊन, त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. निवडणूक प्रचारातील हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

चौकट

फाैजदारीचे आदेश

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी १० दिवसांपूर्वी जत येथे बैठक घेऊन अपूर्ण पाणीपुरवठा असलेल्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव व तांत्रिक सल्लागार यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आदेश दिला आहे.