शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

राज्यपालांनी सरकारला शेतक-यांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST

इस्लामपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची सरळसरळ फसवणूक केली आहे. वीज बिल वसुलीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात ...

इस्लामपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची सरळसरळ फसवणूक केली आहे. वीज बिल वसुलीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान करणे हे घटनेला व कायद्याला धरून होत नाही. त्यामुळे राज्यपालांनी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित न करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात देशात पंजाबसह अनेक राज्यात शेतीला मोफत वीज पुरवठा होत आहे. २००४ च्या निवडणूक वेळी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करून निवडणुकीआधी दोन महिने शून्य रकमेची वीज बिले दिली. निवडणुका जिंकल्यानंतर त्या वीज बिलाची वसुली सुरू केली. त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एकूण वीज बिलाच्या ६७ टक्के रक्कम सरकार भरेल आणि ३३ टक्के वीज बिलाची रक्कम शेतकऱ्यांनी भरावी, अशी तडजोड झाली. त्यानुसार सरकारने वीज वितरण कंपनीला दरवर्षी ५, ६ आणि ७ हजार कोटी रुपये अदा केले. वास्तविकपणे इतक्या रकमेची वीज महामंडळाने शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे महामंडळाकडे शिल्लक आहेत. ही बाब २०१० साली मुुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी न्यायालयाने १५ दिवसांची नोटीस दिल्याखेरीज शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे आदेश दिले.

मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी २ मार्च रोजी शेतकऱ्यांचा वीज पुुरवठा खंडित केला जाणार नाही, असे जाहीर केले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी १० मार्चला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज बिले वसूल करण्याचे व त्यासाठी वीज पुुरवठा खंडित करण्याचे आदेश देत शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केल्याचा आरोप पाटील यांनी निवेदनात केला आहे.