शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
3
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
4
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
5
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
6
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
7
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
8
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
9
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
10
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
11
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
12
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
13
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
14
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
15
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
16
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
17
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
18
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
19
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
20
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप

राज्यपालांनी सरकारला शेतक-यांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST

इस्लामपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची सरळसरळ फसवणूक केली आहे. वीज बिल वसुलीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात ...

इस्लामपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची सरळसरळ फसवणूक केली आहे. वीज बिल वसुलीबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान करणे हे घटनेला व कायद्याला धरून होत नाही. त्यामुळे राज्यपालांनी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित न करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात देशात पंजाबसह अनेक राज्यात शेतीला मोफत वीज पुरवठा होत आहे. २००४ च्या निवडणूक वेळी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा करून निवडणुकीआधी दोन महिने शून्य रकमेची वीज बिले दिली. निवडणुका जिंकल्यानंतर त्या वीज बिलाची वसुली सुरू केली. त्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एकूण वीज बिलाच्या ६७ टक्के रक्कम सरकार भरेल आणि ३३ टक्के वीज बिलाची रक्कम शेतकऱ्यांनी भरावी, अशी तडजोड झाली. त्यानुसार सरकारने वीज वितरण कंपनीला दरवर्षी ५, ६ आणि ७ हजार कोटी रुपये अदा केले. वास्तविकपणे इतक्या रकमेची वीज महामंडळाने शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे महामंडळाकडे शिल्लक आहेत. ही बाब २०१० साली मुुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी न्यायालयाने १५ दिवसांची नोटीस दिल्याखेरीज शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे आदेश दिले.

मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी २ मार्च रोजी शेतकऱ्यांचा वीज पुुरवठा खंडित केला जाणार नाही, असे जाहीर केले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी १० मार्चला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज बिले वसूल करण्याचे व त्यासाठी वीज पुुरवठा खंडित करण्याचे आदेश देत शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक केल्याचा आरोप पाटील यांनी निवेदनात केला आहे.