शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी सरकारचे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST

सांगली : सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी सरकारचे नाते जोडले गेले आहे. सत्ताधाऱ्यांनी शिवशाहीऐवजी केवळ ठोकशाही पद्धतीने राज्य चालविण्यास सुरुवात केली ...

सांगली : सर्व प्रकारच्या गुन्ह्यांशी सरकारचे नाते जोडले गेले आहे. सत्ताधाऱ्यांनी शिवशाहीऐवजी केवळ ठोकशाही पद्धतीने राज्य चालविण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, राज्यातील एक मंत्री अनैतिक संबंधाबद्दलची कबुली देतो. दुसऱ्या एका मंत्र्यांचे नाव तरुणीच्या आत्महत्येशी जोडले जाते. ड्रग प्रकरणातही दिग्गज नेत्याच्या पुत्राचे नाव चर्चेत येते. एका मंत्र्याच्या बंगल्यात तरुणाला मारहाण केली जाते. अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सरकारमधील मंत्री व त्यांचे नातलग बदनाम होत असताना सरकार त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी दडपशाहीचे दर्शन घडवित आहे. शिवरायांच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यामध्ये जे काही चालले आहे, ते राज्याच्या प्रतिमेला तडा देणारे आहे.

निष्क्रियतेचीही सरकारने परिसीमा गाठली आहे. कोरोनाच्या उपाययोजनांवर एक रुपयाचाही खर्च राज्य सरकारने केला नाही. पीपीई किटपासून लसीकरणापर्यंतचा सर्व खर्च केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला केंद्राकडे बोट करण्याचा कोणताही अधिकार नाही. या सरकारने छोटे व्यावसायिक, शेतकरी, महिला, मजूर, कामगार, कर्मचारी यांच्यासाठी काय केले, हे जाहीर करावे. सरकारची सध्याची अवस्था ही 'नाचता येईना, अंगण वाकडे' अशी झाली आहे.

पूजा चव्हाणच्या प्रकरणात या सरकारने कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. या प्रकरणातील ऑडिओ क्लिप्स का तपासल्या गेल्या नाहीत? सरकार बहिरे झाले आहे का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

पवारांना माझ्याशिवाय करमत नाही

पाटील म्हणाले की, शरद पवारांना मी काही त्यांच्याविषयी बोललो नाही, तर करमत नाही. त्यामुळे मी काही बोललो नाही, तरी ते माझ्याविषयी काहीतरी बोलत असतात. त्यांनी राज्यातील बदनाम मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे. त्यांना आम्ही परिपक्व नेते म्हणतो. तरीही ते काही कारवाई करीत नाहीत.

पडळकरांनी नीट बोलावे

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले की, जे बोलायचे आहे, जे करायचे आहे ते पडळकरांनी करावे, मात्र नीट बोलावे. धनगर समाजाला या राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांकडून काय त्रास झाला आहे, हे पडळकरांनाच माहीत आहे. त्यामुळे ते आक्रमकपणे भांडतात.