शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

दुष्काळी प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: January 22, 2016 01:05 IST

सुप्रिया सुळे : उमदीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; विविध विकास कामांचे उद्घाटन

उमदी : दुष्काळी प्रश्नांकडे राज्य शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष असून, ‘कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र’, असा प्रश्न त्यांना विचारावा लागणार आहे. दुष्काळी उपाययोजनांसाठी जत तहसील कार्यालयावर लवकरच मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.उमदी येथील उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटन खा. सुप्रियाताई सुळे यांच्या झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आ. जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील, जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर उपस्थित होत्या. यावेळी खा. सुप्रियाताई सुळे यांच्याहस्ते ‘आधार’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खा. सुळे म्हणाल्या, दुष्काळी समस्या सोडविण्यासाठी सध्याचे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. याच्या निषेधार्थ लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जत तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल. याची जबाबदारी आ. जयंत पाटील यांच्यावर त्यांनी सोपविली. जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी जिल्ह्याचा विकास केला आहे. यावरुन शरद पवार यांचे महिला धोरण यशस्वी झाल्याचे सिध्द होते. यापुढेही कारभार महिलांच्या हाती आल्यास कामे निश्चितच चांगली होणार आहेत. सत्तेचे विकेंद्रीकरण अत्यंत गरजेचे आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत दुष्काळी समस्या, म्हैसाळ योजनेचे पाणी यासाठी मुख्यमंत्री यांना भेटून चर्चा केलेली आहे, असे असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दुष्काळी जतच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही खा. सुळे यांनी दिली.सरकारची सत्तेपूर्वीची आणि आताची भाषणे यात खूप फरक आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्यांना तुम्हीच पहा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.सध्याचे सरकार अडचणीत सापडले आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योगधंदे यात महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला आहे. सध्या मात्र तिसऱ्या क्रमांकावर माझा महाराष्ट्र आहे. आ. जयंत पाटील म्हणाले की, सरकारचे डोळे दुष्काळाबाबत झाकलेले आहेत. हे सरकार दुष्काळी प्रश्न सोडविणार का? असा प्रश्न आहे. येत्या काही दिवसात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जत तहसील कार्यालयावर दुष्काळी प्रश्नांसाठी मोर्चा काढणार आहोत.आ. सुमनताई पाटील म्हणाल्या की, जत तालुक्याला दुष्काळ पाचवीला पूजलेला आहे. म्हैसाळ योजना सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जर मागून मिळत नसेल, तर हिसकावून घेऊ . यावेळी राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या मोहिनी चव्हाण व आशाराणी इम्मन्नवर यांचा सत्कार खा. सुळे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. प्रास्ताविक अ‍ॅड. चन्नाप्पान्ना होर्तीकर यांनी केले. यावेळी लिंबाजी पाटील, बाबासाहेब मुळीक, गजानन कोठावळे, उज्ज्वला लांडगे, मनीषा पाटील, स्मिता पाटील, बसवराज धोंडमल, बाळासाहेब पाटील, पपाली कचरे, अण्णासाहेब गडदे, सिद्धाप्पा शिरसाड, संतोष पाटील, तम्मणगौडा पाटील, नजमा मकानदार, अमृतानंद महास्वामी, रेवाप्पा लोणी, वाहब मुल्ला, फिरोज मुल्ला, उत्तम चव्हाण, पिरसाहेब जमादार, महादेवप्पा होर्ती, निसारभाई मुल्ला आदी उपस्थित होते. (वार्ताहर)