शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शासकीय आरोग्य सेवा खासगी करण्याकडे सरकारचा कल--नितीन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 20:22 IST

सांगली : शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचा सर्वाधिक कल आहे.

ठळक मुद्देसरकारी यंत्रणा वाचविण्यासाठी सर्वांनीच एकत्र काम करण्याची गरजया संस्था ग्रामीण जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी,

सांगली : शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचासर्वाधिक कल आहे. थोड्याच दिवसात शासकीय आरोग्य केंद्राचेही खासगीकरणहोणार असून, तो धोका लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी आणि शासकीय यंत्रणेनेकाम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन साथी संस्था राज्य समन्वयक डॉ.नितीन जाधव यांनी केले. तसेच शासकीय यंत्रणांचे वेगाने होणारे खासगीकरणरोखण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी एकत्र काम करण्याचीगरज आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख वनियोजनाची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषद येथे शनिवारी झाली.यावेळी डॉ. नितीन जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामहंकारे, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. मिलिंद पोरे, डॉ. डी. आर. पाटील,उज्वला मोट्रे, संपदा ग्रामीण महिला (संग्राम) संस्थेचे डॉ. शशिकांतमाने, ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे विनायक कुलकर्णी हे प्रमुखउपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारचे सध्या सरकारी संस्था बंदकरून त्या खासगी संस्थांकडे चालविण्यास देण्याचे धोरण आहे. केंद्रसरकारने महिला व बालकल्याण विभागाची अंदाजपत्रकातील तरतूद ६२ टक्के कमीकेली आहे. हीच परिस्थिती आरोग्य विभागाची आहे. मेघालयात शासकीय आरोग्यकेंद्रे सामाजिक संस्थांकडे चालविण्यास दिली आहेत. मेघालयातील धोरणमहाराष्ट्रात येण्यास वेळ लागणार नाही. म्हणून वेळीच जागे होण्याची गरजआहे. शासकीय आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी सर्वसामान्य जनतेलाउत्तम सेवा दिली पाहिजे. शासनाच्या योजनांचा जनतेला लाभ झाला पाहिजे, याउद्देशानेच साथी, संग्राम आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था आरोग्यसेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजनाचे काम करीत आहेत. या संस्था ग्रामीणजनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठीच काम करीत आहेत. याचा अर्थशासकीय यंत्रणेला टार्गेट करणे आणि त्रास देणे हा आमचा उद्देश नाही.जिल्ह्यात ९० टक्के डॉक्टर चांगले काम करत असूनही केवळ १० टक्केडॉक्टरांमुळे शासकीय आरोग्य सेवा बदनाम होते. ते थांबवायचे आहे.डॉक्टरांच्याही काही समस्या असून, त्या आम्ही शासनाकडे मांडूनसोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टरांची संख्या कमी आहे. आरोग्यकेंद्रात राहण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या प्रश्नालाही आम्हीवाचा फोडणार आहे.

पण, सर्व मूलभूत सुविधा असतानाही, रुग्णाला चांगल्या सेवा मिळत नसतील,डॉक्टरांचा काही गैरकारभार सुरू असेल तर, त्यांनाही आम्ही पाठीशी घालणारनाही. योग्यवेळी जनतेच्या रेट्याने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आम्हीपुढाकार घेणार असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.संग्राम संस्थेचे शशिकांत माने यांनी संग्राम संस्थेकडून चालत असलेल्याकामकाजाची माहिती दिली. एड्सग्रस्त व्यक्तींना उत्तम दर्जाची वैद्यकीयसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एड्सविषयी जनजागृतीचीमोहीम राबविली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी संग्राम संस्थेचे सुलभा होवाळ, यशोदा न्यायनीत, संगीताभिंगारदिवे, अपर्णा मुजमले, भारती भोसले, नजरीया जहिदा पखाली, शबनमअत्तार, ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे ज्ञानू कांबळे, सिंधुताई लोंढे,प्रशांत लोंढे, साथी संस्थेचे शकुंतला भालेराव आदी उपस्थित होते.डॉक्टरांनी नकारात्मक भूमिका बाजूला ठेवावी : पाटीलप्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी लोकाधारित देखरेख व नियोजनसमितीची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. डॉक्टरांनी शासकीय आदेशाचेकाटेकोर पालन करूनच औषध खरेदी आणि शासनाच्या योजना राबविण्याची गरज आहे.आरोग्य केंद्रात येणाºया रुग्णाला सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. नकारात्मक भूमिका बाजूलाठेवून सकारात्मक गोष्टीचा विचार करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीयअधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी केले.लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था बळकट करा : डॉ. हंकारेप्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.काही ठिकाणी उणिवा असतील तेथे लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था बळकटकरण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. काही ठिकाणीलोकप्रतिनिधी व अन्य घटकांचा नाहक त्रास होतो. काही डॉक्टरांचे चांगलेकाम असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींचे हितसंबंध दुखावल्यामुळे त्यांनात्रास दिला जातो. या गोष्टीही थांबल्या पाहिजेत, असे मत जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. राम हंकारे यांनी व्यक्त केले.डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे काही ठिकाणी अडचण : गिरीगोसावीजिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.यामुळे तेथे तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यात अडचणी आहेत. तरीही साथी,संग्राम आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थांच्या माध्यमातून ग्रामीणजनतेला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे मत डॉ.भूपाल गिरीगोसावी यांनी व्यक्त केले.