शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

शासकीय आरोग्य सेवा खासगी करण्याकडे सरकारचा कल--नितीन जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 20:22 IST

सांगली : शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचा सर्वाधिक कल आहे.

ठळक मुद्देसरकारी यंत्रणा वाचविण्यासाठी सर्वांनीच एकत्र काम करण्याची गरजया संस्था ग्रामीण जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी,

सांगली : शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचासर्वाधिक कल आहे. थोड्याच दिवसात शासकीय आरोग्य केंद्राचेही खासगीकरणहोणार असून, तो धोका लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी आणि शासकीय यंत्रणेनेकाम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन साथी संस्था राज्य समन्वयक डॉ.नितीन जाधव यांनी केले. तसेच शासकीय यंत्रणांचे वेगाने होणारे खासगीकरणरोखण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी एकत्र काम करण्याचीगरज आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख वनियोजनाची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषद येथे शनिवारी झाली.यावेळी डॉ. नितीन जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामहंकारे, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. मिलिंद पोरे, डॉ. डी. आर. पाटील,उज्वला मोट्रे, संपदा ग्रामीण महिला (संग्राम) संस्थेचे डॉ. शशिकांतमाने, ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे विनायक कुलकर्णी हे प्रमुखउपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारचे सध्या सरकारी संस्था बंदकरून त्या खासगी संस्थांकडे चालविण्यास देण्याचे धोरण आहे. केंद्रसरकारने महिला व बालकल्याण विभागाची अंदाजपत्रकातील तरतूद ६२ टक्के कमीकेली आहे. हीच परिस्थिती आरोग्य विभागाची आहे. मेघालयात शासकीय आरोग्यकेंद्रे सामाजिक संस्थांकडे चालविण्यास दिली आहेत. मेघालयातील धोरणमहाराष्ट्रात येण्यास वेळ लागणार नाही. म्हणून वेळीच जागे होण्याची गरजआहे. शासकीय आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी सर्वसामान्य जनतेलाउत्तम सेवा दिली पाहिजे. शासनाच्या योजनांचा जनतेला लाभ झाला पाहिजे, याउद्देशानेच साथी, संग्राम आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था आरोग्यसेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजनाचे काम करीत आहेत. या संस्था ग्रामीणजनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठीच काम करीत आहेत. याचा अर्थशासकीय यंत्रणेला टार्गेट करणे आणि त्रास देणे हा आमचा उद्देश नाही.जिल्ह्यात ९० टक्के डॉक्टर चांगले काम करत असूनही केवळ १० टक्केडॉक्टरांमुळे शासकीय आरोग्य सेवा बदनाम होते. ते थांबवायचे आहे.डॉक्टरांच्याही काही समस्या असून, त्या आम्ही शासनाकडे मांडूनसोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टरांची संख्या कमी आहे. आरोग्यकेंद्रात राहण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या प्रश्नालाही आम्हीवाचा फोडणार आहे.

पण, सर्व मूलभूत सुविधा असतानाही, रुग्णाला चांगल्या सेवा मिळत नसतील,डॉक्टरांचा काही गैरकारभार सुरू असेल तर, त्यांनाही आम्ही पाठीशी घालणारनाही. योग्यवेळी जनतेच्या रेट्याने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आम्हीपुढाकार घेणार असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.संग्राम संस्थेचे शशिकांत माने यांनी संग्राम संस्थेकडून चालत असलेल्याकामकाजाची माहिती दिली. एड्सग्रस्त व्यक्तींना उत्तम दर्जाची वैद्यकीयसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एड्सविषयी जनजागृतीचीमोहीम राबविली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी संग्राम संस्थेचे सुलभा होवाळ, यशोदा न्यायनीत, संगीताभिंगारदिवे, अपर्णा मुजमले, भारती भोसले, नजरीया जहिदा पखाली, शबनमअत्तार, ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे ज्ञानू कांबळे, सिंधुताई लोंढे,प्रशांत लोंढे, साथी संस्थेचे शकुंतला भालेराव आदी उपस्थित होते.डॉक्टरांनी नकारात्मक भूमिका बाजूला ठेवावी : पाटीलप्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी लोकाधारित देखरेख व नियोजनसमितीची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. डॉक्टरांनी शासकीय आदेशाचेकाटेकोर पालन करूनच औषध खरेदी आणि शासनाच्या योजना राबविण्याची गरज आहे.आरोग्य केंद्रात येणाºया रुग्णाला सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. नकारात्मक भूमिका बाजूलाठेवून सकारात्मक गोष्टीचा विचार करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीयअधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी केले.लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था बळकट करा : डॉ. हंकारेप्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.काही ठिकाणी उणिवा असतील तेथे लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था बळकटकरण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. काही ठिकाणीलोकप्रतिनिधी व अन्य घटकांचा नाहक त्रास होतो. काही डॉक्टरांचे चांगलेकाम असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींचे हितसंबंध दुखावल्यामुळे त्यांनात्रास दिला जातो. या गोष्टीही थांबल्या पाहिजेत, असे मत जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. राम हंकारे यांनी व्यक्त केले.डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे काही ठिकाणी अडचण : गिरीगोसावीजिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.यामुळे तेथे तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यात अडचणी आहेत. तरीही साथी,संग्राम आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थांच्या माध्यमातून ग्रामीणजनतेला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे मत डॉ.भूपाल गिरीगोसावी यांनी व्यक्त केले.