शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

दुष्काळाच्या बाबतीत सरकारची पावलं कासवगतीनं : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:36 IST

म्हसवड : ‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच ...

म्हसवड : ‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच नाही. हे सरकार दुष्काळाशी लढा देण्यास कमी पडले असून, त्यांची पावले कासवगतीने पडत आहेत,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.म्हसवड (ता. माण) येथे बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, बारामती अ‍ॅग्रोचे प्रमुख रोहित पवार, संजय शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मनोज पोळ, कविता म्हेत्रे, उपनराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, मनोजपोळ, बाळासाहेब सावंत, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, पिंटू तावरे, आदी प्रमुख उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, ‘आपण दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा होतोय. तो अधिक व्हावा यासाठी बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून टँकर उपलब्ध करून दिले आहेत. आता दुष्काळी गावांना भेटी दिल्या. त्यावेळी लोकांच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये जनावरे आणि माणसांना पाणी नाही. रोजगार आणि रेशनवरही धान्य नाही. जनवारांना चारा मिळेना अशी स्थिती आहे. या भागाला दुष्काळ नवीन नाही; पण आताचे संकट मोठे आहे. त्यावेळेचा दुष्काळ आणि आताचा दुष्काळ वेगळा आहे. यातून मार्ग कसा काढायचा, हा प्रश्न आहे.’‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेऊन उपाययोजना लगेच सुरू केल्या जात होत्या; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसून येते. तसेच तालुक्यातील बाधित गावांना किती टँकरची गरज आहे, त्या प्रमाणात टँकरची संख्या नाही. अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली आहेत. तालुक्यातील पाणी स्रोत संपू लागलेत. पुढील अडीच महिन्यांचा काळ जायचा कसा, पाणी कोठून आणायचे? हा प्रश्न आहेच,’ असेही पवार यांनी सांगितले.दुष्काळाचे राज्यात संकट मोठे आहे. राज्यातील वेगवेगळ्या चांगल्या संस्था, कारखानदारांनी या संकटप्रसंगी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातभार लावावा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.चौकट :पैसे मिळाले नसल्याचे सांगितले...राज्यातील दुष्काळाची पाहणी करून या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला भेटून अजून काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे सांगणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. तर यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना पवार यांनी तुम्ही पीक विमा काढलाय का? तुमची पिके जळाली, नुकसानभरपाई मिळाली का ? असा प्रश्न केला. त्यावर लोकांनी हात वर करून पीक विमा काढूनही पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.असा राहिला माण दौरा...शरद पवार हे रविवारी माण तालुका दौºयावर होते. ते सकाळी बारामतीहून माण तालुक्यात आले. आल्यानंतर सकाळी सव्वादहाच्या सुमारास बिजवडी येथे ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर शिंदीमध्ये पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करून महाश्रमदानाच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर वावरहिरे येथे ग्रामस्थांशी रोजगार, चारा आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात संवाद साधला. या ठिकाणाहून भालवडी येथील चारा छावणीस भेट देण्यासाठी ते गेले. तेथे पशुपालकांबरोबर चर्चा करून मार्डीतील वाळलेल्या डाळिंंब बागेची पाहणी केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भोजन केले. यानंतर पवार यांनी पानवण येथे पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेथून पवार यांचे म्हसवड येथे आगमन झाले. या ठिकाणी बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने देण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा प्रारंभ करत नागरिकांशी संवाद साधला. हा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी साडेपाचनंतर त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले.