शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

दुष्काळाच्या बाबतीत सरकारची पावलं कासवगतीनं : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:36 IST

म्हसवड : ‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच ...

म्हसवड : ‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच नाही. हे सरकार दुष्काळाशी लढा देण्यास कमी पडले असून, त्यांची पावले कासवगतीने पडत आहेत,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.म्हसवड (ता. माण) येथे बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, बारामती अ‍ॅग्रोचे प्रमुख रोहित पवार, संजय शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मनोज पोळ, कविता म्हेत्रे, उपनराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, मनोजपोळ, बाळासाहेब सावंत, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, पिंटू तावरे, आदी प्रमुख उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, ‘आपण दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा होतोय. तो अधिक व्हावा यासाठी बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून टँकर उपलब्ध करून दिले आहेत. आता दुष्काळी गावांना भेटी दिल्या. त्यावेळी लोकांच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये जनावरे आणि माणसांना पाणी नाही. रोजगार आणि रेशनवरही धान्य नाही. जनवारांना चारा मिळेना अशी स्थिती आहे. या भागाला दुष्काळ नवीन नाही; पण आताचे संकट मोठे आहे. त्यावेळेचा दुष्काळ आणि आताचा दुष्काळ वेगळा आहे. यातून मार्ग कसा काढायचा, हा प्रश्न आहे.’‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेऊन उपाययोजना लगेच सुरू केल्या जात होत्या; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसून येते. तसेच तालुक्यातील बाधित गावांना किती टँकरची गरज आहे, त्या प्रमाणात टँकरची संख्या नाही. अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली आहेत. तालुक्यातील पाणी स्रोत संपू लागलेत. पुढील अडीच महिन्यांचा काळ जायचा कसा, पाणी कोठून आणायचे? हा प्रश्न आहेच,’ असेही पवार यांनी सांगितले.दुष्काळाचे राज्यात संकट मोठे आहे. राज्यातील वेगवेगळ्या चांगल्या संस्था, कारखानदारांनी या संकटप्रसंगी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातभार लावावा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.चौकट :पैसे मिळाले नसल्याचे सांगितले...राज्यातील दुष्काळाची पाहणी करून या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला भेटून अजून काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे सांगणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. तर यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना पवार यांनी तुम्ही पीक विमा काढलाय का? तुमची पिके जळाली, नुकसानभरपाई मिळाली का ? असा प्रश्न केला. त्यावर लोकांनी हात वर करून पीक विमा काढूनही पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.असा राहिला माण दौरा...शरद पवार हे रविवारी माण तालुका दौºयावर होते. ते सकाळी बारामतीहून माण तालुक्यात आले. आल्यानंतर सकाळी सव्वादहाच्या सुमारास बिजवडी येथे ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर शिंदीमध्ये पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करून महाश्रमदानाच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर वावरहिरे येथे ग्रामस्थांशी रोजगार, चारा आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात संवाद साधला. या ठिकाणाहून भालवडी येथील चारा छावणीस भेट देण्यासाठी ते गेले. तेथे पशुपालकांबरोबर चर्चा करून मार्डीतील वाळलेल्या डाळिंंब बागेची पाहणी केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भोजन केले. यानंतर पवार यांनी पानवण येथे पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेथून पवार यांचे म्हसवड येथे आगमन झाले. या ठिकाणी बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने देण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा प्रारंभ करत नागरिकांशी संवाद साधला. हा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी साडेपाचनंतर त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले.