शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर सरकार पडेल

By admin | Updated: February 15, 2017 22:46 IST

पतंगराव कदम : कार्वे येथे काँग्रेसची सभा; दोन्ही कॉँग्रेसने चुका पोटात घातल्या

कार्वे : ‘कार्वे हा मतदारसंघ यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते व संभाजीबाबा यांचा आहे. हे तिघे आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिले; पण आता सातारा जिल्ह्यात कोण कुठं उड्या मारतंय. चंद्रकांतदादा पाटील अनेकांना प्रवेश देताहेत. वाल्याचे वाल्मिकी करत प्रवेश दिला जात आहे. पण काँग्रेस आघाडीचं सरकार आलं की पुन्हा ही मंडळी परत येतील. मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजप व शिवसेनेची ताणाताणी पाहता निवडणुकीनंतर सरकार पडेल,’ असे असे प्रतिपादन आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केले.कार्वे, ता. कऱ्हाड येथे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, राजेश पाटील-वाठारकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जयवंतराव ऊर्फ बंडानाना जगताप, सदस्या विद्याताई थोरवडे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कृष्णेचे संचालक अशोकराव जगताप, माजी संचालक शिवाजीराव जाधव, माणिकराव जाधव, नगरसेविका स्मिता हुलवान, वडगाव हवेलीचे माजी सरपंच दिलीप चव्हाण, कार्वेचे माजी सरपंच वैभव थोरात, माजी उपसरपंच संभाजीराव थोरात, संतोष पाटील, दुशेरेचे बाबूराव जाधव, उत्तमराव पाटील, प्रल्हाद देशमुख यांच्यासह उमेदवार पुष्पाताई ठावरे, वनिता जाधव, अनिता गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार कदम म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पन्नास वर्षांनी पृथ्वीराजबाबांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादीने मागील सर्व चुका पोटात घातल्या आहेत. हे दोन्ही पक्ष येथूनपुढे समविचारी पक्षांना बरोबर घेऊन एकत्रपणे चालतील.’आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर डावा विचार जपला. काँग्रेसमध्ये राहूनही डावा विचार जोपासला; पण त्यांच्या घरातून त्या विचाराविरोधात काम करणारी मंडळी पाहून दु:ख होत आहे. जनतेने देशात व राज्यात सत्ता बदलावेळी केलेली चूक दुरुस्त करण्याची हीच योग्य वेळ आहे.’आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘माझ्यावर पदे स्वत: जवळ ठेवल्याचा आरोप काही मंडळी करत आहेत. आरोप करणाऱ्यांनी यशवंतराव मोहितेंच्या विचाराला सोडून भाजपशी संगत का केली, याचे आम्हाला दु:ख आहे. पक्ष व निष्ठा एकच असावी लागते. तरच पदे मिळतात. चंद्रकांतदादांना पृथ्वीराजबाबांनी केलेला विकास दिसत नसेल, तर त्यांना तालुक्यातून एकवेळ फिरवून आणा.’ यावेळी बंडानाना जगताप म्हणाले, ‘अतुल भोसले सांगून आमदार होणार नाहीत. भोसलेंना आयुष्यभर यश मिळणार नाही. ते मदनदादांचा केवळ वापर करतील.’ यावेळी मनोहर शिंदे, अजितराव पाटील, माणिकराव जाधव यांची मनोगते व्यक्त केली. वैभव थोरात यांनी स्वागत केले. युवराज मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. शब्बीर मुजावर यांनी आभार मानले. (वार्ताहर)महू चावलेला पैलवान पळाला...अजितराव पाटील-चिखलीकर यांनी शेलक्या भाषेत मोहिते व भोसलेंचा समाचार घेतला. मी पृथ्वीराजबाबांना दातासहीत साप खिशात घेऊ नका म्हणून सांगत होतो. पण त्या सापांनी एकवेळ विधानसभेला व आता एकवेळ त्यांचा चावा घेतला. आमच्यातून महू चावलेला पैलवान पळून गेला. असे नाव न घेता त्यांनी मोहिते व भोसलेंचा समाचार घेतला.