शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

चारा छावण्यांसाठी सरकारचा वेळकाढूपणा

By admin | Updated: April 22, 2016 00:44 IST

विक्रम सावंत : भाजपकडून दुष्काळाचे राजकारण; जत तालुक्यावर अन्याय

जत : मागेल तेथे आवश्यकतेनुसार चारा छावणी दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जत तालुका दौऱ्यात दिले होते. परंतु त्याची पूर्तता त्यांनी केली नाही. चारा छावणी सुरू करण्यासाठी शासनाने बारा जाचक अटी घालून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे, असा आरोप जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत केला. तालुक्यात भयानक चारा व पाणी टंचाई जाणवत आहे. शासन दुष्काळातही राजकारण करत आहे. नगर व सोलापूर जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामातील सर्वच गावात टंचाई जाहीर केली आहे. परंतु जत तालुक्यातील ५२ गावांसाठी सवलतीची घोषणा केली नाही. आमदार विलासराव जगताप यासंदर्भात काहीच बोलत नाहीत. चारा व पाणी टंचाईसंदर्भात प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या उपाययोजनेकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील जनतेला कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. असे सांगून विक्रम सावंत पुढे म्हणाले की, चारा छावणीसंदर्भात शासनाने कोणतीही जाहिरात केली नाही किंवा ग्रामपंचायत अथवा तलाठी कार्यालयातील नोटीस बोर्डावर माहिती प्रसिध्द केली नाही. त्यामुळे पशुधन मालक अनभिज्ञ आहेत. माडग्याळ, जाडरबोबलाद व व्हसपेठ वगळता तालुक्यातील इतर गावातील अर्ज मिळाले नाहीत. तलाठी, ग्रामसेवक नेमणूक असलेल्या गावात रहात नाहीत. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही शासकीय योजनांची माहिती मिळत नाही. जत तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी खरीप हंगामातील ५२ गावांचा दौरा करून तेथील जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांना चारा छावणी सुरू करण्याचे अर्ज दिले आहेत. गुरुवारी सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना चारा छावणी सुरू करण्यासाठी अर्ज भरून दिले आहेत. २०१३ मध्ये आघाडी शासनाने खरीप, रब्बी असा दुजाभाव केला नाही. सर्वच गावात टंचाई जाहीर करून सवलती दिल्या होत्या. शासन प्रतिमाणसी विस लिटर पाणी देत आहे. यामध्ये जनावरांच्या पाण्याचा समावेश केला नाही. त्यात जनावरांच्या पाण्याचा समावेश करून पाणी पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली. शासन आता चारा छावणी मागणीचे अर्ज घेऊन त्यांची पडताळणी करणार आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात निर्णय झाल्यानंतर छावणी सुरू होणार आहे. यासाठी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. फक्त कागदी घोडे नाचवून शासन छावणी सुरू करण्याचा फार्स करणार आहे. छावणी सुरू होईल का नाही, ते सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.बाजार समिती सभापती संतोष पाटील, जतचे सभापती देवगोंडा बिरादार, पिराप्पा माळी, आप्पा बिराजदार, रवींद्र सावंत, मोहन कुलकर्णी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)