शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

शासनाने महापुराचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्याला महापुराचा नेहमी फटका बसतो. त्यात सर्वसामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने यावर कायमस्वरूपी ...

सांगली : जिल्ह्याला महापुराचा नेहमी फटका बसतो. त्यात सर्वसामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जमियत उलेमा ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष मौलाना नदीम सिद्दीकी यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चाैधरी यांच्याकडे केली.

जमियत उलेमा ए-हिंदच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. कृष्णा नदीला आलेल्या महापुरात मोठे नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेली मदत वेळेवर द्यावी. पाणी ओसरताच स्थानिक प्रशासनाने पंचनामे करावेत. नुकसान झालेल्यांना ठोस भरपाई द्यावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

२०१९ मधील महापुरात जमियत उलेमा ए-हिंदने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य उभारले हाेते. सध्या कोरोनाकाळातच महापुराचा फटका बसला आहे. अजूनही बऱ्याच भागात पुराचे पाणी आहे. पाणी ओसरू लागताच जमियतची सांगली शाखा मदत कार्य सुरु करत असल्याचे मौलाना नदीम सिद्दीकी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जमियत उलेमा ए-हिंदचे सांगली जिल्हाध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, जमियतचे जिल्हा कार्याध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, सांगली शहर उपाध्यक्ष सुफियान पठाण, मौलाना जुबेर, हाफिज मुश्ताक उपस्थित होते.