शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

खासगी एजन्सीच्या सेवेद्वारे ग्रामपंचायतींची शासनमान्य लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:28 IST

सांगली : ग्रामपंचायतींनी शासन नियुक्त एजन्सीकडूनच आर्थिक परतावे भरून घ्यावेत यासाठी जिल्हा परिषदेने रीतसर फर्मानच जारी केले आहे. येत्या ...

सांगली : ग्रामपंचायतींनी शासन नियुक्त एजन्सीकडूनच आर्थिक परतावे भरून घ्यावेत यासाठी जिल्हा परिषदेने रीतसर फर्मानच जारी केले आहे. येत्या सोमवारपर्यंत (दि. ३०) सर्व ग्रामपंचायतींनी संमतीपत्रे जमा करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढले आहेत.

शासनाने यासंदर्भातील आदेश मार्चमध्ये काढला होता. ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांच्या आर्थिक व्यवहारांच्या सुसूत्रीकरणासाठी एजन्सी आवश्यक आहे, असे म्हटले होते. त्यासाठी जयोस्तुते मॅनेजमेंट या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. टीडीएस, जीएसटी, लेबर सेस, रॉयल्टी, विमा आदींचे परतावे भरण्याचे काम एजन्सी करेल. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने वर्षाला किमान ३५ हजार रुपये ‘जयोस्तुते’ला द्यायचे आहेत. राज्यभरातील आठ हजारांवर ग्रामपंचायतींनी या प्रकारे अब्जावधी रुपये द्यायचे आहेत. ग्रामपंचायती सध्या खासगी सीए किंवा लेखापरीक्षकांकडून कामे करून घेतात. वर्षाला दोन-पाच हजारांत कामे आटोपतात. त्यांचे करार ग्रामपंचायतींनी संपवावेत, असे आदेश जिल्हा परिषदेने काढले आहेत. ‘जयोस्तुते’कडून काम करून घेण्यासाठीची संमतीपत्रे सोमवारपर्यंत द्यावीत, असेही आदेशात म्हटले आहे.

चौकट

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांना वगळले

दरम्यान, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांनीही ‘जयोस्तुते’कडून कामे करून घेण्याची सक्ती केली होती. त्यासाठी वर्षाकाठी लाखो रुपयांचे सेवाशुल्क मोजावे लागणार होते. लोकप्रतिनिधींच्या विरोधानंतर फक्त ग्रामपंचायतींना सक्ती कायम ठेवण्यात आली. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामस्वराज्य अभियान यांना ही सेवा ऐच्छिक करण्यात आली आहे.

चौकट

ग्रामपंचायतींच्या पैशांची लूट

पाच हजारहून कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी प्रत्येक महिन्याला २,९८५ रुपये सेवाशुल्क द्यायचे आहे. याहून जास्त लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींनी ४,७१५ रुपये मोजायचे आहेत. वर्षाला ३५ हजार ८२० रुपये ते ५६ हजार ५८० रुपये द्यावे लागतील. आजवर हेच काम ग्रामपंचायती फक्त दोन ते पाच हजारांत करून घ्यायच्या. हे पैसे वित्त आयोगातून भरायचे असल्याने कशाला खळखळ करता, असा सवाल अधिकारी करीत आहेत तर इतक्या महागड्या सेवेतून कोणाचे कोटकल्याण करायचे आहे, असा प्रश्न ग्रामपंचायतींनी उपस्थित केला आहे.