शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास पुनर्वसनाची शासनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:27 IST

सांगली : दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून सांगलीचा नेहमीच उल्लेख होतो. मात्र, यातील बहुतांश बाजारपेठेला महापुराचा वारंवार फटका ...

सांगली : दक्षिण महाराष्ट्रातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून सांगलीचा नेहमीच उल्लेख होतो. मात्र, यातील बहुतांश बाजारपेठेला महापुराचा वारंवार फटका बसत आहे. सन २००५, २०१९ आणि आताही या बाजारपेठेला नुकसान सोसावे लागले आहे. व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असले, तरी व्यापाऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिल्यास, त्यांना इतर ठिकाणी पुनर्वसनास राज्य शासनाची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केले.

जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, त्यांनी सांगली शहरातील पूरस्थितीची पाहणी केली. आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, कोणतीही शक्यता नसताना, धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १०३ गावांना याचा फटका बसला असून, दोन लाखांवर लोकांचे स्थलांतर करावे लागले आहे. या संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापाऱ्यांना राज्य शासनातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल.

राज्यातील एक अग्रेसर बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत वारंवार या बाजारपेठेला पुराचा फटका बसत आहे. यावर सर्वमान्य तोडगा आवश्यक आहे. प्रत्येक वेळी पूर आल्यानंतरच याबाबत चर्चा होते. त्यानंतर, विषय थांबतो. पाणी येते, त्या भागातील व्यापाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, तरीही सांगलीतील व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद असेल, तर उंच ठिकाणी त्यांचे योग्य ते पुनर्वसन करण्यास राज्य शासन तयार आहे, असेही ते म्हणाले.