शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

सरकारला शेतक-यांची नव्हे, उद्योगपतींची चिंता : अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 22:45 IST

मागील १५ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या कालावधित माझ्या वस्तूला भाव मिळत नाही म्हणून कुठल्या उद्योगपतीने आत्महत्या केली नाही.

आटपाडी -   मागील १५ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या कालावधित माझ्या वस्तूला भाव मिळत नाही म्हणून कुठल्या उद्योगपतीने आत्महत्या केली नाही. शेतक-यांच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून तो आत्महत्या करतो; पण सरकारला शेतक-यांची नाही, तर उद्योगपतींची चिंता आहे. त्यासाठी २३ मार्चला दिल्लीत मोठे आंदोलन करतोय. देशातल्या कुठल्याच तुरुंगात ठेवायला जागा पुरणार नाही, एवढ्या संख्येने आंदोलनात सामील व्हा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे केले.

येथील बचतधामच्या मैदानात अण्णा हजारे यांची सभा झाली. ते म्हणाले, अजूनही चिरीमिरी दिल्याशिवाय लोकांची कामे होत नाहीत. शेतकºयांची झोपडी बदलत नाही आणि दलालांनी मात्र २० मजले बांधले. देशात सर्वत्र ‘माल खाये मदारी आणि नाच करे बंदर’! अशी स्थिती आहे. राज्यातील कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ राज्याच्या कृषीमूल्य आयोगाला शेतक-यांच्या मालाचा भाव कळवितात. ते केंद्र शासनाच्या कृषीमूल्य आयोगाला कळवितात. तिथे त्यामध्ये ४० टक्के कपात केली जाते म्हणून शेतकºयांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. हे थांबले पाहिजे. आम्ही शेतकºयांचा जेवढा खर्च होतो, त्याच्या दीडपटीने भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

पीक कर्जाला बँका चक्रवाढ व्याज लावतात. काही बँका सावकारापेक्षा अधिक २४ टक्के व्याज लावतात. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, शेतकºयांना पीक कर्जाला चक्रवाढ व्याज लावायचे नाही. १९७२ पासून आतापर्यंत ज्या-ज्या बँकांनी असे व्याज लावले त्या शेतकºयांना परत द्या. कायदा मानत नाहीत, कुणी विचारत नाही म्हणून त्यांचे फावते आहे.आपल्या घटनेमध्ये प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. त्याचे पालन करा. ज्यांचे ६० वर्षे वय आहे आणि कुठली आवक नाही त्याला पाच हजार पेन्शन द्या, अशी आमची मागणी आहे. लोकसभेत पेन्शन बिल पडलंय, त्याची अंमलबजावणी करा. आता हालचाली सुरु झाल्या आहेत.समाजसेविका कल्पना इनामदार म्हणाल्या, राजकर्त्यांनी शेतक-यांचा चेंडू केला आहे. कुणीही येतं लाथ मारतं, जाईल तिकडे जाईल. शेतकºयांच्या प्रश्नांवर राजकारणी आंदोलन करतात; पण शेतकºयांच्या पदरी काहीच पडत नाही. यांनी शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल म्हणून वापर सुरू केला आहे. टेंभूला निधी मिळाला म्हणून अनेकवेळा या भागात नेत्यांची पोस्टर लावली जातात. प्रत्यक्षात पुढे काय होतं? निधी कुठे जातो?त्यासाठी आता राजकारणविरहित, पक्षविरहित आंदोलन छेडण्याची आणि या लढ्यात प्रत्येकाने सहभाग घेण्याची गरज आहे.यावेळी राळेगणसिद्धीचे सरपंच राजेश आवटी, संभाजी देशमुख, वीरेंद्र राजमाने, व्ही. एन. देशमुख, आबा सागर यांनी मनोगत व्यक्त केले.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे