शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मोबाईलचे झाले खेळणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:31 IST

सांगली : अंगणवाड्या टेक्नोसॅव्ही होण्यासाठी शासनाने मोबाईल दिले खरे, पण वर्ष-दिड वर्षातच पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरु झाले ...

सांगली : अंगणवाड्या टेक्नोसॅव्ही होण्यासाठी शासनाने मोबाईल दिले खरे, पण वर्ष-दिड वर्षातच पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरु झाले आहे. बऱ्याच सेविकांचे मोबाईल संच बंद पडले आहेत, शिवाय त्यातील सॉफ्टवेअर अपग्रेडेशेनचे काम सुरु असल्यानेही कामकाज ऑफलाईनवर आले आहे.

कागदोपत्री सांभाळले जाणारे अंगणवाड्यांचे दप्तर मोबाईलवर येताच कौतुक झाले, पण नव्याचे नऊ दिवस संपताच तक्रारी सुरु झाल्या. रिचार्ज, नादुरुस्ती, रेंजची उपलब्धता, ॲण्ड्राईड मोबाईल वापरता येणे अशा एक ना अनेक तक्रारी होत राहिल्या. आता तर सॉफ्टवेअर अपग्रे़ेडेशनच्या नावाखाली मोबाईल बासनात जाण्याची वेळ आली आहे.

१२ सप्टेंबरपासून सर्व नोंदी पूर्ववत रजिस्टरमध्ये करण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यामुळे सेविका पुन्हा एकदा वह्यांचे ओझे घेऊन फिरताना दिसत आहे. जिल्हाभरात किमान ३० ते ४० टक्के हॅण्डसेट बंद असल्याचा दावा सेविकांनी केला, पण बंद किंवा नादुरुस्त हॅण्डसेटसाठी पर्यायी मोबाईल तात्काळ देतो असा खुलासा महिला व बालविकास प्रकल्पाधिकारी शिल्पा पाटील यांनी केला. पंधरवड्यात सॉफ्टवेअर पूर्ववत होऊन ऑनलाईन कामकाज चालेल असेही त्या म्हणाल्या.

सारे काही मोबाईलवरच...

n मुलांची हजेरी, वजन-उंची इत्यादी तपशील मोबाईलवर नोंदवावा लागतो.

nगरोदर व स्तनदा मातांचे सर्वेक्षण करुन त्याच्या नोंदीही मोबाईलवरुन कळवाव्या लागतात.

n लॉकडाऊन काळात अंगणवाडी सेविकांना गृहभेटी द्याव्या लागल्या. त्याच्या नोंदीही ऑनलाईन कळवल्या गेल्या.

n अंगणवाडीतील बालकांना खाऊ तथा पोषण आहाराचे वाटप घरोघरी जाऊन केले. गरोदर व स्तनदा मातांनाही आहार पोहोच केला. त्याच्या नोंदीही ऑनलाईन ठेवून कळवाव्या लागल्या.

n लॉकडाऊन काळात मुलांशी संपर्क नव्हता, पण मोबाईलवर सेविकांनी पालकांचे व्हॉटस ॲप ग्रुप तयार केले. मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शन केले. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.

n वरिष्ठ कार्यालय व पालक यांच्यातील दुवा म्हणून सेविकांनी काम केले.

महिला बालकल्याण विभाग अधिकारी कोट

मोबाईल बंद नाहीत. एखादा बंद पडला तर आमच्याकडील पर्यायी साठ्यातून पुरवतो. सध्या सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम सुरु असल्याने काहीसा खंड पडला आहे. पंधरवड्यात पूर्ववत होईल.

- शिल्पा पाटील

महिला बालविकास प्रकल्पाधिकारी

मोबाईल रिचार्ज करा!

मोबाईल रिचार्जसाठी पुरेसे पैसे मिळत नाहीत ही सेविकांची मुख्य तक्रार आहे. सुरुवातीला ६०० आणि नंतर १६०० रुपये मिळाले, पण वर्षभरासाठी किमान अडीच हजार रुपये लागतात असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दुरुस्तीसाठीही तालुक्याला किंवा जिल्ह्याला येण्याशिवाय पर्याय नाही.

----------