शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
2
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
3
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
4
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
5
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
6
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
7
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
8
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
9
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
10
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
11
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
13
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
14
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
15
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
16
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 
17
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
18
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
19
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
20
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."

सरकारला दुष्काळाचं देणं-घेणं नाही!

By admin | Updated: June 17, 2016 00:23 IST

अजित पवार यांची टीका : आटपाडीत राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा; विविध कार्यक्रम

आटपाडी : या सरकारकडे कसलंही नियोजन नाही. त्यामुळे राज्य यांनी किती तरी वर्षे मागं नेलं. हे सरकार झोपेचं सोंग घेऊन चाललं आहे. यांना दुष्काळी भागाशी काहीही देणं-घेणं नाही. मुख्यमंत्री म्हणतात, प्रशासन आमचं ऐकत नाही. मग निर्णय होणार कसे? तुम्ही चांगल्या माणसांना घरात बसवलं, म्हणून राज्याचं वाटोळं झालं. पण ज्या जनतेनं यांना डोक्यावर घेतलं, तीच जनता येत्या निवडणुकांमध्ये त्यांना पायदळी तुडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.येथील भवानी हायस्कूलच्या पटांगणात राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी दि बाबासाहेब देशमुख सहकारी बॅँकेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख मार्केट यार्ड व्यापारी संकुल आणि पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आ. पवार यांच्याहस्ते करण्यात आले.पवार म्हणाले की, उच्च न्यायालयाने खडसावलं तरच सध्या हे सरकार निर्णय घेत आहे. आम्ही दुष्काळी परिस्थितीत कधीही निधी कमी पडू दिला नाही, पण यांचं कोणतंच नियोजन नाही. पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर नाहीत. जनावरांसाठी छावण्या नाहीत. जनावरांना बाजारही दाखवायचा नाही. हे शहरी भागातील नेते आहेत. ग्रामीण भागाबद्दल, तिथल्या माणसांबद्दल यांना कसलीही आस्था नाही, आपुलकी नाही, जिव्हाळा नाही, प्रेम नाही. आपली जिवाभावाची माणसं जर केंद्र आणि राज्यात सत्तेत नसली तर काय होतं, त्याचा विचार करा, असा सवालही त्यांनी शेतकऱ्यांना केला.माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, एवढा मोठा दुष्काळ असून पाण्याचे टॅँकर नाहीत. जनावरांसाठी छावण्या नाहीत. टेंभू योजनेची आवर्तने ठरविणे गरजेचे आहे. उरमोडीचे पाणी राजेवाडी तलावात सोडले पाहिजे. यासाठी आता तीव्र आंदोलने करू.जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख म्हणाले, बाबासाहेब देशमुखांनी तालुक्याची निर्मिती करून तलाव केले. ही भांडी आता टेंभू योजनेच्या पाण्याने भरली आणि पाणी उचलण्यासाठी शेतकऱ्यांना परवाने दिले, तर त्याचा फायदा होईल. कडेपूर आणि सांगोला तालुक्यात असे परवाने दिले आहेत. फक्त आटपाडीत परवाने दिले जात नाहीत. यामध्ये राजकारण आहे. विरोधक आडकाठी आणत आहेत. जयंतरावांच्या आटपाडीच्या मेळाव्याला, ‘दुष्काळी दौरा का मान्सून दौरा?’ म्हणून हिणवलं, त्या आ. अनिल बाबर यांनी टेंभू योजनेसाठी काहीही केलेलं नाही.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, जि. प.च्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उदयसिंह देशमुख, कुसूम मोटे, सुमन देशमुख, भागवत माळी, भाऊसाहेब गायकवाड, हर्षवर्धन देशमुख, ऋषिकेश देशमुख उपस्थित होते. (वार्ताहर)नरेंद्र मोदी देशाचे नव्हे : जगाचे पंतप्रधान!लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करू म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वर्षात १५ रुपये तरी जमा केले का? लालूप्रसाद म्हणतात, मोदी देशाचे नाही, जगाचे पंतप्रधान आहेत. ते चीन, पाकिस्तानचा दौरा करतात, पण हे देश सैनिक भारतात घुसवत आहेत. महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी ४४ सभा घेतल्या. आता दुष्काळ पडलाय, त्यांनी एकदा तरी दुष्काळी दौरा केला काय?, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.निवडणुकीनंतर पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणणारे मुख्यमंत्री आता अभ्यास करायला पाहिजे म्हणतात. मग तेव्हा बारामतीत ज्यूस हातात घेऊन आश्वासनं कशी दिली? या सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला.