शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

लोककलावंतांबाबत सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:21 IST

तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कलावंतांच्याबाबतीत सरकार करंटेपणाचे धोरण अवलंबित असून, या कारणामुळेच महाराष्ट्रातील लोककलावंत आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत, अशी खरमरीत टीका ...

तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कलावंतांच्याबाबतीत सरकार करंटेपणाचे धोरण अवलंबित असून, या कारणामुळेच महाराष्ट्रातील लोककलावंत आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत, अशी खरमरीत टीका ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि दुसºया प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.तासगाव येथील लेखणीसम्राट गणपतराव व्ही. माने चिंचणीकर साहित्यनगरी येथे प्रतिष्ठा फौंडेशनच्यावतीने दुसरे प्रतिष्ठा साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. तहसीलदार सुधाकर भोसले स्वागताध्यक्ष होते.सबनीस पुढे म्हणाले, महाराष्टÑातील लोकसाहित्यिकांना, कलावंतांना अखेरच्या काळात जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ येते. त्यांना ताठमानेने जगणेही मुश्किल होेते. मात्र, अशा कलावंतांना, साहित्यिकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी साधी मदतही करण्याची कुवत या सरकारची आणि राजकारण्यांची नाही. सरकारचा करंटेपणा आणि निष्क्रियतेमुळे लोककलावंतांच्या पदरी उपेक्षिताचे जीणे आले आहे. नवनवीन लेखक उदयास येत आहेत. मात्र सामाजिक भाष्य करणारे, संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे साहित्य घडले पाहिजे. संस्कृती शुध्दीकरण झाले पाहिजे आणि यासाठी साहित्य संमेलने तुरटीसारखे काम करतात. पैसे घेऊन पुरस्कारांची संमेलने भरवली जातात.यावेळी चंद्रलेखा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या कविसंमेलनासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर जयवंत आवटे यांचे कथाकथन झाले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, कविसंमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे, गटविकास अधिकारी अरुण जाधव, निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, संयोजक तानाजी जाधव यांच्यासह साहित्यिक उपस्थित होते. तहसीलदार भोसले, डॉ. गुरव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.यावेळी गटविकास अधिकारी अरुण जाधव, निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना ‘प्रशासनरत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना ‘शिक्षणरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले.नेत्यांवर निशाणागेल्या काही वर्षात सुरू असलेल्या जातीय राजकारणावर परखड मत मांडताना सबनीस यांनी नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्टÑ जातीपातींनी दुभंगलेला आहे. राजकीय नेते शुध्दतेचा आव आणत आहेत. मात्र त्यांच्या चारित्र्यावर कलंकतेचा डाग आहे. राजकीय व्यवस्था मोडित निघालेली असताना समाजाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. साहित्यातून नवा महाराष्टÑ, नवा भारत उभा करावा लागेल. महापुरुषांच्या नावाने समाज, धर्म बिघडवला जात आहे, साहित्यातून तो बिघडवू देऊ नका. भारतीय संस्कृती ही महान आहे. जगभरात तिचे दाखले दिले जातात. त्यामुळे साहित्यीकांनी आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. सामाजिक भाष्य करणारे, संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे साहित्य घडले पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.