शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

लोककलावंतांबाबत सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:21 IST

तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कलावंतांच्याबाबतीत सरकार करंटेपणाचे धोरण अवलंबित असून, या कारणामुळेच महाराष्ट्रातील लोककलावंत आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत, अशी खरमरीत टीका ...

तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कलावंतांच्याबाबतीत सरकार करंटेपणाचे धोरण अवलंबित असून, या कारणामुळेच महाराष्ट्रातील लोककलावंत आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत, अशी खरमरीत टीका ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि दुसºया प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.तासगाव येथील लेखणीसम्राट गणपतराव व्ही. माने चिंचणीकर साहित्यनगरी येथे प्रतिष्ठा फौंडेशनच्यावतीने दुसरे प्रतिष्ठा साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. तहसीलदार सुधाकर भोसले स्वागताध्यक्ष होते.सबनीस पुढे म्हणाले, महाराष्टÑातील लोकसाहित्यिकांना, कलावंतांना अखेरच्या काळात जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ येते. त्यांना ताठमानेने जगणेही मुश्किल होेते. मात्र, अशा कलावंतांना, साहित्यिकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी साधी मदतही करण्याची कुवत या सरकारची आणि राजकारण्यांची नाही. सरकारचा करंटेपणा आणि निष्क्रियतेमुळे लोककलावंतांच्या पदरी उपेक्षिताचे जीणे आले आहे. नवनवीन लेखक उदयास येत आहेत. मात्र सामाजिक भाष्य करणारे, संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे साहित्य घडले पाहिजे. संस्कृती शुध्दीकरण झाले पाहिजे आणि यासाठी साहित्य संमेलने तुरटीसारखे काम करतात. पैसे घेऊन पुरस्कारांची संमेलने भरवली जातात.यावेळी चंद्रलेखा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या कविसंमेलनासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर जयवंत आवटे यांचे कथाकथन झाले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, कविसंमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे, गटविकास अधिकारी अरुण जाधव, निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, संयोजक तानाजी जाधव यांच्यासह साहित्यिक उपस्थित होते. तहसीलदार भोसले, डॉ. गुरव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.यावेळी गटविकास अधिकारी अरुण जाधव, निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना ‘प्रशासनरत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना ‘शिक्षणरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले.नेत्यांवर निशाणागेल्या काही वर्षात सुरू असलेल्या जातीय राजकारणावर परखड मत मांडताना सबनीस यांनी नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्टÑ जातीपातींनी दुभंगलेला आहे. राजकीय नेते शुध्दतेचा आव आणत आहेत. मात्र त्यांच्या चारित्र्यावर कलंकतेचा डाग आहे. राजकीय व्यवस्था मोडित निघालेली असताना समाजाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. साहित्यातून नवा महाराष्टÑ, नवा भारत उभा करावा लागेल. महापुरुषांच्या नावाने समाज, धर्म बिघडवला जात आहे, साहित्यातून तो बिघडवू देऊ नका. भारतीय संस्कृती ही महान आहे. जगभरात तिचे दाखले दिले जातात. त्यामुळे साहित्यीकांनी आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. सामाजिक भाष्य करणारे, संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे साहित्य घडले पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.