शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील कोट्यवधींच्या मिळकती शासन जमा

By admin | Updated: February 8, 2017 22:58 IST

शहरात खळबळ : शर्तभंगमुळे भूमी अभिलेखची कारवाई; ३० कोटींच्या दंडात्मक कारवाईच्या नोटिसा

दिलीप मोहिते ल्ल विटासुवर्णनगरी विटा शहराचे ‘हार्ट’ समजल्या जाणाऱ्या यशवंतनगर भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गेल्या ४१ वर्षांपूर्वी येथील लोकांना रहिवास कारण्यासाठी दिलेल्या भूखंडांचा व्यावसायिक वापर व परस्पर हस्तांतरण करणाऱ्या यशवंतनगर येथील जवळपास ८० मिळकतधारकांना शर्तभंग केल्याप्रकरणी सुमारे ३० ते ३२ कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईच्या नोटिसा काढण्यात आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही रक्कम भरण्यास शासनाने दिलेली आठ दिवसांची मुदत संपल्याने या मिळकतींवर मूळ मालकांची नावे कमी करून उताऱ्यांवर शासनाची नावे लावण्यात आली आहेत. त्यात राजकीय लागेबांधे असलेल्या अनेक बड्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.विट्यातील यशवंतनगर हे उपनगर शहराचे हृदय समजले जाते. सुशिक्षित व अत्यंत उच्चभ्रू लोकांचे वास्तव असणाऱ्या या भागात अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे बंगले आहेत. त्यातच काहींनी शासनाच्या या जागांचा व्यवसायासाठीही वापर केला आहे. दि. १५ जून १९६६ ला या भागातील रिकामे भूखंड तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लोकांना रहिवास कारणासाठी शासनाने दिले होते. हे भूखंड देताना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय विक्री, व्यवसायासाठी वापर अगर वापरात बदल यासह अन्य काही शर्ती व अटींवर या भूखंडांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, यातील अनेक मिळकतधारकांनी या भूखंडात अनधिकृतरित्या व शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वापरात बदल केले आहेत. तर काहींनी त्याचे परस्पररित्या हस्तांतरण केले. त्यामुळे शासनाच्या शर्तींचा भंग झाल्याने नागपूरच्या महालेखापाल यांनी २००५ मध्ये तपासणी करून हा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे दि. २५ आॅगस्ट २०१६, १५ डिसेंबर २०१६ व दि. १९ जानेवारी २०१७ ला जिल्हाधिकाऱ्यांनी भूमीअभिलेख विभागाला पत्र देऊन शर्तभंगप्रकरणी विट्यातील मिळकतधारकांना दंडात्मक नोटिसा पाठविण्याचा व रक्कम न भरल्यास मालमत्ता उताऱ्यावर महाराष्ट्र शासन अशी नोंद करण्याचा आदेश दिला.त्यानुसार भूमीअभिलेख विभागाने दि. २५ जानेवारीला यशवंतनगर भागातील ८० मिळकतधारकांना सुमारे ३० ते ३१ कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावून ही रक्कम आठ दिवसात चलनाने जमा करण्याच्या नोटिसा पाठविल्या. या नोटिसा मिळताच मिळकतधारकांत मोठी खळबळ उडाली. दिलेली आठ दिवसांची मुदत संपल्याने या सर्व मिळकती सोमवारी शासन जमा करून घेण्यात आल्या. उच्चभ्रू लोकांचा भाग असणाऱ्या यशवंतनगर उपनगरात कोट्यवधी रुपयांच्या मिळकतीच्या उताऱ्यावर शासनाच्या नावाची नोंद लागल्याने मिळकतधारकांना प्रचंड हादरा बसला आहे.