शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील कोट्यवधींच्या मिळकती शासन जमा

By admin | Updated: February 8, 2017 22:58 IST

शहरात खळबळ : शर्तभंगमुळे भूमी अभिलेखची कारवाई; ३० कोटींच्या दंडात्मक कारवाईच्या नोटिसा

दिलीप मोहिते ल्ल विटासुवर्णनगरी विटा शहराचे ‘हार्ट’ समजल्या जाणाऱ्या यशवंतनगर भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गेल्या ४१ वर्षांपूर्वी येथील लोकांना रहिवास कारण्यासाठी दिलेल्या भूखंडांचा व्यावसायिक वापर व परस्पर हस्तांतरण करणाऱ्या यशवंतनगर येथील जवळपास ८० मिळकतधारकांना शर्तभंग केल्याप्रकरणी सुमारे ३० ते ३२ कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईच्या नोटिसा काढण्यात आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही रक्कम भरण्यास शासनाने दिलेली आठ दिवसांची मुदत संपल्याने या मिळकतींवर मूळ मालकांची नावे कमी करून उताऱ्यांवर शासनाची नावे लावण्यात आली आहेत. त्यात राजकीय लागेबांधे असलेल्या अनेक बड्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.विट्यातील यशवंतनगर हे उपनगर शहराचे हृदय समजले जाते. सुशिक्षित व अत्यंत उच्चभ्रू लोकांचे वास्तव असणाऱ्या या भागात अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे बंगले आहेत. त्यातच काहींनी शासनाच्या या जागांचा व्यवसायासाठीही वापर केला आहे. दि. १५ जून १९६६ ला या भागातील रिकामे भूखंड तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लोकांना रहिवास कारणासाठी शासनाने दिले होते. हे भूखंड देताना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय विक्री, व्यवसायासाठी वापर अगर वापरात बदल यासह अन्य काही शर्ती व अटींवर या भूखंडांचे वाटप करण्यात आले होते. परंतु, यातील अनेक मिळकतधारकांनी या भूखंडात अनधिकृतरित्या व शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वापरात बदल केले आहेत. तर काहींनी त्याचे परस्पररित्या हस्तांतरण केले. त्यामुळे शासनाच्या शर्तींचा भंग झाल्याने नागपूरच्या महालेखापाल यांनी २००५ मध्ये तपासणी करून हा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे दि. २५ आॅगस्ट २०१६, १५ डिसेंबर २०१६ व दि. १९ जानेवारी २०१७ ला जिल्हाधिकाऱ्यांनी भूमीअभिलेख विभागाला पत्र देऊन शर्तभंगप्रकरणी विट्यातील मिळकतधारकांना दंडात्मक नोटिसा पाठविण्याचा व रक्कम न भरल्यास मालमत्ता उताऱ्यावर महाराष्ट्र शासन अशी नोंद करण्याचा आदेश दिला.त्यानुसार भूमीअभिलेख विभागाने दि. २५ जानेवारीला यशवंतनगर भागातील ८० मिळकतधारकांना सुमारे ३० ते ३१ कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावून ही रक्कम आठ दिवसात चलनाने जमा करण्याच्या नोटिसा पाठविल्या. या नोटिसा मिळताच मिळकतधारकांत मोठी खळबळ उडाली. दिलेली आठ दिवसांची मुदत संपल्याने या सर्व मिळकती सोमवारी शासन जमा करून घेण्यात आल्या. उच्चभ्रू लोकांचा भाग असणाऱ्या यशवंतनगर उपनगरात कोट्यवधी रुपयांच्या मिळकतीच्या उताऱ्यावर शासनाच्या नावाची नोंद लागल्याने मिळकतधारकांना प्रचंड हादरा बसला आहे.