शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजल योजनेत शासकीय गोंधळ

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

सात महिन्यांपासून कामे ठप्प : जिल्ह्यातील ८२० गावे-वाड्यांचा २१७ कोटींचा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत

अशोक डोंबाळे/सांगली केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावरील मागेल तेथे पाणी योजना देण्याची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजना बंद करून नवीन योजना आणण्याच्या विचार शासनपातळीवर सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या योजनेतून जिल्ह्यातील ८२० गावे व वाड्या-वस्त्यांच्या २१७ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यास शासनाने गेल्या सात महिन्यात मंजुरी दिलेली नाही. जी कामे निविदा प्रक्रियेत असतील, त्यांच्या निविदा काढू नयेत, असाही आदेश दिल्याने कामे ठप्प झाली आहेत. पूर्वीच्या आघाडी सरकारच्या योजना महायुतीच्या सरकारने बंद करून नवीन सुरू केल्या आहेत. आता राष्ट्रीय पेयजल योजनेतही बदल करण्यात येणार आहे. मात्र नवीन योजना करण्यासाठी शासनाने किती वेळ घ्यावा, हे ठरले पाहिजे. तसे होताना दिसत नसल्यामुळे जिल्ह्यातील ८२० गावे व वाड्या-वस्त्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. अन्य योजनांवर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे. वास्तविक राज्य आणि केंद्र शासनाकडे राष्ट्रीय पेयजल योजनेचे प्रस्ताव डिसेंबरमध्ये पोहोचले पाहिजेत. त्यानुसार जिल्ह्यातील ८२० गावे व वाड्या-वस्त्यांचा २१७ कोटींचा आराखडा जिल्हा परिषद प्रशासनाने पाठविला आहे. डिसेंबरमध्ये आराखडा पोहोचल्यानंतर शासनाने जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत त्यास मंजुरी देणे अपेक्षित होते. १ एप्रिल २०१५ पासून नवीन आराखड्यानुसार पाणी योजनांची कामे सुरू होत असत. परंतु, यावर्षी डिसेंबरला आराखडे पाठविल्यानंतर आजअखेर मंजुरी मिळालेली नाही. त्यातच शासनाने जुन्या आराखड्यातील निविदा प्रक्रियेत असणाऱ्या कामांना स्थगिती दिली आहे. यामुळे सध्या राष्ट्रीय पेयजल योजनेतील सर्व कामे बंद आहेत. अपूर्ण कामासाठीही निधी नसल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. लोकप्रतिनिधींचे एवढ्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार या प्रश्नावर आवाज उठवित नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे. आराखड्याबाबत लोकप्रतिनिधींचे मौन... राष्ट्रीय पेयजल योजनेत आपल्या गावाच्या समावेशासाठी जिल्हा परिषद सभागृहात लोकप्रतिनिधी आवाज उठवत असतात. आराखडा तयार झाल्यानंतर, शासनाने त्याचे काय केले, हे पाहण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे. परिणामी गेल्या आठ महिन्यांपासून जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनता घोटभर पाण्यासाठी पाणी योजनांची वाट पाहत आहे.