शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

राष्ट्रीय पेयजल योजनेत शासकीय गोंधळ

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

सात महिन्यांपासून कामे ठप्प : जिल्ह्यातील ८२० गावे-वाड्यांचा २१७ कोटींचा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत

अशोक डोंबाळे/सांगली केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावरील मागेल तेथे पाणी योजना देण्याची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजना बंद करून नवीन योजना आणण्याच्या विचार शासनपातळीवर सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या योजनेतून जिल्ह्यातील ८२० गावे व वाड्या-वस्त्यांच्या २१७ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यास शासनाने गेल्या सात महिन्यात मंजुरी दिलेली नाही. जी कामे निविदा प्रक्रियेत असतील, त्यांच्या निविदा काढू नयेत, असाही आदेश दिल्याने कामे ठप्प झाली आहेत. पूर्वीच्या आघाडी सरकारच्या योजना महायुतीच्या सरकारने बंद करून नवीन सुरू केल्या आहेत. आता राष्ट्रीय पेयजल योजनेतही बदल करण्यात येणार आहे. मात्र नवीन योजना करण्यासाठी शासनाने किती वेळ घ्यावा, हे ठरले पाहिजे. तसे होताना दिसत नसल्यामुळे जिल्ह्यातील ८२० गावे व वाड्या-वस्त्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. अन्य योजनांवर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे. वास्तविक राज्य आणि केंद्र शासनाकडे राष्ट्रीय पेयजल योजनेचे प्रस्ताव डिसेंबरमध्ये पोहोचले पाहिजेत. त्यानुसार जिल्ह्यातील ८२० गावे व वाड्या-वस्त्यांचा २१७ कोटींचा आराखडा जिल्हा परिषद प्रशासनाने पाठविला आहे. डिसेंबरमध्ये आराखडा पोहोचल्यानंतर शासनाने जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत त्यास मंजुरी देणे अपेक्षित होते. १ एप्रिल २०१५ पासून नवीन आराखड्यानुसार पाणी योजनांची कामे सुरू होत असत. परंतु, यावर्षी डिसेंबरला आराखडे पाठविल्यानंतर आजअखेर मंजुरी मिळालेली नाही. त्यातच शासनाने जुन्या आराखड्यातील निविदा प्रक्रियेत असणाऱ्या कामांना स्थगिती दिली आहे. यामुळे सध्या राष्ट्रीय पेयजल योजनेतील सर्व कामे बंद आहेत. अपूर्ण कामासाठीही निधी नसल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. लोकप्रतिनिधींचे एवढ्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार या प्रश्नावर आवाज उठवित नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे. आराखड्याबाबत लोकप्रतिनिधींचे मौन... राष्ट्रीय पेयजल योजनेत आपल्या गावाच्या समावेशासाठी जिल्हा परिषद सभागृहात लोकप्रतिनिधी आवाज उठवत असतात. आराखडा तयार झाल्यानंतर, शासनाने त्याचे काय केले, हे पाहण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे. परिणामी गेल्या आठ महिन्यांपासून जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनता घोटभर पाण्यासाठी पाणी योजनांची वाट पाहत आहे.