शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

शासन, साखर कारखानदारांकडून फसवणूक : रघुनाथ पाटील

By admin | Updated: January 16, 2015 23:42 IST

सर्व शेतकरी, संघटना ‘शेतकरी संघर्ष समितीच्या’ झेंड्याखाली एकत्रित आणण्याचा प्रयत्न असून

अंकलखोप : शेतकरी वर्गाला सरकार व कारखानदार फसवत असून एफआरपीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या उसाला, कवडीमोल किंमत देण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडावा व आपल्या उसाची योग्य ती किमत मिळण्यासाठी संघर्षाला तयार व्हावे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शेतकरी संघटना व राजकीय पक्ष यांच्या एकत्रित शेतकरी संघर्ष समितीमार्फत अंकलखोप येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.ते म्हणाले, सत्ताधारी यांच्याशी हातमिळवणी करत खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित उसाला भाव न मागता कमी दरावर तडजोड करून शेतकऱ्यांना फसविण्याचा प्रयत्न केला आहे व आपल्यामुळे उसाला दर मिळतो असा डांगोरा पिटत आहेत. स्वत: खासदार असूनही सरकारने शेतकऱ्यांच्या उसाची ३ टक्के रिकव्हरी कमी करून किमान आधारभूत किंमत ठरविली. त्यावेळी खासदार शेट्टी कोठे होते, असा सवाल त्यांनी केला. उसाला उत्पादन खर्चावर आधारित ३५०० रुपये प्रतिटन दर मिळाला पाहिजे. आयात साखरेसाठी सरकारने कर आकारावा, साखर निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे, सरकारने साखर उत्पादनावरचा कर कमी करावा, त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दर देता येईल अशा मागण्या त्यांनी केल्या. यावेळी शेतकरी नेते बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, कारखानदारी परवडत नाही म्हणून ओरडणाऱ्यांनी कारखान्याची ५ ते ६ लायसन्स का घेतली आहेत? शेतकऱ्यांनी आता अभ्यासपूर्ण शेती करावी.यावेळी प्रकाश मिरजकर, सर्जेराव पवार, बाबूराव पाटील, पी. जी. पाटील (बुर्ली), श्रीकांत लाड, बी. जी. पाटील (बळीराजा संघटना) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वसंतराव बिरनाळे, संदीप सूर्यवंशी, राजकुमार पाटील, संजय संकपाळ, ए. डी. पाटील, भास्कर चौगुले, अरुण सावंत, उदयसिंह सूर्यवंशी, संग्राम पाटील, रमेश पाटील, शहाजी गुरव, घन:शाम सूर्यवंशी, विश्वास पाटील (बांबवडे) तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते. प्रकाश मिरजकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)अंकलखोप येथे ठिकाणी सर्व शेतकरी, संघटना ‘शेतकरी संघर्ष समितीच्या’ झेंड्याखाली एकत्रित आणण्याचा प्रयत्न असून या समितीच्या माध्यमातून ऊस लढ्यासाठी एकत्रित येण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्याची पहिली सभा अंकलखोपला झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.