शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

गोपीशेठ, शर्यती कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST

बैल सांभाळणं जिकिरीचंच गोपीशेठ माणदेशातले. तिथली बैलांची खिलार जात प्रसिद्ध आहे. खिलार गाई दुधासाठी कमी, पण शर्यतींसाठी खिलार बैल ...

बैल सांभाळणं जिकिरीचंच

गोपीशेठ माणदेशातले. तिथली बैलांची खिलार जात प्रसिद्ध आहे. खिलार गाई दुधासाठी कमी, पण शर्यतींसाठी खिलार बैल उमदे आणि चपळ. बैलांच्या संवर्धनासाठी या शर्यती भरवल्याचं शेठ सांगतात. पण यातून संवर्धन कसं होणार, याचं तर्कसंगत उत्तर त्यांच्याकडं नाही. मुळात सध्या सामान्य शेतकऱ्याला बैल सांभाळणं परवडत नाही. रोजचा पाच-सहाशेचा खर्च. शर्यतीचं खोंड असेल तर तोच खर्च दीड-दोन हजारावर जातो. केवळ तालेवार शौकीनच सध्या शर्यतीचे बैल सांभाळू शकतो. त्यांची संख्या तुटपुंजीच. शिवाय शर्यतीच्या खोंडाला शेतीच्या कामाला जुंपत नाहीत. असं असेल तर शर्यतींतून गोवंश संवर्धन कसं होणार? केवळ मूठभर बैलमालक, चालक आणि शर्यतींच्या आयोजकांचं हित जपण्यासाठी हा खटाटोप!

बैलाच्या शरीराची ठेवण पळण्यासाठी नाहीच !

मुळात बैलाच्या शरीराची ठेवण पळण्यासाठी नव्हे, तर काहीतरी वाहून नेण्यासाठी, ओढण्यासाठी असल्याचं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालंय. मोहोंजोदडो-हडप्पा या प्राचीन संस्कृतीचा इतिहासही तेच सांगतो.

तामिळनाडूत जल्लीकट्टूला परवानगी कशी?

तामिळनाडूने जल्लीकट्टू हा शर्यतीचा प्रकार प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा केला. जल्लीकट्टू म्हणजे बैलाला चिखलात सोडून त्याला आटोक्यात आणण्याची शर्यत. त्यात बैलांना बैलगाडीला जुंपले जात नाही, त्यांचा छळ होत नाही, मारहाण होत नाही. या मुद्द्यांवर तेथे या शर्यतींना परवानगी दिल्याचं प्राणीप्रेमी सांगतात.