शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

गोपीशेठ, शर्यती बैलांसाठी की राजकारणासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST

सांगली : भाजपचे बहुचर्चित आमदार गोपीचंद पडळकर तथा गोपीशेठ पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले आहेत. निमित्त आहे त्यांनी भरवलेल्या ...

सांगली : भाजपचे बहुचर्चित आमदार गोपीचंद पडळकर तथा गोपीशेठ पुन्हा एकदा राज्यभर चर्चेत आले आहेत. निमित्त आहे त्यांनी भरवलेल्या बैलगाडी शर्यतींचं. राजकारणात सध्या कशाची चलती आहे आणि त्याबाबत ‘टायमिंग’ कसं साधायचं, यात ते माहीर झालेत. बैलगाडी शर्यतींच्या मागणीचं मूळ धरू लागताच गोपीशेठ सजग झाले. न्यायालयाचा आदेश धुडकावून लावत त्यांनी बैलगाडी शर्यती आयोजित केल्याचं सांगून लाखाच्या बक्षिसांचा खुर्दाही जाहीर केला. यातून बैलांचं संवर्धन कसं होणार, याचं तर्कसंगत उत्तर त्यांच्याकडे नाही. लोकानुनय करता-करता सवंगपणाच्या राजकारणात ते गुरफटलेत, एवढं मात्र नक्की.

शर्यतींमध्ये बैलांचा अमानुष छळ होत असल्याची याचिका दाखल झाल्यानं २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं शर्यतींना चाप लावला. अर्थात गोपीशेठ कायदा-सुव्यवस्था फाट्यावर मारण्यात तरबेज. शर्यतींची मागणी लावून धरण्याची विनंती करण्यास गेलेल्यांना पाठीशी राहण्याचा धीर तर दिलाच; पण स्वत:च्या झरे गावात २० ऑगस्टला शर्यती भरवत असल्याचा शड्डूही त्यांनी ठोकला. शौकिनांच्या टाळ्या मिळाल्या! पण तिकडं हालचाली झाल्या आणि बैलगाडी शर्यती रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा हलली. शेठना आयती संधी मिळाली. शर्यती रोखण्यामागं आणि शासकीय यंत्रणा कामाला लावण्यामागं राष्ट्रवादी असल्याची तोफ त्यांनी डागली. राष्ट्रवादीला लक्ष्य केल्यानं आपला ‘युएसपी’ वाढतो, राज्यभर चालणारी बातमी होते, हे एव्हाना त्यांच्या चांगलंच लक्षात आलंय...

गोवंश अर्थात बैलांच्या संवर्धनासाठी शर्यती होणारच, असं ठासून सांगणारे गोपीशेठ बैलांचा अनन्वित छळ रोखण्यासाठी शर्यतींवर बंदी घातलीय, हे विसरलेत. अस्सल मराठी मातीतल्या रांगड्या बैलगाडी शर्यतींचं स्वरूप अलीकडं बिघडलं होतं. बैलांच्या शेपट्या पिरगाळणं, त्या दातानं चावणं, बॅटरीचा शॉक देणं, वृषण पिळणं, रक्तबंबाळ होईपर्यंत टोचणं, काठ्या-चाबकानं फोडून काढणं, दारू पाजणं असले प्रकार वाढले. वेसण घालूनही पुन्हा तसं घडल्याचे पुरावे पुढं आल्यानंच न्यायालयानं शर्यती थांबविल्या. काही शौकिनांनी विनालाठी, विनाचाबूक शर्यतींची अट घातली; पण अशा स्पर्धा हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच. महाराष्ट्रात त्या पुन्हा सुरू झाल्या तर छळाचे प्रकार घडणारच नाहीत, याची काय हमी?

जाता-जाता : अंगावर आलेल्याला गोपीशेठ नेहमी शिंगावर घेतात. कधीकधी लोकानुनय सवंगपणाकडे झुकतो. महागात पडतो. काही वर्षांपूर्वी गोपीशेठ आणि त्यांच्या पोरांनी टेंभूचं कार्यालय फोडलं होतं. गुन्हे दाखल झाले. त्यात काहीजण विनाकारण भरडले गेले. अजून कोर्टकचेऱ्या सुरू आहेत. शर्यतींसाठी शंभर बैलगाड्या बोलावल्यात. शौकीन-कार्यकर्तेही येताहेत. न्यायालयाची बंदी आहे, संचारबंदी आहे, त्यातच कोरोनाच्या संकटकाळात शर्यतींबाबत गुन्हे दाखल झाले तर ‘करिअर’ बरबाद; पण कायद्याच्या या चाबकाची तमा ना गोपीशेठना, ना शौकिनांना!