शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

जत तालुक्यात गणवेशामध्ये गोलमाल

By admin | Updated: October 8, 2015 00:37 IST

विद्यार्थी वंचित : वाटप झालेले गणवेशही निकृष्ट दर्जाचे, चौकशीची मागणी

जयवंत आदाटे - जत -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरू होऊन चार महिने पूर्ण होत आले, तरी तालुक्यातील सुमारे बारा ते चौदा शाळेत अद्याप गणवेश वाटप करण्यात आले नाही. ज्या शाळेत गणवेश वाटप झाले आहे, ते निकृष्ट दर्जाचे आहेत. गुणनियंत्रण विभागामार्फत या गणवेशाची तपासणी करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन गणवेश म्हणून वाटप करण्यात येणाऱ्या कपड्यांचा रंग व दर्जा निश्चित करणे आवश्यक असते. परंतु शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्यक्ष बैठक न घेता कागदोपत्री बैठक झाली आहे, असे दाखवून काही शाळेत परस्पर गणवेशाचे कपडे खरेदी करण्यात आले आहेत. गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी जाणीवपूर्वक या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. मंगळवेढा येथील एका कापड दुकानातून जत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करण्यात यावा, असा तोंडी आदेश गटशिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी केंद्रप्रमुखांच्या बैठकीत दिला होता. परंतु हा तोंडी आदेश भविष्यात अडचणीचा होईल, याची जाणीव काही शिक्षकांनी जावीर यांना करून दिल्यानंतर त्यांनी हा आदेश मागे घेतला होता, अशी चर्चा आता तालुक्यात होऊ लागली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याचा गणवेश खरेदी करण्यासाठी शासन दोनशे रुपये खर्च करत आहे. परंतु जत तालुक्यात वाटप करण्यात आलेल्या एका ड्रेसची किंमत सर्वसाधारणपणे १३० ते १५० रुपये इतकी आहे. उर्वरित पन्नास रुपये खर्च कोणासाठी व कोठे के ला, का त्यावर कोणी डल्ला मारला आहे ते समजून येत नाही. गणवेश वाटपाची सखोल चौकशी झाल्यास या प्रकरणातील गौडबंगाल बाहेर परणार आहे.जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुली व मुले यांची एकूण संख्या २९ हजार ३४२ इतकी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी दोनशे रुपयेप्रमाणे मार्च २०१५ मध्ये शासनाने सुमारे ५८ लाख ६८ हजार ४०० रुपये इतके अनुदान जत तालुक्यासाठी दिले होते.तालुका पातळीवरून केंद्रप्रमुख आणि प्रत्येक शाळेसाठी हे अनुदान वितरित करण्यात आले आहे. परंतु गणवेश खरेदी करून त्यांचे वाटप काही शाळांनी केले नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत, असा आरोप केला जात आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शैक्षणिक दर्जा सुधारून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने संयुक्तपणे गणवेश वाटप, मोफत पाठ्यपुस्तके व शालेय पोषण आहार दिला जात आहे. काही शाळांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली आहे. परंतु तालुक्यातील काही शाळांनी अद्याप गणवेश वाटप केलेले नाहीत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती आता दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. जत पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी संजय जावीर व सभापती लक्ष्मी मासाळ यांच्यात ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारावरून जुंपली आहे. शालेय पोषण आहारप्रकरणी आमदार विलासराव जगताप यांनी तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्या उपस्थितीत संजय जावीर यांची कानउघाडणी केली आहे. त्यामुळे जावीर यांची जत पं. स.मधील कारकीर्द दिवसेंदिवस वादग्रस्त होऊ लागली आहे. आदर्श शिक्षक पुरस्कारावरुन दोघात जुंपली