शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विद्यार्थ्यांच्या भावविश्वातलं सुवर्णपान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

माझा अपघात झाला, तेव्हा एका मुलाने मी बरी व्हावी म्हणून तीन दिवस उपवास केला. मातृछत्र हरपलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या ...

माझा अपघात झाला, तेव्हा एका मुलाने मी बरी व्हावी म्हणून तीन दिवस उपवास केला. मातृछत्र हरपलेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या लग्नात मला आईचा मान दिला. अशा अनेक घटनांनी माझं भावविश्व समृद्ध झाले. या घटना कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठ्या आहेत. अध्यापनाच्या आजवरच्या सेवेचं हे फलित माझ्यासाठी अनमोल असेच आहे. स्वप्नं साकार झाले, पण या स्वप्नांनी माझ्या आयुष्यही सुंदरपणे साकारले.

- सौ. सुवर्णा संजय ठिगळे, शिक्षिका, शाळा क्र. १, कसबे डिग्रज

एखादा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे व त्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करीत ती उंची गाठणे हे काम खूप कठीण असते, मात्र प्रयत्न, चिकाटी, प्रामाणिकपणा या जोरावर अशी कठीण ध्येय साध्य करता येतात, ही गोष्ट शिक्षिका सौ. सुवर्णा संजय ठिगळे यांनी त्यांच्या वाटचालीतून सिद्ध केली.

मिरजेतील एका व्यापारी पेढीत दिवाणजीचे काम करणाऱ्या महारुद्र कोठावळे व त्यांच्या पत्नी सुभद्रा यांच्या पाेटी सुवर्णा यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. त्यांना एक मोठा व एक लहान असे दोन भाऊ आहेत. घरात एकुलती मुलगी म्हणून सुवर्णा या सर्वांच्या लाडक्या होत्या. बालपणी त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. प्राथमिक शिक्षण मिरजेतील नगरपालिकेच्या शाळा क्र. २ मध्ये झाले. वडिलांनी तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्याची जिद्द बाळगली होती. त्यामुळे त्यांनी दिवाणजीची नोकरी सोडून भिलवडीत व्यापार सुरू केला. त्यामुळे हे कुटुंब भिलवडीला गेले. भिलवडी येथे सुवर्णा यांचे माध्यमिक शिक्षण झाले. याच काळात इंग्रजी शिकविणारे बी. डी. वाळवेकर यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. भविष्यात वाळवेकर सरांसारखेच आपण अध्यापन करायचे, असे मनोमन त्यांनी ठरविले. त्यानंतर त्यांनी सांगलीत डी. एड. चे शिक्षण घेतले. तासगावात बी.ए.ची पदवी घेतली. पैसे खर्च न करता गुणवत्तेच्या जोरावर त्यांना पुणे जिल्ह्यात तांभड येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरी लागली. अध्यापनाची स्वप्नपूर्ती झाली. लग्नाच्या बाबतीतही त्यांनी काही गोष्टी मनात ठरविल्या होत्या. आपल्यापेक्षा मोठ्या पदावर असणाऱ्या, लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची धमक असणाऱ्या व हुंडा न मागणाऱ्या तरुणाशीच विवाह करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यानंतर १९९० ला त्यांना प्राध्यापक संजय ठिगळे यांचे स्थळ आले. मनातील सर्व गोष्टींची पूर्तता करणारे हे स्थळ होते त्यामुळे त्यांनी लगेच होकारही दिला.

लग्नानंतरही संसाराचा डोलारा सांभाळत, कसरत करीत त्यांनी नोकरी व पुढील शिक्षणाची धडपड सुरू केली. त्यानंतर त्यांनी बी. एड. व एम. ए. ची पदवी घेतली. पुण्यातील तांभड, खानापूर तालुक्यातील येवलेवाडी, मिरज तालुक्यातील बामणाेली, कवलापूर व आता कसबे डिग्रज जिल्हा परिषद शाळेत त्यांनी ३० वर्षे अध्यापन केले आहे. या काळात त्यांना त्यांचे पती प्रा. संजय ठिगळे यांनी मोलाची साथ दिली. आई-वडिलांनी त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी बळ दिले. नोकरी म्हणून कधीही अध्यापनाचा विचार न करता ती सेवा व जगण्याची उर्जा म्हणून केला. त्यामुळे एक चांगली पिढी त्यांना घडविता आली. बदली झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात येणारे अश्रू, त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या प्रसंगात दिला जाणारा मान, अपघात झाल्यानंतर त्यांच्यासाठी ठेवले जाणारे उपवास, केल्या जाणाऱ्या प्रार्थना हे सर्व एखाद्या चित्रपटातील भावनिक प्रसंगाला साजेसे वाटते. आयुष्यात त्यांनी विद्यार्थ्यांचे भावविश्व असे समृद्ध केले. त्यामुळेच त्यांना सांगलीतील अस्मिता फाउंडेशन, जयसिंगपूर येथे सावित्रीच्या लेक संघटनेतर्फे, जेष्ठ नागरिक संघटनेतर्फे तसेच ग्रामपंचायत बामणोली यांच्याकडून‘आदर्श शिक्षिका पुरस्कार' त्यांना देण्यात आला. अध्यापनासह ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग, पूरग्रस्तांना मदत, पथनाट्य, प्रबोधन फेऱ्यांमध्ये पुढाकार तसेच शंभरहून अधिक समाजप्रबाेधनपर व्याख्यानातून त्यांनी सामाजिक चळवळही जोपासली. प्रदीर्घकाळ शिक्षण शेत्रात कार्य करीत असताना त्यांनी अनेक राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला वेगवेगळ्या विषयावर संशोधन पेपर सदर केले. संशोधन संस्थामध्ये प्रशिक्षणही पूर्ण केले.