शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

गूळ पोहोचला सहा हजारावर

By admin | Updated: March 1, 2015 23:16 IST

सरत्या हंगामात शेतकऱ्यांचा फायदा : दर वाढण्याची अपेक्षा

सहदेव खोत -पुनवत -सरत्या गूळ हंगामात वारणा पट्ट्यातील कणदूर, बिळाशी, कोतोलीतील शेतकऱ्यांच्या गुळाला चांगला दर मिळत असून, शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. नुकत्याच कऱ्हाड येथे झालेल्या गूळ सौद्यात कणदूर येथील गुऱ्हाळ मालक सुभाष नामदेव पाटील यांच्या १४७ लहान गूळ रव्यांना ४९00 ते ६0१0, माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्या गुऱ्हाळघरातील शंकर गोविंद पाटील (बिळाशी) यांच्या १५९ लहान रव्यांना ४३00 ते ५000, तर कोतोलीच्या नामदेव पाटील यांच्या गुळास ५३१0 व आर. एस. पाटील यांच्या गुळास ४६१0 असा दर प्राप्त झाला. हे सौदे व्यापारी उत्तमराव भाटवडेकर यांच्याकडे पार पडले.गुऱ्हाळघरांच्या सरत्या हंगामात गूळ उद्योग शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडू लागला आहे. मोठ्या रव्यांपेक्षा १0 किलोच्या रव्यांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. म्हणून सर्रास गुऱ्हाळघरातून १0 किलोच्या रव्यांचेच उत्पादन घेतले जात आहे. हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने आदनाचा गूळ उतारा वाढला आहे. काही गुऱ्हाळघरात एकेका आदनाला ९ ते १0 रवे (मोठे) पडले आहेत.शिराळा तालुक्यातील हंगाम आता काही दिवसांचाच राहिला आहे, तर शाहुवाडी तालुक्यातील मालेवाडी, कोतोली, रेठरे परिसरात हंगाम महिनाभर चालण्यासारखी स्थिती आहे. अनेक गुऱ्हाळ मालकांचा स्वत:चा ऊस अजून बाकी आहे.शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गूळ यंदा कोल्हापूरऐवजी कऱ्हाड बाजारपेठेत गेला आहे. कोल्हापूरच्या तुलनेत कऱ्हाडलाच चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक गुऱ्हाळघरातून कोल्हापूरला यंदा अजिबातच गूळ गेलेला नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. गुळवे सरसावलेगुळव्यांनी किती कसब वापरुन गूळ बनविला आहे, यावर गुळाचा दर ठरतो. सध्या अनेक गुऱ्हाळघरांतील गुळवे चांगला दर मिळविण्यासाठी धडपडत आहेत. दरायोग्य गूळ बनविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. यंदाच्या हंगामात गुळाला ७000 रुपये दर मिळविणारच, असा मनोदय अनेक गुळव्यांनी व्यक्त केला. एकंदरीत गूळ दरात अनेक शेतकऱ्यांना आता फायदा होऊ लागला असून, अशा शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.