शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

गूळ पोहोचला सहा हजारावर

By admin | Updated: March 1, 2015 23:16 IST

सरत्या हंगामात शेतकऱ्यांचा फायदा : दर वाढण्याची अपेक्षा

सहदेव खोत -पुनवत -सरत्या गूळ हंगामात वारणा पट्ट्यातील कणदूर, बिळाशी, कोतोलीतील शेतकऱ्यांच्या गुळाला चांगला दर मिळत असून, शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. नुकत्याच कऱ्हाड येथे झालेल्या गूळ सौद्यात कणदूर येथील गुऱ्हाळ मालक सुभाष नामदेव पाटील यांच्या १४७ लहान गूळ रव्यांना ४९00 ते ६0१0, माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्या गुऱ्हाळघरातील शंकर गोविंद पाटील (बिळाशी) यांच्या १५९ लहान रव्यांना ४३00 ते ५000, तर कोतोलीच्या नामदेव पाटील यांच्या गुळास ५३१0 व आर. एस. पाटील यांच्या गुळास ४६१0 असा दर प्राप्त झाला. हे सौदे व्यापारी उत्तमराव भाटवडेकर यांच्याकडे पार पडले.गुऱ्हाळघरांच्या सरत्या हंगामात गूळ उद्योग शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडू लागला आहे. मोठ्या रव्यांपेक्षा १0 किलोच्या रव्यांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. म्हणून सर्रास गुऱ्हाळघरातून १0 किलोच्या रव्यांचेच उत्पादन घेतले जात आहे. हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने आदनाचा गूळ उतारा वाढला आहे. काही गुऱ्हाळघरात एकेका आदनाला ९ ते १0 रवे (मोठे) पडले आहेत.शिराळा तालुक्यातील हंगाम आता काही दिवसांचाच राहिला आहे, तर शाहुवाडी तालुक्यातील मालेवाडी, कोतोली, रेठरे परिसरात हंगाम महिनाभर चालण्यासारखी स्थिती आहे. अनेक गुऱ्हाळ मालकांचा स्वत:चा ऊस अजून बाकी आहे.शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गूळ यंदा कोल्हापूरऐवजी कऱ्हाड बाजारपेठेत गेला आहे. कोल्हापूरच्या तुलनेत कऱ्हाडलाच चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक गुऱ्हाळघरातून कोल्हापूरला यंदा अजिबातच गूळ गेलेला नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. गुळवे सरसावलेगुळव्यांनी किती कसब वापरुन गूळ बनविला आहे, यावर गुळाचा दर ठरतो. सध्या अनेक गुऱ्हाळघरांतील गुळवे चांगला दर मिळविण्यासाठी धडपडत आहेत. दरायोग्य गूळ बनविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. यंदाच्या हंगामात गुळाला ७000 रुपये दर मिळविणारच, असा मनोदय अनेक गुळव्यांनी व्यक्त केला. एकंदरीत गूळ दरात अनेक शेतकऱ्यांना आता फायदा होऊ लागला असून, अशा शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.