शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

गूळ पोहोचला सहा हजारावर

By admin | Updated: March 1, 2015 23:16 IST

सरत्या हंगामात शेतकऱ्यांचा फायदा : दर वाढण्याची अपेक्षा

सहदेव खोत -पुनवत -सरत्या गूळ हंगामात वारणा पट्ट्यातील कणदूर, बिळाशी, कोतोलीतील शेतकऱ्यांच्या गुळाला चांगला दर मिळत असून, शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. नुकत्याच कऱ्हाड येथे झालेल्या गूळ सौद्यात कणदूर येथील गुऱ्हाळ मालक सुभाष नामदेव पाटील यांच्या १४७ लहान गूळ रव्यांना ४९00 ते ६0१0, माजी सरपंच आनंदराव पाटील यांच्या गुऱ्हाळघरातील शंकर गोविंद पाटील (बिळाशी) यांच्या १५९ लहान रव्यांना ४३00 ते ५000, तर कोतोलीच्या नामदेव पाटील यांच्या गुळास ५३१0 व आर. एस. पाटील यांच्या गुळास ४६१0 असा दर प्राप्त झाला. हे सौदे व्यापारी उत्तमराव भाटवडेकर यांच्याकडे पार पडले.गुऱ्हाळघरांच्या सरत्या हंगामात गूळ उद्योग शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडू लागला आहे. मोठ्या रव्यांपेक्षा १0 किलोच्या रव्यांना चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. म्हणून सर्रास गुऱ्हाळघरातून १0 किलोच्या रव्यांचेच उत्पादन घेतले जात आहे. हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने आदनाचा गूळ उतारा वाढला आहे. काही गुऱ्हाळघरात एकेका आदनाला ९ ते १0 रवे (मोठे) पडले आहेत.शिराळा तालुक्यातील हंगाम आता काही दिवसांचाच राहिला आहे, तर शाहुवाडी तालुक्यातील मालेवाडी, कोतोली, रेठरे परिसरात हंगाम महिनाभर चालण्यासारखी स्थिती आहे. अनेक गुऱ्हाळ मालकांचा स्वत:चा ऊस अजून बाकी आहे.शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गूळ यंदा कोल्हापूरऐवजी कऱ्हाड बाजारपेठेत गेला आहे. कोल्हापूरच्या तुलनेत कऱ्हाडलाच चांगला दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक गुऱ्हाळघरातून कोल्हापूरला यंदा अजिबातच गूळ गेलेला नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. गुळवे सरसावलेगुळव्यांनी किती कसब वापरुन गूळ बनविला आहे, यावर गुळाचा दर ठरतो. सध्या अनेक गुऱ्हाळघरांतील गुळवे चांगला दर मिळविण्यासाठी धडपडत आहेत. दरायोग्य गूळ बनविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. यंदाच्या हंगामात गुळाला ७000 रुपये दर मिळविणारच, असा मनोदय अनेक गुळव्यांनी व्यक्त केला. एकंदरीत गूळ दरात अनेक शेतकऱ्यांना आता फायदा होऊ लागला असून, अशा शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.