शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

‘माणसातला देवमाणूस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे राजकीय वारसदार म्हणून ते सुपरिचित होते. देशमुख साहेब म्हणजे शिराळा डोंगरी भागात सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेतृत्व ...

माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे राजकीय वारसदार म्हणून ते सुपरिचित होते. देशमुख साहेब म्हणजे शिराळा डोंगरी भागात सर्वसामान्यांसाठी काम करणारे नेतृत्व होते. डोंगरी परिषद घेऊन त्यांनी अनेक तालुक्यांना डोंगरी विभागाचा लाभ मिळवून दिला. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक खात्याचे प्रभावीपणे काम केले. विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून यशस्वी धुरा सांभाळली. त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गाैरविण्यात आले हाेते. अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे ते सदस्य राहिले होते. काँग्रेसचे निष्ठावान नेते अशी त्यांची ओळख होती. सत्तेच्या राजकारणात त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाप्रर्यंत विकासाची गंगा पोहोचवली. राजकारणालाही आदर्श दिशा देण्याचे काम त्यांनी केले. शिवाजीराव देशमुख म्हटले की साहेब आणि साहेब म्हटले की शिवाजीराव देशमुख असे समीकरण गेली अनेक दशके सांगली जिल्ह्याच्या राजकारणात होते. त्यांचे फक्त असणे ही सुद्धा अनेक कार्यकर्त्यांसाठी ताकद होती. ते आता आपल्यात नाहीत, ही कल्पना अनेकदा मनाला पटत नाही.

सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही योगदान दिले. त्या योगदानात स्वत: साहेबांचाही जाणीवपूर्वक उल्लेख करावा लागतो. साहेब मितभाषी, उच्चशिक्षित होते. १९६७ पासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास २०१९ मध्ये थांबला. साहेबांनी राजकारणात राहून स्वत:लाही जपले आणि जनतेलाही. साहेब प्रतिभासंपन्न नेतृत्व होते. त्यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही. या महामानवाची आज द्वितीय पुण्यतिथी. अशा या "माणसातल्या देवमाणसास" विनम्र अभिवादन...

- शिवाजी पाटील, येळापूर